
पुणे प्रतिनिधी
पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात भरधाव कारने टपरीवर चहा घ्यायला आलेल्या १२ जणांना उडवलं आहे. १२ विद्यार्थी हे एमपीएसीचे उमेदवार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील भावे शाळेजवल अपघात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकील मध्यवर्ती भागात असलेल्या भावे हायस्कूलजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. टपरीवर चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना उडवलं आहे. या अपघातात जखमी झालेल्या उमेदवारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या उमेदवारांना मोडक आणि संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
परिसरात हळहळ कारचालक पाोलिसांच्या ताब्यात
पुण्यात १२ जणांना उडवणारा कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. या चालकाने कारवरील नियंत्रण गमावल्यानंतर १२ जणांना उडवलं. पोलिसांनी या कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी तातडीने अपघातस्थळावरील परिस्थती हाताळली.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील भवानी पेठेतील भावे शाळेजवळ आज शनिवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्यातील श्री नाथसाई अमृततुल्य या चहाच्या दुकानाजवळ हा अपघात घडला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने गाडीवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या लोकांना धडक दिली. तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांनाही धडक दिली. या अपघातात १२ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पोलिसांनी २७ वर्षीय आरोपी चालक जयराम मुळे याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवला आहे.