
पुणे-श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उपस्थित राहून धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले.
भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून अनेक संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जीवित राहिली आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धर्माचार्य कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आ. उमा खापरे, आ. महेश लांडगे, आ. शंकर जगताप, आ. अमित गोरखे, आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज, ह भ प ब्रह्मगिरी मारुती महाराज कुसेकर, भास्करगिरी महाराज, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुती महाराज कुरेकर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय सभ्यता ही जगातील सर्वात प्राचीन सभ्यता आहे. पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीमधील आजही सापडत असलेले अवशेष पूर्णपणे विकसित आहेत. संताने आणि धर्माचार्य नी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे ही संस्कृती जीवित राहिली पत भ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संताच्या विचारांनी हटविल्यामुळे आपल्या संस्कृतीला कोणीही संपू शकत नाही.
आपला देश प्रगती करतानाच, भारत बलशाली होतोय, हे सण न झाल्यामुळे देशातील आणि विदेशातील विघातक शक्तीने एकत्र येऊन एक प्रकारचे षडयंत्र रचून देशात प्राजक्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संताने समाजामध्ये जागरूकता निर्माण करून हे प्रयत्न हाणून पाडले.
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतातील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गो सेवेचे महत्व वाढवले पाहिजे तसेच ज्या प्रकारे गंगा नदी स्वच्छ केली जात आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी येत्या काळात संपूर्ण सक्षमतेने प्रयत्न केले जाईल. आणि फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.