
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शालेय शिक्षण विभाग पुढे सरसावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विभागाचे प्रधान सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच सर्व शिक्षक संघटनांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, शिक्षकांचा एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करण्यात येणार आहे.
पूरस्थितीत शिक्षण विभागाने दाखवलेली ही एकजूट निश्चितच पूरग्रस्तांना दिलासा देणारी ठरणार आहे. राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षक संघटना आणि शिक्षक यांचे हे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले.