
मुंबई प्रतिनिधी
उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी खुशखबर असून लोकल प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी रेल्वेचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता थेट पनवेल होऊन बोरवली विरार साठी थेट लोकल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. मुंबई लोकल आणखी अद्यावत व्हावी यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात रेल्वे प्रवाशांना पनवेल होऊन थेट विरार पर्यंत प्रवास करता येणार आहे.
बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ ब’मध्ये पनवेल-वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पाचा समावेश केला आहे. पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बेरिवली-विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ‘एमयूटीपी ३ ब’ प्रकल्पसंचामध्ये नवीन पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वसईपासून पुढे बोरिवली आणि विरार अशा दोन्ही दिशांना याची जोडणी असणार आहे. ‘एमयूटीपी’ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पात राज्य आणि केंद्र सरकारकडून ५०:५० प्रमाणे निधी दिला जातो. नवीन पनवेल-वसई लोकल मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प
अहवाल करण्यात (डीपीआर) तयार आला आहे.
या प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी प्राथमिक बैठका पार पडल्या आहेत. महामुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद करणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महामुंबईत केवळ पनवेल-दिवा-वसई मार्गावर मुंबई लोकल धावत नाही. सध्या मेमू रेल्वे धावत असून, त्याच्या मोजक्याच फेऱ्या होतात. यामुळे पनवेल-वसई लोकल सुरू करण्याची मागणी सातत्याने प्रवाशांनी लावून धरली आहे.