<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>सातारा Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/satara/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/satara</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Thu, 17 Sep 2026 16:23:51 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.1.1</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/08/cropped-SATARA-PRATINIDHI-scaled-1-32x32.png</url>
	<title>सातारा Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/satara</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा&#8221;पालकमंत्री शंभूराज देसाई</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32415</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32415#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 17 Sep 2026 16:23:51 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32415</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा, दि. १७ : कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलचे आयोजन २४ डिसेंबर २०२६ ते २ जानेवारी २०२७ या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32415">कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा&#8221;पालकमंत्री शंभूराज देसाई</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा, दि. १७ :</strong> </span>कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलचे आयोजन २४ डिसेंबर २०२६ ते २ जानेवारी २०२७ या कालावधीत करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलसाठी विविध विभागांनी आवश्यक त्या परवानग्या वेळेत द्याव्यात. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून हा फेस्टिव्हल यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.</p>
<p>जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलच्या कालावधीत महाबळेश्वर, तापोळा यासह अन्य पर्यटनस्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. फेस्टिव्हलसाठी सर्वसमावेशक आणि आकर्षक आराखडा तयार करावा. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देसाई यांनी केल्या.</p>
<p>फेस्टिव्हलची राज्याबरोबरच परराज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यात यावी. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन कंपन्यांशी संपर्क साधावा. तसेच परदेशी पर्यटकांनाही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होता येईल, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.</p>
<p>ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला गती द्या</p>
<p>पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध असून कामाला गती द्यावी, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले. रुग्णालयासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक असून भूसंपादनासाठी आरोग्यमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित जमीनमालकांशी चर्चा करून जमीन तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>जीवा महाले स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही</p>
<p>किल्ले प्रतापगड परिसरातच जीवा महाले यांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.</p>
<p>स्मारकाच्या उभारणीसाठी समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये वाईचे प्रांताधिकारी यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचना देसाई यांनी केल्या.</p>
<p>समितीच्या सदस्यांनी सांस्कृतिक विभागाकडील जीवा महाले यांची उपलब्ध छायाचित्रे पाहून अंतिम छायाचित्र निश्चित करावे. त्यानुसार पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्मितीसाठी मंजुरी घेऊन अनुभवी शिल्पकाराकडून पुतळा तयार करून उभारण्यात येईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.</p>
<p>विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप</p>
<p>बैठकीपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना विविध लाभ आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32415">कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा&#8221;पालकमंत्री शंभूराज देसाई</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32415/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>घरभाडे परवडत नाही म्हणून वृद्ध आईला घराबाहेर काढले; दोन मुलांना प्रांताधिकाऱ्यांची नोटीस</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32253</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32253#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 15 Sep 2026 15:34:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32253</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : घरभाड्याचा खर्च परवडत नसल्याचे कारण देत ६५ वर्षीय आईला आधाराविना सोडल्याच्या प्रकरणाची सातारा प्रशासनाने</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32253">घरभाडे परवडत नाही म्हणून वृद्ध आईला घराबाहेर काढले; दोन मुलांना प्रांताधिकाऱ्यांची नोटीस</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा :</strong> </span>घरभाड्याचा खर्च परवडत नसल्याचे कारण देत ६५ वर्षीय आईला आधाराविना सोडल्याच्या प्रकरणाची सातारा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रुक्मिणी सदाशिव भस्मे या वृद्ध महिलेच्या पालनपोषणाची जबाबदारी पार न पाडल्याप्रकरणी त्यांच्या दोन्ही मुलांना साताऱ्याचे प्रांताधिकारी आशिष बारकूल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आईला दरमहा निर्वाह भत्ता का देऊ नये, याबाबत लेखी स्पष्टीकरण साद करण्याचे निर्देश मुलांना देण्यात आले आहेत.</p>
<p>रुक्मिणी भस्मे या पाटण तालुक्यातील मुरूड येथील रहिवासी आहेत. पतीच्या निधनानंतर त्या मुलांच्या आधारावर राहत होत्या. काही काळ त्या मुलांसोबत सातारा शहरातील भाड्याच्या घरात राहत होत्या. मात्र, घरभाड्याचा खर्च वाढत असल्याने त्यांना घरात ठेवणे शक्य नसल्याचे कारण मुलांकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली.</p>
<p>त्यानंतर रुक्मिणी भस्मे यांना घराबाहेर पडावे लागले. काही काळ त्यांनी साताऱ्यातील मंदिरात आश्रय घेतला. वृद्ध आईची अशी अवस्था झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नागरिकांकडून मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला. प्रशासनानेही प्रकरणाची दखल घेत त्यांच्यासाठी वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्टमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली.</p>
<p>यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी रुक्मिणी भस्मे यांच्या देखभालीसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, वृद्ध महिलेला केवळ निवारा देणे पुरेसे नसून तिच्या पालनपोषणाची जबाबदारी मुलांनीही स्वीकारणे आवश्यक असल्याने प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.</p>
<p>प्रांताधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये दोन्ही मुलांना न्यायाधिकरणासमोर व्यक्तिशः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. आईच्या निर्वाहासाठी दरमहा भत्ता मंजूर करण्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. निर्धारित वेळी समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रकरणात एकतर्फी निर्णय घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.</p>
<p>दरम्यान, रुक्मिणी भस्मे यांच्या एका मुलाला नोटीस मिळाल्याची माहिती आहे. तर दुसरा मुलगा सध्या कुठे आहे, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे यशोधन ट्रस्टकडून सांगण्यात आले. संबंधित मुलांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते.</p>
<p>विशेष म्हणजे, मुलांकडून दुर्लक्ष झाल्याची परिस्थिती निर्माण होऊनही रुक्मिणी भस्मे यांनी मुलांविषयी कटुता व्यक्त केली नसल्याचे समोर आले आहे. आपल्याला मुलांसोबत राहायचे असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.</p>
<p>या प्रकरणामुळे वृद्ध आई-वडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. प्रशासनाच्या नोटीसीनंतर दोन्ही मुलांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि न्यायाधिकरणाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32253">घरभाडे परवडत नाही म्हणून वृद्ध आईला घराबाहेर काढले; दोन मुलांना प्रांताधिकाऱ्यांची नोटीस</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32253/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>वादाचा शेवट करा, नाती दृढ करा; लोकअदालतीचा उद्देश : न्यायमूर्ती राजेश पाटील</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32109</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32109#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 12 Sep 2026 16:24:48 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32109</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : संवादाच्या माध्यमातून वाद मिटल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. त्यामुळे आपापसातील वाद</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32109">वादाचा शेवट करा, नाती दृढ करा; लोकअदालतीचा उद्देश : न्यायमूर्ती राजेश पाटील</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा :</strong> </span>संवादाच्या माध्यमातून वाद मिटल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. त्यामुळे आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवून देणे, हे लोकअदालतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी सांगितले.</p>
<p>सातारा जिल्हा न्यायालयाच्या परिसरात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद एस. वाघमारे, जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शिनी वाघमारे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील, विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.</p>
<p>न्यायमूर्ती पाटील म्हणाले की, लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, एखादे प्रकरण लोकअदालतीमध्ये आले म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत निकाली काढायचे, असा त्याचा अर्थ नाही. पक्षकारांच्या संमतीने समाधानकारक तोडगा निघत असेल, तरच प्रकरण निकाली काढले जाते.</p>
<p>वादाचा शेवट करून नाती दृढ व्हावीत, दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे आणि त्यांना समाधानकारक तोडगा मिळावा, हे लोकअदालतीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या तुलनेत लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा जलद आणि आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर पद्धतीने निपटारा करता येतो. तडजोडीस पात्र असलेले विविध दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे वाद लोकअदालतीत सामंजस्याने सोडविता येतात. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.</p>
<p>नागरिकांनी आपापसांतील वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी लोकअदालतीच्या माध्यमाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन न्यायमूर्ती पाटील यांनी केले.</p>
<p>प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद एस. वाघमारे म्हणाले की, लोकअदालतीत वाद मिटविण्यात पक्षकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संवादातून वादावर समाधानकारक तोडगा काढणे हा लोकअदालतीचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातत्याने काम करत असून, लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32109">वादाचा शेवट करा, नाती दृढ करा; लोकअदालतीचा उद्देश : न्यायमूर्ती राजेश पाटील</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32109/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बालेकिल्ल्यातच शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंना ललकारणी; ‘जंगल शांत आहे म्हणजे वाघ नाही असे समजू नका!’</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31935</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31935#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 09 Sep 2026 13:47:54 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31935</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी जावळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मेढा येथेच राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31935">बालेकिल्ल्यातच शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंना ललकारणी; ‘जंगल शांत आहे म्हणजे वाघ नाही असे समजू नका!’</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p>जावळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मेढा येथेच राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना अप्रत्यक्षपणे थेट इशारा दिल्याने सातारा-जावळीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मेढा येथे दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजेंनी केलेल्या वक्तव्याने आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला नवी धार मिळाली आहे.</p>
<p>“जंगल शांत आहे म्हणजे जंगलात वाघ नाही, असे समजू नका. वाघ झोपलेला असेल. त्यामुळे जपून राहा. डिवचायचे, काड्या घालण्याचे काम करू नका; अन्यथा तुम्हाला परवडणार नाही,” असा सूचक मात्र आक्रमक इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. शिवेंद्रराजेंनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख शशिकांत शिंदे यांच्याकडेच असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी आणि राजकीय वर्तुळात रंगली.</p>
<p>जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप समर्थक गटांमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि ठरावांच्या निमित्ताने संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची तीव्रता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढली आहे. सोसायटी मतदारसंघातील ठराव प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटांमध्ये झालेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले होते.</p>
<p>आखाडे येथील सोसायटीच्या ठरावाच्या वेळी दोन्ही गट आमनेसामने आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व असलेल्या या सोसायटीतील सदस्यांना सहलीला नेणे, फोडाफोडीचे प्रयत्न करणे, तसेच ठराव आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर अवघ्या एका मताच्या फरकाने शिवेंद्रराजे समर्थकाच्या नावाचा ठराव मंजूर झाला. या घटनेने जावळीतील राजकारण ढवळून निघाले.</p>
<p>मात्र, त्यानंतर हातगेघर सोसायटीच्या ठरावावेळी राष्ट्रवादीकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. शिवेंद्रराजे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचे वर्चस्व असलेल्या या सोसायटीची ठराव प्रक्रिया घेण्यात येणार होती. मात्र, आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने बैठकच रद्द झाली. त्यामुळे भाजप समर्थक गटाला धक्का बसला.</p>
<p>या घटनेनंतर वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांच्या गटावर गंभीर आरोप केले. सोसायटीचे संचालक ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप करत मानकुमरे थेट शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. “संचालक मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही,” अशी भूमिका घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.</p>
<p>आखाडे सोसायटीतील घडामोडींना हातगेघरच्या माध्यमातून उत्तर देण्यात आल्याचा आरोप भाजप समर्थकांकडून करण्यात आला. त्यानंतर शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला. सहकारी संस्थांच्या निवडणुकांपासून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत पोहोचल्याने सातारा-जावळीच्या राजकारणात या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे.</p>
<p>याच पार्श्वभूमीवर मेढा येथे झालेल्या दहीहंडी उत्सवात शिवेंद्रराजेंनी केलेले वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. शशिकांत शिंदे यांच्याच प्रभावक्षेत्रात जाऊन शिवेंद्रराजेंनी “वाघ” आणि “जंगल” या शब्दांचा वापर करत दिलेला इशारा हा आगामी राजकीय संघर्षाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p>विशेष म्हणजे, शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष सातारा-जावळी मतदारसंघापुरता मर्यादित राहिलेला नाही. सहकार क्षेत्रातील वर्चस्व, स्थानिक संस्थांवरील पकड आणि जिल्हा बँकेतील समीकरणे यामुळे दोन्ही गटांमधील संघर्षाला व्यापक राजकीय परिमाण प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात सोसायट्यांच्या ठरावांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक घडामोडीकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाण्याची शक्यता आहे.</p>
<p>दरम्यान, शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्यावर शशिकांत शिंदे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्याकडून या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले जाते का, की राजकीय संघर्ष आणखी तीव्र होतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मेढ्यातील दहीहंडीचा उत्सव संपला असला तरी “जंगलातील वाघ” या शिवेंद्रराजेंच्या एका वक्तव्याने सातारा-जावळीच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31935">बालेकिल्ल्यातच शिवेंद्रराजेंची शशिकांत शिंदेंना ललकारणी; ‘जंगल शांत आहे म्हणजे वाघ नाही असे समजू नका!’</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31935/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मंत्री शिवेंद्रसिंहराजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न; AI मॉर्फिंग प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31913</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31913#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 09 Sep 2026 04:34:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31913</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31913">मंत्री शिवेंद्रसिंहराजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न; AI मॉर्फिंग प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा : </strong></span>महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘प्रतीक थोरात देशभक्त Gen Z’, ‘सोनाली देशमुख’, ‘हरी शिंदे’ आणि ‘माणदेश-प्राइम-न्यूज’ या फेसबुक व यूट्यूब अकाउंटधारकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जनसंपर्क अधिकारी अमर बाळासाहेब मोकाशी (वय ५०, रा. कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ६ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘राजधानी सातारा दहीहंडी उत्सव २०२६’ कार्यक्रमातील मंत्री भोसले यांच्या मूळ छायाचित्रात डिजिटल पद्धतीने फेरफार करून अश्लील व विभत्स स्वरूपाचा बनावट फोटो तयार करण्यात आला. हा फोटो AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>बनावट छायाचित्रासोबत भावना दुखावणारा आणि दिशाभूल करणारा मजकूर जोडून तो फेसबुक व यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. लोकप्रतिनिधीची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याच्या तसेच समाजात द्वेष निर्माण होईल, अशा उद्देशाने संबंधित पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.</p>
<p>या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५३(२), ३५६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन गणपतराव म्हात्रे करीत आहेत.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31913">मंत्री शिवेंद्रसिंहराजेंना बदनाम करण्याचा प्रयत्न; AI मॉर्फिंग प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31913/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>डॉल्बीला परवानगी हवी तर डिजेसमोर आजी-आजोबांना बसवा; साताऱ्याचे एसपी पिंगळेंचा गणेश मंडळांना परखड सल्ला</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31847</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31847#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 07 Sep 2026 19:01:05 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31847</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना, साताऱ्याचे जिल्हा पोलीस</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31847">डॉल्बीला परवानगी हवी तर डिजेसमोर आजी-आजोबांना बसवा; साताऱ्याचे एसपी पिंगळेंचा गणेश मंडळांना परखड सल्ला</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा :</strong></span> गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना, साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर गणेश मंडळांना परखड शब्दांत सल्ला दिला. डीजे किंवा डॉल्बीला विरोध नसून, ध्वनीची तीव्रता आणि कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>‘डीजे मुक्ती’ किंवा ‘डॉल्बी मुक्ती’ अशा संकल्पनांबाबत बोलताना पिंगळे यांनी डीजे आणि डॉल्बी यातील फरक स्पष्ट केला. डीजे म्हणजे डिस्को जॉकी असून तो गाणी निवडून वाजविण्याचे काम करतो. त्यामुळे डीजेवर बंदी घालण्याचा प्रश्नच येत नाही. डॉल्बी हे ध्वनीशी संबंधित तंत्रज्ञान असून, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही तंत्रज्ञानावर बंदी घातलेली नाही. मात्र, ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे डीजे किंवा डॉल्बीपेक्षा त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाची तीव्रता हा मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>मोठ्या आवाजाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधताना पिंगळे यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना उपरोधिक पद्धतीने एक प्रयोग करण्याचा सल्ला दिला. मंडळांना मोठ्या आवाजात डॉल्बी वाजविण्याची परवानगी हवी असेल, तर मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या घरातील आजी-आजोबा किंवा वृद्ध व्यक्तींना स्पीकरसमोर तासभर बसवावे. अध्यक्ष स्वतः अतिवरिष्ठ असतील तर त्यांनी स्वतः स्पीकरसमोर बसावे आणि त्यानंतर मोठ्या आवाजाला परवानगी द्यावी का, याचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.</p>
<p>ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ही कोणत्याही एका घटकासाठी नसून समाजातील सर्व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून निश्चित करण्यात आली आहे. मोठ्या आवाजाचा परिणाम केवळ वयोवृद्धांवरच होत नाही, तर तरुणांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही त्याचा कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. गणेशोत्सवाचा उत्साह आणि परंपरा कायम ठेवताना नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळणे आवश्यक आहे, असे पिंगळे यांनी स्पष्ट केले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31847">डॉल्बीला परवानगी हवी तर डिजेसमोर आजी-आजोबांना बसवा; साताऱ्याचे एसपी पिंगळेंचा गणेश मंडळांना परखड सल्ला</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31847/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31833</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31833#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 07 Sep 2026 17:37:46 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31833</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावत असताना पुण्यातील निवृत्त शास्त्रज्ञाचा</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31833">सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा :</strong></span> कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावत असताना पुण्यातील निवृत्त शास्त्रज्ञाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. संजय कदम (वय ६५) असे मृत धावपटूचे नाव आहे. ते पुण्यातील सी-डॅकचे निवृत्त शास्त्रज्ञ होते. रविवारी ही घटना घडली.</p>
<p>कदम यांनी २१ किलोमीटरच्या स्पर्धेतील सुमारे १७ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते. अंतिम टप्प्यात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती आहे.</p>
<p>घटनेनंतर मॅरेथॉनसाठी तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने तत्काळ धाव घेत प्राथमिक उपचार सुरू केले. डॉ. रियाझ मुजावर यांनी त्यांना सीपीआर दिला. त्यानंतर कदम यांना तातडीने साताऱ्यातील पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. कौशिक पाटील आणि त्यांच्या पथकाने उपचार सुरू केले. तपासणीमध्ये त्यांच्या मुख्य रक्तवाहिनीत अडथळा असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली. मात्र, प्रकृती स्थिर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही दुपारच्या सुमारास त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.</p>
<p>संजय कदम यांचे चुलत भाऊ अनिल कदम यांनी सांगितले की, घरात संजय यांना प्रेमाने ‘तानाजी’ म्हणून हाक मारली जात असे. वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. वाढत्या वयामुळे लांब पल्ल्याच्या धावण्याचा वेग कमी करण्याचा सल्ला कुटुंबीयांकडून त्यांना अनेकदा देण्यात आला होता. मात्र, धावणे हा त्यांचा आवडता छंद होता आणि त्यातून त्यांना मोठा आनंद मिळत असे. अखेरच्या क्षणापर्यंत ते सक्रिय होते.</p>
<p>कदम यांच्या ९५ वर्षीय मातोश्री शांता कदम या आजारी असून व्हेंटिलेटरवर आहेत. मोठ्या मुलाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. संजय कदम यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.</p>
<p>सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे आयोजन २०१२ पासून दरवर्षी केले जाते. २१.१ किलोमीटरची ही स्पर्धा देशातील आव्हानात्मक मॅरेथॉनपैकी एक मानली जाते. सातारा शहरातून सुरू होणारी ही स्पर्धा कास पठाराच्या दिशेने चढणीचा मार्ग पार करून पुन्हा शहराकडे उतरते. समुद्रसपाटीपासून सुमारे ६५० मीटर उंचीवरून सुरू होणाऱ्या या मार्गात चढ-उताराचे आव्हान धावपटूंसमोर असते. यंदा स्पर्धेचे १५ वे वर्ष असून देशभरातून सुमारे ८ हजार ८०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31833">सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31833/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>गैरसोयींविरोधात आवाज उठवला; कॉलेजमधून काढण्याच्या धमकीचा आरोप, साताऱ्यात विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31821</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31821#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 07 Sep 2026 13:34:45 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31821</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा शहरातील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजच्या महिला वसतिगृहातील कथित गैरसोयी आणि त्याविरोधात आवाज</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31821">गैरसोयींविरोधात आवाज उठवला; कॉलेजमधून काढण्याच्या धमकीचा आरोप, साताऱ्यात विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सातारा शहरातील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजच्या महिला वसतिगृहातील कथित गैरसोयी आणि त्याविरोधात आवाज उठविणाऱ्या विद्यार्थिनीवर टाकण्यात आलेल्या मानसिक दबावाच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील स्वच्छतागृहांच्या गैरसोयींबाबत तक्रार करून त्याचा व्हिडिओ तयार केल्याचा राग मनात धरून विद्यार्थिनीला मानसिक त्रास देण्यात आला आणि महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कथित दबावाला कंटाळून सृष्टी भानुदास बिरामणे (१८) या विद्यार्थिनीने २ सप्टेंबर २०२६ रोजी वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.</p>
<p>या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी विद्यार्थिनीच्या पालकांच्या तक्रारीवरून महिला वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री जकाते, महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश साळुंखे तसेच हॉस्टेल कमिटीतील संबंधित सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाची चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे.</p>
<p>वसतिगृहातील गैरसोयींविरोधात विद्यार्थिनीचा आवाज</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी बिरामणे ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि महिला वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील स्वच्छतागृहांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याची तसेच विद्यार्थिनींना विविध गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार तिने प्रशासनाकडे केल्याचे सांगण्यात येते. या गैरसोयींची परिस्थिती दाखविण्यासाठी तिने मोबाईलमध्ये व्हिडिओही तयार केला होता.</p>
<p>विद्यार्थिनीने वसतिगृहातील समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तिच्यावर प्रशासनाकडून दबाव आणला गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित व्हिडिओ आणि तक्रारीमुळे वसतिगृह प्रशासन नाराज झाले. त्यानंतर सृष्टीला मानसिक त्रास देण्यात आला तसेच महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.</p>
<p>&#8216;कॉलेजमधून काढून टाकू&#8217; अशी धमकी दिल्याचा आरोप</p>
<p>वसतिगृहाच्या रेक्टर आणि हॉस्टेल कमिटीतील सदस्यांकडून सृष्टीवर सातत्याने दबाव आणला जात असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तक्रार मागे घेण्यासाठी अथवा वसतिगृहातील गैरसोयींबाबत आवाज न उठविण्यासाठी तिच्यावर दबाव आणला गेला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.</p>
<p>दरम्यान, महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी आणि मानसिक त्रासामुळे सृष्टी तणावाखाली होती, असा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित विद्यार्थिनीचे कुटुंबीय, सहकारी विद्यार्थिनी, वसतिगृह प्रशासन आणि महाविद्यालयातील संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.</p>
<p>तिसऱ्या मजल्यावरून उडी; दुर्दैवी अंत</p>
<p>२ सप्टेंबर रोजी सृष्टीने महिला वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतल्याची घटना घडली. या घटनेने वसतिगृहात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.</p>
<p>अवघ्या १८ वर्षांच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीने वसतिगृहातील गैरसोयींबाबत आवाज उठविल्यानंतरच तिच्यावर दबाव वाढला आणि त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.</p>
<p>प्राचार्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह</p>
<p>या प्रकरणात महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश साळुंखे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थिनीने वसतिगृहातील समस्यांबाबत तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तिच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली का? तिच्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती प्राचार्यांना होती का? असल्यास त्यावर कोणती कारवाई करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.</p>
<p>प्राथमिक तपासाच्या आधारे प्राचार्यांसह रेक्टर आणि हॉस्टेल कमिटीतील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्याने संबंधित व्यक्ती दोषी ठरतात असे नाही. तपासाअंती उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य बाबींच्या आधारे पुढील कारवाई निश्चित होणार आहे.</p>
<p>पोलिसांकडून सखोल तपास सुरू</p>
<p>सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थिनीने तयार केलेला कथित व्हिडिओ, तिच्या तक्रारी, मोबाईलमधील उपलब्ध माहिती, सहकारी विद्यार्थिनींचे जबाब तसेच महाविद्यालयीन प्रशासनाशी झालेला पत्रव्यवहार यासह विविध बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.</p>
<p>सृष्टीवर मानसिक दबाव आणला गेला होता का, तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती का, तिच्या तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले का आणि या सर्व घटनांचा तिच्या मृत्यूशी थेट संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.</p>
<p>दरम्यान, शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मूलभूत सुविधांच्या तक्रारी गांभीर्याने घेणे, त्यांची निष्पक्ष चौकशी करणे आणि विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याची चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे. एका तरुण विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित होण्यासाठी पोलिस तपास निष्पक्ष आणि सखोल होणे महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31821">गैरसोयींविरोधात आवाज उठवला; कॉलेजमधून काढण्याच्या धमकीचा आरोप, साताऱ्यात विद्यार्थिनीची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31821/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>फेक लिंक, ओटीपी अन् बनावट अकाउंटच्या जाळ्यापासून सावधान! अंबवडेत विद्यार्थ्यांकडून नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31781</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31781#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 06 Sep 2026 11:08:41 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31781</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर, ऑनलाइन खरेदी, मोबाईल बँकिंग, यूपीआय तसेच सोशल मीडिया यामुळे नागरिकांचे</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31781">फेक लिंक, ओटीपी अन् बनावट अकाउंटच्या जाळ्यापासून सावधान! अंबवडेत विद्यार्थ्यांकडून नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा : </strong></span>डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर, ऑनलाइन खरेदी, मोबाईल बँकिंग, यूपीआय तसेच सोशल मीडिया यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सायबर गुन्हेगारांकडून विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक तसेच वैयक्तिक माहिती मिळविण्याचे प्रकार वाढत असल्याने डिजिटल व्यवहार करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी इंटरनॅशनल फिटनेस स्टुडिओ, अंबवडे येथे विशेष जनजागृती उपक्रम घेण्यात आला.</p>
<p>कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्च, वर्ये, सातारा येथील विद्यार्थी प्रतिक ठोंबरे आणि साहिल भैसे यांनी क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने हा ‘इम्पॅक्ट अॅक्टिव्हिटी’ उपक्रम राबविला. या वेळी जिममध्ये उपस्थित नागरिकांशी संवाद साधून सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, त्यापासून बचाव करण्याच्या पद्धती आणि फसवणूक झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.</p>
<p>फेक लिंकपासून ओटीपीपर्यंत सावधानतेचा इशारा</p>
<p>सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना आकर्षक संदेश, बँक खाते बंद होण्याची भीती, केवायसी अपडेट करण्याचे आवाहन, विविध ऑफर, बक्षिसे किंवा बनावट सरकारी योजनांच्या नावाखाली लिंक पाठविल्या जातात. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला विद्यार्थ्यांनी दिला.</p>
<p>तसेच ओटीपी, एटीएम पिन, यूपीआय पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये, याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोनवरून अशा प्रकारची गोपनीय माहिती मागत नाही, हेही नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.</p>
<p>बनावट सोशल मीडिया खात्यांपासूनही सावध राहण्याचे आवाहन</p>
<p>सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या नावाने बनावट खाते तयार करून त्याच्या मित्र-नातेवाईकांकडे पैशांची मागणी करणे, संशयास्पद लिंक पाठविणे किंवा वैयक्तिक माहिती मिळविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया खात्यांची गोपनीयता सुरक्षित ठेवणे, मजबूत पासवर्ड वापरणे आणि शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.</p>
<p>फसवणूक झाल्यास घाबरू नका</p>
<p>सायबर फसवणुकीला बळी पडल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य ती पावले उचलणे महत्त्वाचे आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास संबंधित बँकेशी त्वरित संपर्क साधणे, व्यवहाराची माहिती सुरक्षित ठेवणे तसेच अधिकृत सायबर गुन्हे तक्रार यंत्रणेकडे तक्रार नोंदविणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.</p>
<p>नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी ‘सावधगिरी हीच सुरक्षितता’ या तत्त्वाचा अवलंब करावा. कोणताही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी संदेश, लिंक किंवा समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>प्रश्नोत्तरांतून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग</p>
<p>उपक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित सायबर फसवणुकीच्या विविध घटनांबाबत प्रश्न विचारले. दैनंदिन जीवनात घडू शकणाऱ्या प्रसंगांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. त्यामुळे सायबर सुरक्षेविषयीची माहिती केवळ व्याख्यानापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनाशी जोडली गेली.</p>
<p>सायबर सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा संवादात्मक उपक्रमांची आवश्यकता असून, डिजिटल व्यवहार वाढत असताना प्रत्येकाने सायबर सुरक्षेचे मूलभूत नियम समजून घेणे गरजेचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.<br />
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना एम. जे. पंडित सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31781">फेक लिंक, ओटीपी अन् बनावट अकाउंटच्या जाळ्यापासून सावधान! अंबवडेत विद्यार्थ्यांकडून नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31781/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सातारा हादरले! वॉशरूममधील अश्‍लील शब्दांनंतर पालकांना बोलावण्याची चर्चा; तरुणीची तिसर्‍या मजल्यावरून उडी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31650</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31650#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 03 Sep 2026 07:53:13 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सातारा]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31650</guid>

					<description><![CDATA[<p>सातारा प्रतिनिधी सातारा : येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीने तिसर्‍या मजल्यावरून उडी घेऊन</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31650">सातारा हादरले! वॉशरूममधील अश्‍लील शब्दांनंतर पालकांना बोलावण्याची चर्चा; तरुणीची तिसर्‍या मजल्यावरून उडी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सातारा प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सातारा :</strong></span> येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीने तिसर्‍या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सृष्टी भानुदास बिरामणे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती फूड अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. या घटनेने महाविद्यालय परिसरासह वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे.</p>
<p>प्राथमिक माहितीनुसार, वसतिगृहातील वॉशरूममध्ये काही आक्षेपार्ह शब्द लिहिल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना महाविद्यालय प्रशासनाकडून बोलावण्यात येणार असल्याची चर्चा वसतिगृहात सुरू होती. या चर्चेमुळे सृष्टी मानसिकदृष्ट्या त्रस्त आणि भयभीत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ पालकांना बोलावण्याच्या चर्चेमुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले की त्यामागे अन्य काही कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.</p>
<p>दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळावरून चिठ्ठी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत नेमके काय नमूद आहे, तसेच त्यातून सृष्टीच्या आत्महत्येच्या कारणाबाबत काही माहिती मिळते का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. सृष्टी कोणत्या मानसिक दबावाखाली होती, याचाही तपास केला जात आहे.</p>
<p>घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आवश्यक कारवाई करून तपास सुरू केला असून, महाविद्यालय प्रशासन, वसतिगृह व्यवस्थापन तसेच विद्यार्थिनींकडून माहिती घेतली जात आहे. सृष्टीच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31650">सातारा हादरले! वॉशरूममधील अश्‍लील शब्दांनंतर पालकांना बोलावण्याची चर्चा; तरुणीची तिसर्‍या मजल्यावरून उडी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31650/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
