<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>नाशिक Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/nashik/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/nashik</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Mon, 31 Aug 2026 10:03:00 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.1.1</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/08/cropped-SATARA-PRATINIDHI-scaled-1-32x32.png</url>
	<title>नाशिक Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/nashik</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>समृद्धी महामार्गावर आजपासून सात दिवस वाहतूक ब्लॉक; सिन्नर-इगतपुरी प्रवाशांनो, ‘या’ वेळेत प्रवास टाळा!</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31512</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31512#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 31 Aug 2026 10:03:00 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31512</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31512">समृद्धी महामार्गावर आजपासून सात दिवस वाहतूक ब्लॉक; सिन्नर-इगतपुरी प्रवाशांनो, ‘या’ वेळेत प्रवास टाळा!</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) अंतर्गत गॅन्ट्री उभारणी आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.</p>
<p>महामार्ग पोलिसांकडून आवश्यक परवानगी घेऊन हे काम करण्यात येत असून, संबंधित कालावधीत विशिष्ट दिशेची वाहतूक दररोज एक तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सिन्नर, भरवीर आणि इगतपुरी परिसरातून समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या वेळेचे नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.</p>
<p>३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान सिन्नर-भरवीर मार्गावर ब्लॉक</p>
<p>पहिल्या टप्प्यात सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.</p>
<p>&#8211; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर<br />
&#8211; दुपारी १२ ते १ : मुंबई दिशेची वाहतूक बंद<br />
&#8211; दुपारी ३ ते ४ : नागपूर दिशेची वाहतूक बंद</p>
<p>या कालावधीत संबंधित दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांना महामार्गावर पुढे जाता येणार नसल्याने प्रवाशांनी प्रवासाची वेळ बदलणे किंवा उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे.</p>
<p>४, ५ आणि ७ सप्टेंबरला भरवीर-इगतपुरीदरम्यान वाहतूक बंद</p>
<p>दुसऱ्या टप्प्यात भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज या मार्गावर गॅन्ट्री उभारणीचे काम केले जाणार आहे.</p>
<p>&#8211; ४, ५ आणि ७ सप्टेंबर<br />
&#8211; दुपारी १२ ते १ : मुंबई दिशेची वाहतूक बंद<br />
&#8211; दुपारी ३ ते ४ : नागपूर दिशेची वाहतूक बंद</p>
<p>या वेळेत संबंधित दिशेची वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.</p>
<p>प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?</p>
<p>समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे वाहतूक ब्लॉकच्या कालावधीत वाहनचालकांनी संबंधित मार्गावर पोहोचण्याची वेळ लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. विशेषतः मुंबई किंवा नागपूरच्या दिशेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी या एक तासाच्या ब्लॉकमुळे होणारा संभाव्य विलंब लक्षात घेऊन अतिरिक्त वेळ राखून ठेवावा.</p>
<p>वाहतूक ब्लॉकच्या काळात वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी मार्गाची स्थिती आणि संबंधित सूचनांची माहिती घेणे फायदेशीर ठरणार आहे.</p>
<p>अपघात रोखण्यासाठी ‘आयटीएमएस’ची मदत</p>
<p>समृद्धी महामार्गावर उभारण्यात येत असलेली इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण आणि देखरेख प्रणाली आहे. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतुकीमध्ये शिस्त आणणे आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, हा या यंत्रणेचा प्रमुख उद्देश आहे.</p>
<p>एमएसआरडीसीकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर आयटीएमएस कार्यान्वित करण्यात येत आहे. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारित असून, महामार्गावरील विविध ठिकाणी बसविण्यात येणारे हाय-डेफिनिशन कॅमेरे, सेन्सर्स आणि नियंत्रण कक्ष यांचे एकत्रित नेटवर्क त्यामध्ये कार्यरत असते.</p>
<p>प्रत्येक किलोमीटरवर सीसीटीव्हीची नजर</p>
<p>समृद्धी महामार्गावर दिवस-रात्र स्पष्ट चित्रण करणारे कॅमेरे बसविण्याचे काम करण्यात येत आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महामार्गावरील वाहनांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवता येणार आहे.</p>
<p>आयटीएमएसच्या मदतीने १७ हून अधिक प्रकारच्या वाहतूक नियमभंगांवर नजर ठेवता येणार आहे. यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन, चुकीच्या लेनमधून वाहन चालविणे, बेकायदेशीर पार्किंग, वाहन चालविताना मोबाइलचा वापर, सीट बेल्ट न लावणे यांसारख्या नियमभंगांचा समावेश आहे.</p>
<p>नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहनाची नोंद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाऊ शकते. त्यानंतर महामार्ग पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) समन्वयातून ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.</p>
<p>प्रवाशांना नियोजनाचे आवाहन</p>
<p>गॅन्ट्री उभारणीचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात संबंधित दिशेची वाहतूक ठराविक वेळेत एका तासासाठी बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत विशेषतः दुपारी १२ ते १ आणि दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31512">समृद्धी महामार्गावर आजपासून सात दिवस वाहतूक ब्लॉक; सिन्नर-इगतपुरी प्रवाशांनो, ‘या’ वेळेत प्रवास टाळा!</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31512/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>चिठ्ठी प्रकरणात चौकशीसाठी बोलावले अन् १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेतला; दिंडोरीतील आश्रमशाळेत खळबळ</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31444</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31444#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 29 Aug 2026 08:14:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31444</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी नाशिक (दिंडोरी) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथे आश्रमशाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31444">चिठ्ठी प्रकरणात चौकशीसाठी बोलावले अन् १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेतला; दिंडोरीतील आश्रमशाळेत खळबळ</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक (दिंडोरी) :</strong> </span>नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथे आश्रमशाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हरिदास अंबादास शेखरे या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे दिंडोरी परिसरासह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.</p>
<p>मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरिदास याने शाळेतील एका विद्यार्थिनीला चिठ्ठी दिली होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याला मुख्याध्यापिकांच्या कार्यालयात बोलावून याबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर हरिदास मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.</p>
<p>घटनेची माहिती मिळताच हरिदासच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी संबंधित प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाइकांशी संवाद साधला. दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल्यानंतर परिस्थिती शांत झाली.</p>
<p>दरम्यान, हरिदासचा मृतदेह पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पथक करत आहे. विद्यार्थ्याने नेमक्या कोणत्या मानसिक अवस्थेत हे पाऊल उचलले, तसेच या प्रकरणात कोणाची काही भूमिका होती का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31444">चिठ्ठी प्रकरणात चौकशीसाठी बोलावले अन् १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेतला; दिंडोरीतील आश्रमशाळेत खळबळ</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31444/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>नाशिकला ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची; भविष्यातील युनिकॉर्न विद्यापीठातून घडवा : मुख्यमंत्री फडणवीस</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31414</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31414#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 29 Aug 2026 04:49:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31414</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी  नाशिक : केवळ पदवीधरांची संख्या वाढविण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित करणारी सक्षम परिसंस्था</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31414">नाशिकला ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची; भविष्यातील युनिकॉर्न विद्यापीठातून घडवा : मुख्यमंत्री फडणवीस</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी </strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक :</strong> </span>केवळ पदवीधरांची संख्या वाढविण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित करणारी सक्षम परिसंस्था विद्यापीठांनी निर्माण करावी. विद्यापीठांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग, नवोन्मेष आणि युनिकॉर्न निर्माण झाले पाहिजेत. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.</p>
<p>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या शिवनई (ता. दिंडोरी) येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.</p>
<p>जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्थेचे स्वरूप वेगाने बदलत असून शिक्षण, रोजगार आणि सेवा क्षेत्र एकमेकांपासून वेगळे ठेवता येणार नाहीत. त्यामुळे केवळ पदवीधारक तयार करण्याऐवजी रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण अधिक रोजगाराभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.</p>
<p>आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. भविष्यात अनेक पारंपरिक रोजगारांमध्ये बदल होणार असून त्याचवेळी नव्या संधीही निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारासाठी तयार करण्यावर विद्यापीठांनी भर द्यावा. नाशिक उपकेंद्राने डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.</p>
<p>नाशिकच्या विकासाला नवी गती</p>
<p>नाशिकच्या विकासक्षमतेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी कृषी, विशेषतः द्राक्ष उत्पादन व निर्यात, अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी सेवा, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स, लाइफ सायन्सेस आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील संधींचा उल्लेख केला. गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये विविध उत्पादन व औद्योगिक क्षेत्रांत सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>मुंबई, पुणे आणि नाशिक हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा त्रिकोण आहे. काही काळ नाशिकच्या औद्योगिक विकासाची गती मंदावली होती; मात्र आता नाशिक पुन्हा वेगाने पुढे जात आहे. पुढील पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.</p>
<p>नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून दर्जेदार आणि रोजगारक्षम मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल. आधुनिक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देत नाशिकच्या विकासाला या केंद्रातून नवी दिशा मिळेल. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.</p>
<p>१८ कोटींचा खर्च; अडीच लाख विद्यार्थ्यांना लाभ</p>
<p>शिवनई येथे नाशिक उपकेंद्रासाठी ६२ एकर जागा उपलब्ध झाली असून, त्यापैकी ४० एकर जागा सध्या उपकेंद्राच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे. नूतन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ ३३ हजार चौरस फूट असून इमारत, फर्निचर, संगणक आणि अन्य सुविधांसाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.</p>
<p>नाशिक जिल्ह्यासह दादरा-नगर हवेली आणि सिल्व्हासा हा उपकेंद्राचा कार्यक्षेत्रात समावेश आहे. उपकेंद्रांतर्गत १९६ महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था, सुमारे २ हजार ६०० शिक्षक आणि अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. दोन संशोधन केंद्रे कार्यरत असून एमबीए, बीबीए, मंदिर व्यवस्थापन आणि कार्यकारी एमबीए यांसारखे अभ्यासक्रम सुरू आहेत.</p>
<p>उपकेंद्रात ई-लायब्ररी, संगणक प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, सभागृह, विद्यार्थी सुविधा केंद्र तसेच रोजगार व प्रशिक्षण केंद्राच्या सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांचे स्थानांतरण व स्थलांतर प्रमाणपत्र, परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचे निराकरण यांसारख्या सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.</p>
<p>पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन केंद्रांचा विस्तार</p>
<p>नाशिक उपकेंद्राला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. तंत्रज्ञान आणि विधी विषयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच विविध विषयांसाठी संशोधन केंद्रे आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी आहे.</p>
<p>उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, असे सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.</p>
<p>मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक उपकेंद्राचा सर्वसामान्य विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी प्रास्ताविकात अत्याधुनिक शिक्षण व संशोधनाच्या माध्यमातून आदर्श उपकेंद्र उभारण्याचा विद्यापीठाचा मानस व्यक्त केला. नाशिक-पुणे शिक्षणाचा स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31414">नाशिकला ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची; भविष्यातील युनिकॉर्न विद्यापीठातून घडवा : मुख्यमंत्री फडणवीस</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31414/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाला मोठा धक्का! पाच वर्षांत ३६,२११ कंपन्यांना टाळे; नाशिकमधील ८४० कंपन्याही बंद</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/30492</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/30492#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 12 Aug 2026 18:04:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=30492</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी महाराष्ट्र हे देशाच्या औद्योगिक विकासाचे इंजिन असल्याचा दावा सातत्याने केला जात असला, तरी केंद्र सरकारने संसदेत</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30492">महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाला मोठा धक्का! पाच वर्षांत ३६,२११ कंपन्यांना टाळे; नाशिकमधील ८४० कंपन्याही बंद</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>महाराष्ट्र हे देशाच्या औद्योगिक विकासाचे इंजिन असल्याचा दावा सातत्याने केला जात असला, तरी केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यापुढेच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या कंपन्या बंद झाल्यामुळे नेमके किती कामगार बेरोजगार झाले, किती जणांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाचे पैसे अडकले, याचा एकत्रित आकडाच केंद्र सरकारकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.</p>
<p>खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्यामुळे महाराष्ट्रात उद्योग येत असल्याच्या घोषणांबरोबरच विद्यमान उद्योग किती टिकत आहेत आणि बंद पडणाऱ्या कंपन्यांमुळे किती रोजगार नष्ट होत आहेत, याचाही हिशेब सरकारने जनतेसमोर मांडण्याची गरज निर्माण झाली आहे.</p>
<p>मुंबई, पुणे, ठाण्यात सर्वाधिक कंपन्या बंद</p>
<p>महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक जिल्ह्यांमध्ये कंपन्या बंद होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मुंबई शहरात सर्वाधिक १२ हजार ९ कंपन्या, तर पुण्यात ६ हजार ४३३ आणि ठाण्यात ४ हजार ७०४ कंपन्या बंद किंवा नोंदणीतून वगळल्या गेल्या आहेत. नागपुरात १ हजार ४७८, नाशिकमध्ये ८४०, रायगडमध्ये ८२२ आणि संभाजीनगरमध्ये ६५४ कंपन्यांचा समावेश आहे.</p>
<p>नाशिकसारख्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात ८४० कंपन्या बंद होणे ही बाब विशेष चिंतेची ठरली आहे. नाशिकमध्ये नवीन उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या घोषणा होत असताना दुसरीकडे विद्यमान कंपन्या बंद होत असतील, तर या विरोधाभासाचे गांभीर्याने परीक्षण करण्याची वेळ आली आहे.</p>
<p>उद्योग बंद, पण कामगारांचे काय?</p>
<p>कंपनी बंद झाली की त्याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम कामगारांवर होतो. मात्र महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगार प्रभावित झाले, याची एकत्रित माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.</p>
<p>कंपन्या बंद झाल्यानंतर कामगारांना कायदेशीर देणी मिळाली का? किती कामगारांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली? उपदान आणि थकीत वेतनाचा किती हिस्सा अदा झाला? प्रभावित कामगारांच्या पुनर्वसनासाठी कोणती योजना राबवण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे मागण्यात आली होती.</p>
<p>केंद्राच्या म्हणण्यानुसार, खासगी कंपन्यांचे कामकाज बंद झाल्यामुळे प्रभावित कामगारांची माहिती मंत्रालयाकडे स्वतंत्रपणे राखली जात नाही. कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेत गेली किंवा परिसमापनात गेली, तर कामगारांचे दावे संबंधित कायदेशीर प्रक्रियेत हाताळले जातात. मात्र ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्यानंतर प्रत्यक्षात किती कुटुंबांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला, याचे चित्र मात्र अद्याप स्पष्ट नाही.</p>
<p>कोणत्या क्षेत्राला किती फटका?</p>
<p>कंपन्या बंद होण्यामध्ये सर्वाधिक फटका व्यवसाय सेवा क्षेत्राला बसल्याचे आकडेवारीतून दिसते. या क्षेत्रातील १४ हजार ६१३ कंपन्या बंद किंवा नोंदणीतून वगळल्या गेल्या आहेत.</p>
<p>त्यानंतर उत्पादन, खाणकाम व उत्खनन क्षेत्रातील ६ हजार ५८२, व्यापार क्षेत्रातील ४ हजार १९६, सामुदायिक, वैयक्तिक व सामाजिक सेवा क्षेत्रातील ३ हजार ३६१ आणि बांधकाम क्षेत्रातील २ हजार ३५६ कंपन्यांचा समावेश आहे.</p>
<p>वाहतूक, साठवणूक व दळणवळण क्षेत्रातील १ हजार ३३६, स्थावर मालमत्ता व भाडेपट्टा क्षेत्रातील १ हजार १४९, कृषी व संलग्न उपक्रमातील १ हजार १७८, वित्त क्षेत्रातील १ हजार १२ आणि वीज, वायू व पाणी क्षेत्रातील ३८७ कंपन्याही या आकडेवारीत आहेत. विमा क्षेत्रातील ४१ कंपन्या बंद किंवा वगळल्या गेल्या आहेत.</p>
<p>जिल्हानिहाय चित्र चिंताजनक</p>
<p>महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमधील बंद व नोंदणीतून वगळलेल्या कंपन्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे—</p>
<p>&#8211; मुंबई शहर : १२,००९<br />
&#8211; पुणे : ६,४३३<br />
&#8211; ठाणे : ४,७०४<br />
&#8211; नागपूर : १,४७८<br />
&#8211; नाशिक : ८४०<br />
&#8211; रायगड : ८२२<br />
&#8211; संभाजीनगर : ६५४<br />
&#8211; अहमदनगर : ३०८<br />
&#8211; जळगाव : २१५<br />
&#8211; सातारा : १९६</p>
<p>ही आकडेवारी केवळ कंपन्यांच्या नोंदणीच्या स्थितीचे चित्र दाखवते; त्यातून त्या सर्व कंपन्या प्रत्यक्ष उत्पादन किंवा सेवा बंद करूनच गेल्या होत्या, असा सरसकट निष्कर्ष काढता येत नाही. मात्र मोठ्या संख्येने कंपन्या रजिस्टरमधून वगळल्या जाणे किंवा परिसमापनाच्या प्रक्रियेत जाणे हा उद्योगव्यवस्थेच्या आरोग्याचा महत्त्वाचा संकेत नक्कीच मानला जातो.</p>
<p>नव्या उद्योगांबरोबर जुन्यांचे संरक्षण कधी?</p>
<p>महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचे आणि नवीन उद्योग सुरू होत असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत राज्यात किती नवीन कंपन्या स्थापन झाल्या, किती गुंतवणूक झाली आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले, याची तुलनात्मक आकडेवारीही जनतेसमोर येणे आवश्यक आहे.</p>
<p>एकीकडे नवीन उद्योगांसाठी गुंतवणूक परिषदा, सामंजस्य करार आणि मोठमोठ्या घोषणांचा धडाका सुरू असताना दुसरीकडे हजारो कंपन्या बंद होत असतील, तर उद्योग टिकविण्याचे धोरण किती प्रभावी आहे, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.</p>
<p>उद्योग सुरू करणे महत्त्वाचे आहेच; मात्र सुरू असलेले उद्योग टिकविणे, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करणे, गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवणे आणि रोजगाराचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे.</p>
<p>&#8216;केवळ घोषणा नकोत, रोजगार वाचवा&#8217;</p>
<p>या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी उद्योग बंद होण्याच्या आकडेवारीकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली.</p>
<p>“गेल्या पाच वर्षांत ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद झाल्याची अधिकृत आकडेवारी संसदेत समोर आली आहे. नाशिकमधील ८४० कंपन्यांचे बंद होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. उद्योग बंद होण्यामागची कारणे काय, त्यातून किती रोजगार गेले आणि प्रभावित कामगारांचे काय झाले, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. केवळ नवीन उद्योग आणण्याच्या घोषणा नकोत; विद्यमान उद्योग टिकले पाहिजेत, रोजगार वाचला पाहिजे आणि उद्योग बंद पडल्यास कामगारांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे,” असे वाजे यांनी म्हटले.</p>
<p>सरकारसमोर आता दुहेरी आव्हान</p>
<p>महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उद्योग आणि सेवा क्षेत्राचा मोठा आधार आहे. अशा परिस्थितीत हजारो कंपन्या बंद किंवा नोंदणीतून वगळल्या जाण्याची बाब केवळ कंपन्यांच्या नोंदणीपुरती मर्यादित न राहता गुंतवणूक, रोजगार, कामगारांचे उत्पन्न आणि स्थानिक अर्थव्यवस्था या सर्वांशी जोडलेली आहे.</p>
<p>त्यामुळे सरकारने कंपन्या बंद होण्यामागील कारणांचे स्वतंत्र विश्लेषण करणे, कोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला हे स्पष्ट करणे, प्रभावित कामगारांची वास्तविक संख्या शोधणे आणि त्यांच्या कायदेशीर देणी व पुनर्वसनाबाबत ठोस यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.</p>
<p>महाराष्ट्रात नवीन उद्योग किती आले, हा प्रश्न महत्त्वाचा आहेच; पण त्याचवेळी महाराष्ट्रातील जुने उद्योग किती टिकले, किती बंद पडले आणि त्या बदल्यात किती रोजगार निर्माण अथवा नष्ट झाले, याचा संपूर्ण हिशेबही आता सरकारने जनतेसमोर मांडण्याची वेळ आली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30492">महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाला मोठा धक्का! पाच वर्षांत ३६,२११ कंपन्यांना टाळे; नाशिकमधील ८४० कंपन्याही बंद</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/30492/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सावळा घाटात भीषण दुर्घटना; दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चक्काचूर, ४ जण ठार</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/29039</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/29039#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 03:39:35 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=29039</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पेठ-दिंडोरी सीमेवरील सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला, तर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/29039">सावळा घाटात भीषण दुर्घटना; दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चक्काचूर, ४ जण ठार</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>नाशिक जिल्ह्यातील पेठ-दिंडोरी सीमेवरील सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. घाटातील तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने मागून भरधाव ट्रकने इको कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार समोरील ट्रकवर आदळून दोन ट्रकांच्या कात्रीत सापडली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळा घाटातील उतारावरून इको कार जात असताना तिच्या मागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. धडकेच्या जोरामुळे कार समोरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या मागील भागावर आदळली. दोन अवजड वाहनांच्या मध्ये कार अडकल्याने तिचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.</p>
<p>या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा चारवर पोहोचला असून एका जखमीवर अद्याप उपचार सुरू आहेत.</p>
<p>अपघातानंतर सावळा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला. काही तासांच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.</p>
<p>प्राथमिक तपासानुसार, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/29039">सावळा घाटात भीषण दुर्घटना; दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चक्काचूर, ४ जण ठार</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/29039/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>नाशिकवरील ढगफुटीचा धोका टळला; पावसाचा भोवरा अकोलेकडे सरकला, प्रशासनाचा हाय अलर्ट कायम</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/28622</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/28622#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 07 Jul 2026 06:20:00 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=28622</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी नाशिक जिल्ह्यासाठी ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण प्रशासन सतर्क झाले होते.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/28622">नाशिकवरील ढगफुटीचा धोका टळला; पावसाचा भोवरा अकोलेकडे सरकला, प्रशासनाचा हाय अलर्ट कायम</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी नाशिक जिल्ह्यासाठी ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण प्रशासन सतर्क झाले होते. विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक तालुक्याचा पश्चिम भाग, पेठ आणि दिंडोरी येथे कमी वेळेत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दिवसभरातील हवामानाच्या घडामोडींनंतर नाशिकवरील संभाव्य मोठे संकट टळल्याचे चित्र समोर आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, ढगफुटीसदृश्य पावसाला कारणीभूत ठरणारा वातावरणातील भोवरा (व्हॉर्टेक्स) आता उत्तरेकडे गुजरातच्या सुरत परिसराच्या दिशेने, तर दक्षिणेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याकडे सरकल्याचे दिसून येत आहे.</p>
<p>यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यावरील तातडीचा धोका काहीसा कमी झाला असला, तरी घाटमाथा आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे. नदी-नाले, धरणे आणि डोंगराळ भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.</p>
<p>हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात या वातावरणीय प्रणालीमुळे सुमारे ४५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर हा भोवरा त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिककडे सरकेल आणि काही भागांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हवामानातील बदलांमुळे या प्रणालीने दिशा बदलली. परिणामी, नाशिकमध्ये अपेक्षेइतका अतिवृष्टीचा तडाखा बसला नाही. आता या प्रणालीचा परिणाम प्रामुख्याने गुजरात आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसरात जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अकोले तालुक्यासह लगतच्या डोंगराळ भागात प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.</p>
<p>दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी गडावरील दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.</p>
<p>अरबी समुद्रावर सक्रिय झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. या हवामान प्रणालीमुळे काही भागांत अल्पावधीत ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. संभाव्य अतिवृष्टीचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत सखल भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण भागांतील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे, आवश्यक असल्यास स्थलांतराची तयारी ठेवणे आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.</p>
<p>नाशिकवरील तातडीचा ढगफुटीचा धोका कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवामान विभागाने पुढील काही तास उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/28622">नाशिकवरील ढगफुटीचा धोका टळला; पावसाचा भोवरा अकोलेकडे सरकला, प्रशासनाचा हाय अलर्ट कायम</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/28622/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीला वेग; भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचना</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/27234</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/27234#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 11 Jun 2026 11:48:05 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=27234</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/27234">सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीला वेग; भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचना</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सदानंद दाते यांनी गुरुवारी नाशिकमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नियोजनबद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.</p>
<p>नाशिक दौऱ्यावर आलेल्या पोलीस महासंचालक दाते यांच्या उपस्थितीत नाशिक पोलीस आयुक्तालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीसंदर्भात सविस्तर आढावा बैठक पार पडली. बैठकीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजयसिंह येनपुरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वामी यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.</p>
<p>बैठकीत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील कुंभमेळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचे सादरीकरण करण्यात आले. कुंभमेळ्यातील प्रमुख स्नान पर्वणी, शाही मार्ग, वाहतूक व्यवस्था, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, सीसीटीव्ही नेटवर्क, नियंत्रण कक्ष आणि विविध संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.</p>
<p>तसेच ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या पर्वणीच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा आराखडा सादर करण्यात आला. भाविकांची गर्दी सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, पार्किंग व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.</p>
<p>सादरीकरणानंतर मार्गदर्शन करताना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असल्याचे नमूद करत भाविकांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले. गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, हरवलेल्या व्यक्तींचा शोध, दहशतवादविरोधी उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यावर त्यांनी भर दिला.</p>
<p>भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सर्व विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन करावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा आणि वेळोवेळी सराव कवायती घेऊन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.</p>
<p>दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीसाठी पोलीस प्रशासनाने आतापासूनच व्यापक नियोजन सुरू केले असून सुरक्षा, वाहतूक आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने विविध विभागांमध्ये समन्वय साधून कृती आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आगामी काळात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या संयुक्त बैठका घेऊन नियोजन अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/27234">सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीला वेग; भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचना</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/27234/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>VIDEO&#124; पासिंग आऊट परेडनंतर लष्करी वैमानिकाचे प्रेयसीला प्रपोज; नाशिकमधील व्हिडिओ चर्चेत</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/26739</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/26739#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 02 Jun 2026 16:53:28 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=26739</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडनंतर एका नव्या लष्करी वैमानिकाने आपल्या प्रेयसीला सर्वांसमोर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26739">VIDEO| पासिंग आऊट परेडनंतर लष्करी वैमानिकाचे प्रेयसीला प्रपोज; नाशिकमधील व्हिडिओ चर्चेत</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये झालेल्या पासिंग आऊट परेडनंतर एका नव्या लष्करी वैमानिकाने आपल्या प्रेयसीला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रसेवेची शपथ घेतल्यानंतर आणि प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर घडलेला हा प्रसंग उपस्थितांसाठी विशेष ठरला.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="550" data-dnt="true">
<p lang="en" dir="ltr"><a href="https://x.com/hashtag/WATCH?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#WATCH</a> | Maharashtra: The passing out parade at the Combat Army Aviation Training School in Nashik, concluded on an emotional note for a couple as Captain Bharat Bhardwaj proposed marriage to his partner. <a href="https://t.co/8Un1ZNBP1F">pic.twitter.com/8Un1ZNBP1F</a></p>
<p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://x.com/ANI/status/2061739907320860704?ref_src=twsrc%5Etfw">June 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>भारत भारद्वाज यांनी लष्करी लढाऊ वैमानिक म्हणून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. पासिंग आऊट परेडनंतर कुटुंबीय, सहकारी अधिकारी आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रेयसी आरुषीला एका लढाऊ हेलिकॉप्टरजवळ बोलावले. पुढे काय होणार आहे, याची कल्पना नसलेल्या आरुषीसमोर भारत यांनी अचानक गुडघ्यावर बसून अंगठी देत विवाहाची मागणी घातली.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="550" data-dnt="true">
<p lang="en" dir="ltr">Her body language says otherwise. She is just waiting for the day to get over.</p>
<p>&mdash; Gaurav Gupta (@Tech_StartupGuy) <a href="https://x.com/Tech_StartupGuy/status/2061762523712663596?ref_src=twsrc%5Etfw">June 2, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>“तू माझ्याशी लग्न करशील का?” असा प्रश्न भारत यांनी विचारताच आरुषी काही क्षण आश्चर्यचकित झाली. त्यानंतर तिने होकार देत भारत यांना मिठी मारली. या प्रसंगानंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.</p>
<p>या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सहकारी अधिकारी आणि मित्रांनी चित्रित केला असून तो विविध सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेकांनी या क्षणाचे कौतुक करत नव्या प्रवासासाठी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.</p>
<p>दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करताना भारत म्हणाले, “सेवेत अधिकारी म्हणून आम्हाला सलामी मिळते आणि ती द्यावीही लागते. मात्र घरातील खरी जबाबदारी पत्नी सांभाळते. त्यामुळे ही माझ्याकडून तिच्यासाठी प्रेमाची खास सलामी होती.”</p>
<p>आरुषीनेही या प्रस्तावाबाबत आनंद व्यक्त करत, “अशा प्रकारच्या सरप्राईजची मला अजिबात अपेक्षा नव्हती. हा क्षण माझ्यासाठी कायम स्मरणात राहील,” असे सांगितले.</p>
<p>लष्करी शिस्त, करिअरमधील महत्त्वाचा टप्पा आणि वैयक्तिक आयुष्यातील नव्या सुरुवातीचा संगम घडवणारा हा प्रसंग सध्या सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26739">VIDEO| पासिंग आऊट परेडनंतर लष्करी वैमानिकाचे प्रेयसीला प्रपोज; नाशिकमधील व्हिडिओ चर्चेत</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/26739/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>जेवण आवडले नाही म्हणून पत्नीवर उकळती आमटी ओतली; पतीसह सासूवर गुन्हा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/26598</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/26598#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 30 May 2026 12:50:05 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=26598</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी नाशिक : पत्नीने बनवलेले जेवण आवडले नाही या कारणावरून संतापलेल्या पतीने तिच्यावर उकळती आमटी ओतून गंभीर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26598">जेवण आवडले नाही म्हणून पत्नीवर उकळती आमटी ओतली; पतीसह सासूवर गुन्हा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>नाशिक : पत्नीने बनवलेले जेवण आवडले नाही या कारणावरून संतापलेल्या पतीने तिच्यावर उकळती आमटी ओतून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना शहरातील कोणार्क नगर परिसरात घडली. या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय विवाहित महिला कोणार्क नगरमधील रुक्मिणी लॉन्स परिसरात पती आणि सासूसोबत राहते. नेहमीप्रमाणे तिने घरातील जेवणासाठी आमटी तयार केली होती. पती घरी आल्यानंतर त्याला जेवण वाढण्यात आले. मात्र आमटी पाहताच त्याने नाराजी व्यक्त केली आणि घरात वादाला सुरुवात झाली.</p>
<p>तक्रारीनुसार, यावेळी सासूनेही पतीला चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पतीचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर उकळत्या आमटीचे भांडे तिच्या अंगावर ओतल्याने ती गंभीररित्या भाजली.</p>
<p>घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.</p>
<p>पीडित महिलेच्या तक्रारीवरून अडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.</p>
<p>घरगुती कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26598">जेवण आवडले नाही म्हणून पत्नीवर उकळती आमटी ओतली; पतीसह सासूवर गुन्हा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/26598/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>चांदवड कांदा आंदोलन चिखळलं! मविआच्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमक्या मागण्या काय?</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/26414</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/26414#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 26 May 2026 14:33:09 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=26414</guid>

					<description><![CDATA[<p>नाशिक प्रतिनिधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चांदवड येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26414">चांदवड कांदा आंदोलन चिखळलं! मविआच्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमक्या मागण्या काय?</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नाशिक प्रतिनिधी</strong></span></p>
<p>कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चांदवड येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.</p>
<p>शेतकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दराने करावी आणि यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल पंधराशे रुपयांचे अनुदान द्यावे.</p>
<p>आंदोलनात विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती<br />
या महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.</p>
<p>नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.</p>
<p>&#8220;सरकारकडून कांदा उत्पादकांची दिशाभूल&#8221;</p>
<p>आंदोलनावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. &#8220;शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकार भाव जाहीर करत आहे, पण प्रत्यक्षात खरेदी होत नाही. केवळ घोषणा करून काही उपयोग नाही,&#8221; असे ते म्हणाले.</p>
<p>सरकारने एखाद्या शेतकऱ्याला जाहीर केलेला भाव दिल्याची पावती दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.</p>
<p>&#8220;कांद्याला किमान 24 रुपये भाव द्या&#8221;<br />
आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका करत कांद्याला किमान 24 रुपये प्रतिकिलो दर देण्याची मागणी केली. &#8220;2023 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याला 24 रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता निवडणूक संपल्यानंतर दर कमी करण्यात आले,&#8221; असा आरोप त्यांनी केला.आंदोलनानंतर सरकारने साडेपंधरा रुपयांचा दर जाहीर केला असला तरी त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>&#8220;शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही&#8221;<br />
रोहित पवार म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याचा उत्पादन खर्च 18 ते 19 रुपये प्रतिकिलोपर्यंत जात आहे. &#8220;शेतकऱ्यांचा निम्मा खर्चही निघत नाही. त्यामुळे कांद्याला किमान 24 रुपये भाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांनी जगायचे कसे?&#8221; असा सवाल त्यांनी उपस्थित केला.</p>
<p>तसेच नाफेडने कांद्याची खरेदी वाढवून तो परदेशात निर्यात करावा आणि यापूर्वी कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.</p>
<p>&#8220;सत्ताधारी विधान परिषद जागांसाठी व्यस्त&#8221;<br />
सत्ताधारी पक्षावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, &#8220;एकीकडे शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी नेते विधान परिषदेच्या जागांवर चर्चा करण्यात व्यस्त आहेत.&#8221; शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारने तातडीने मदत करावी आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असेही त्यांनी म्हटले.</p>
<p>रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ ताब्यात<br />
दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमदार रोहित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर आंदोलन आणखी चिघळल्याचे दिसून आले. आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26414">चांदवड कांदा आंदोलन चिखळलं! मविआच्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमक्या मागण्या काय?</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/26414/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
