
सातारा प्रतिनिधि न्युज नेटवर्क.
सातारा- महावितरण अभय योजनेला ग्राहकांनी दाखवली पाट.थकबाकीमुळे कायम स्वरूपी खंडित असलेल्या जागेवर व्याज व विलंब आकारासह विजबिलाची थकबाकी वाढत आहे.जागेची मालकी बदलली तरी विजबिलाची थकबाकी भरावीच लागते.म्हणून चार हजार ग्राहकांना नको आहे नवीन वीज जोडणी.
असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागते. थकबाकी असलेल्या जागेवर पुन्हा वीजपुरवठा पाहिजे असल्यास एरवी सर्वप्रथम संपूर्ण थकबाकीची रक्कम भरणे आवश्यक असते. मात्र, आता दि. ३१ मार्च २४ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकी झालेल्या जागा वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने अभय योजना सुरु केली.
या योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे व केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही अभय योजना आहे. विशेष म्हणजे केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरुन उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. ही योजना दि. १ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ९ हजार ६९८ ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदवला आहे. यात पुणे जिल्हा ४६१७, सातारा ४५५, सोलापूर १४३९, कोल्हापूर ११०२ आणि सांगली जिल्ह्यातील २०८५ थकबाकीदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. या ग्राहकांनी मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकार शुल्काचे संपूर्ण ३ कोटी २४ लाख रुपये माफ होणार आहेत.