पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे,भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस कवायत मैदान शिवाजीनगर येथे त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज, हा विचार घेऊन देशाने गेल्या ७५ वर्षाची गौरवशाली वाटचाल केली. या ७५ वर्षांत देशासमोर अनेक संकटे आली, आव्हाने निर्माण झाली, परंतु देश कुणापुढे झुकला नाही, वाकला नाही, डगमगला नाही. भक्कम उभा राहिला, असे गौरव उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
यावेळी आ. बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पी एम आर डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी- कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले, शेकडो वर्षाच्या पारतंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्या समोर अनेक संकटे, आव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा २६ जानेवारी १९५० ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्वीकारून आपण निश्चित केली. तेव्हापासून ७५ वर्षा देशासमोरच्या प्रत्येक संकटाला, आव्हानाला, एकजुटीने, निर्धारण समोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं .
देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, संविधान, देशातील लोकशाही, देशाच्या सीमा, सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्र आणि प्राणांचं बलिदान दिलं. अनेक कुटुंबाने सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्याग बलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. देशांतर्गत कितीही मतभेद असले तरी, देशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहे. ही भावना गेल्या ७५ वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशान स्वीकारलेला सर्व धर्म समभावाच्या विचाराचं बळ आहे. गेल्या ७५ वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली. याचं श्रेय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला, राजघटनेवरच्या लोकशाही वरच्या देशवासीयांच्या विश्वासाला आहे.
देशानं गेल्या ७५ वर्षात, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कला क्रीडा साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. प्रगतीचे श्रेय ७५ वर्षाच्या काळात देशाच्या सर्वच क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली. कार्यकर्त्यांनी जी साथ दिली त्यांच्या त्या मेहनतीला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर) पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत, हे पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृती, कला समृद्धीचा गौरव आहे. अशा शब्दात श्री पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले. केंद्रीय गृह मंत्रालयाचे वतीने पोलीस अग्निशमनपदक तसेच सेवा पदक शौर्य पदक तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार व तसेच राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही अभिनंदन केले. यावेळी समाज कल्याण विभागाच्यावतीने पालकमंत्री श्री अजित पवार यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उल्लेखनीय सेवेबाबत अप्पर पोलीस महासंचालनालयाचे तुरूगांधिकारी तात्यासाहेब निंबाळकर एवढा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, तुरुगांधिकारी प्रकाश उकरंडे, सेवानिवृत्त सुभेदार आनंद हिरवे राष्ट्रपती सुधार सेवा पदक तसेच गुणवत्ता पूर्व सेवेबाबत अधीक्षक येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, तुरुगांधिकारी तानाजी धोत्रे, सुभेदार प्रकाश सातपुते, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाचे तुरुगांधिकारी विजय कांबळे, राष्ट्रपती सुधार सेवा पदक प्राप्त झाले असून त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
. यावेळी झालेल्या शानदार संचालनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.. परेड संचलनात पुणे शहर, पुणे जिल्हा ग्रामीण, पिंपरी चिंचवड पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ व २, पुणे लोहमार्ग, राज उत्पादन शुल्क, वाहतूक विभाग १०८ बालभारती, अग्निशामक दल तसेच विविध शाळांच्या पथकाने सहभाग घेतला.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शालेय विद्यार्थी निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


