
मुंबई प्रतिनिधी
मुलुंड पश्चिमेकडील टी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला भांडुप पश्चिमेकडील तानसा जलवाहिनी जवळ मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे (२९ मार्च २०२५) आढळून आले. या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे, घाटकोपर यांच्यामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १० ते १२ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे
खालील भागात पाणीपुरवठा बंद राहील.
टी विभाग: मुलुंड पश्चिमेतील अमर नगर, खिंडीपाडा, जीजीएस मार्गावरील परिसर, मुलुंड कॉलनी, राहुल नगर, शंकर टेकडी, हनुमानपाडा, मलबार हिल रोड, स्वप्ननगरी, घाटीपाडा, बीआर रोड आणि परिसर.
एस विभाग: खिंडीपाडा, नजमा नगर आणि परिसर.
दुरुस्तीच्या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.