मुंबई प्रतिनिधी
राज्यातील मागील काही दिवसांपासून विदर्भ मराठवाड्यात उष्णतेचा पारा 40 अंशाच्या पार झाला असून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आहे
अनेक जिल्ह्यांमध्ये बदलतं हवामान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाची नोंद झाली होती. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे फळबागांचा मोठं नुकसान झालं.
पण काही जिल्हे असेही आहेत, जिथे अजूनही कोरड्या हवामानाची स्थिती नोंदवली जात आहे. काल शनिवारी पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आज 20 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
भारतीय हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर,सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरडं हवामान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूरमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज बांधण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूरमध्ये वादळ धडकणार असून 30-40 किमी प्रति तास वेगाने वारेही वाहू शकतात. तसच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही.


