
मुंबई:प्रतिनिधी
नागपाडा पहिली कामाठीपुरा येथील सिद्धार्थ नगरमधील पाण्याची टाकी पडून फुटल्याने यामध्ये चार जण जखमी झाले असून, त्यातील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तीन जणांवर नजिकच्या फौजिया रुग्णालयात उपचार सुरु आहे.आश्रय योजनेअंतर्गत येथील सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास सुरु आहे. या प्रकल्पाचे काम सुरु असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या प्रकल्पासाठी नेमलेल्या कंत्राटदाराचे हे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली
असून यात कंत्राटदार कामगाराचे कुटुंब अडकले गेले
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सिद्धार्थ नगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू झाले होते. जिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
9 वर्षांची मुलगी खुशी शहा टाकीजवळ खेळत होती, तर इतर तीन लोक बसले होते. अपघातग्रस्त खुशीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी फौजिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिनाज शाह (10 वर्षे), गुलाम मुल्ला (32 वर्षे) आणि नजराना अली हुसैन (35 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.