
मुंबई प्रतिनिधी
राज्यभरातील अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी (ता. ९ ऑक्टोबर) बाधित तालुक्यांची यादी आणि मदत निकष जाहीर करत शासन निर्णय प्रसिद्ध केला. परंतु या यादीत नांदेड जिल्हा वगळला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.
• शेतीपिकांसाठी मदत किती?
सरकारने मदत एनडीआरएफ निकषांनुसार जाहीर केली असून, पूर्वीप्रमाणेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.
• कोरडवाहू पिकांसाठी: ₹८,५०० प्रति हेक्टर
• बागायत पिकांसाठी: ₹१७,००० प्रति हेक्टर
• बहुवार्षिक पिकांसाठी: ₹२२,५०० प्रति हेक्टर
• रब्बी हंगामासाठी निविष्ठा अनुदान: प्रति हेक्टर ₹१०,००० (३ हेक्टर मर्यादा)
यामध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसीची सूट देण्यात आली आहे, तर अपूर्ण नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे.
• राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २५३ तालुके जाहीर
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय तालुके (अतिवृष्टी व पूर बाधित)
• विदर्भ विभाग
यवतमाळ: वणी, झरी-जामनी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव
अमरावती: धारणी, मोर्शी, चांदूरबाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर
वाशीम: कारंजा, मानोरा, वाशीम
बुलढाणा: मलकापूर, सिंदखेडराजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगावराजा, चिखली, मोताळा, खामगाव
अकोला: अकोट, बालापूर, पातूर, तेल्हारा, माशीटाकळी
वर्धा: समुद्रपूर, वर्धा, आर्वी, सेलू, देवळी, कारंजा घाट, हिंगणघाट
नागपूर: सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर, नरखेड
भंडारा: भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी
गोंदिया: गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोरगाव-अर्जुनी, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी
गडचिरोली: गडचिरोली, वडसा (देशगाव), कुरखेडा, कोरची, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा
चंद्रपूर: सिरोंचा, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, ताडाळा, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिपरी, पोभूर्णा, ब्रह्मपुरी
• पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर: दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा
कोल्हापूर: गगनबावडा, चांदगड, पन्हाळा
सातारा: कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर
सांगली: तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी, जत, सांगली, इस्लामपूर, वाळवा
पुणे: हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड
• उत्तर महाराष्ट्र
नाशिक: मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, सिन्नर, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, बागलाण, चांदवड, येवला
जळगाव: मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेर
नंदुरबार: शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी
• मराठवाडा
उस्मानाबाद: उमरगा, उस्मानाबाद, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर
लातूर: देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ, उदगीर, चाकूर
परभणी: परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम,
मानवत, सोनपेठ, पूर्णा, जिंतूर
हिंगोली: कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ
अहमदनगर: कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहमदनगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर
• नांदेड जिल्हा वगळला
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले असूनही नांदेड जिल्हा या यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर पिकांचे आणि घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात असूनही मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकरी संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“शेतकऱ्यांचा सूर”
“सरकारने नुकसान मान्य केलं, पण मदतीतून आमचाच जिल्हा गायब! ही अन्यायकारक वागणूक आम्ही सहन करणार नाही,” नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटना प्रतिनिधी.