
मुंबई प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने आजपासून (२७ सप्टेंबर) ते २९ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी ऑरेंज व रेड अर्लट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः २८ सप्टेंबरला काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन
नदी-नाले किंवा पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये.
अफवांवर विश्वास ठेवू नये; फक्त अधिकृत सूचनांचे पालन करावे.
• पूरस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.
• स्थानिक निवारा केंद्रांचा आधार घ्यावा.
• धोकादायक व पूरप्रवण भाग टाळावा.
• वीज पडत असताना झाडाखाली थांबू नये.
जिल्हावार आपत्कालीन संपर्क क्रमांक
१) नांदेड – ०२४६२-२३५०७७
२) सोलापूर – ०२१७-२७३१०१२
३)धाराशीव – ०२४७२-२२७३०१
४) बीड – ०२४४२-२९९२९९
५) परभणी – ०२४५२-२२६४००
६) अहिल्यानगर – ०२४५-२३२३८४४
७) गडचिरोली – ०७१३२-२२२०३१
८) रायगड – ८२७५१५२३६३
९) रत्नागिरी – ७०५७२२२३३
१०) पालघर – ०२५२५-२९७४७४
११) सिंधुदुर्ग – ०२३६२-२२८८४७
१२) ठाणे – ९३७२३३८८२७
१३) पुणे – ९३७०९६००६१
१४) सातारा – ०२१६२-२३२३४९
१५) कोल्हापूर – ०२३१-२६५९२३२
१५) लातूर – ०२३८२-२२०२०४
१६) मुंबई शहर व उपनगर – १९१६ / ०२२-६९४०३३४४
राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र (२४x७ उपलब्ध):
०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९ / ०२२-२२०२३०३९ / ९३२१५८७१४३
प्रशासन सज्ज
अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.