
श्रीराम भक्तांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले.महामंडळातर्फे सातारा टू अयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली,भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला होता.
सातारा ते अयोध्या बस सेवा सुरू करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्य लोकांना अयोध्या आणि परिसरातील तीर्थक्षेत्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अभिनंदन केले. यावेळी प्रवास करणाऱ्या श्रीराम भक्तांना, चालक, वाहक आणि उपस्थितांना भाजपने पेढे वाटून आनंद व्यक्त करत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, शहर उपाध्यक्ष जयराम मोरे, विजय नायक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, पर्यावरण अभियानाचे जयदीप ठुसे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे तसेच आगर व्यवस्थापक शिंदे साहेब स्थानक प्रमुख शिंगाडे साहेब तसेच आगारातील कर्मचारी मंगेश शेलार, सुशिल साबळे, चालक अजित काटे, सौ. रोहिणी शिंदे, हर्षदा गवळी, रेहाना इनामदार, प्रकाश घोरपडे आणि इतर कर्मचारी आणि प्रवाशी उपस्थित होते.
येता, जाता पाच दिवसांचा प्रवास
सातारा ते अयोध्या ही बस शेगाव ते नागपूर मार्गे आयोध्या आणि परतीच्या प्रवासात वाराणसी, प्रयागराज, उज्जैन, ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन परत सातारा असा पाच दिवसांचा प्रवास करणार आहे. चार हजार किलोमीटर अंतर असलेल्या या प्रवासासाठी आरामदायी पुश बॅक सीट असलेल्या गाड्या उपलब्ध करण्यात आल्या असून प्रवासी भाडे प्रत्येकी सात हजार पाचशे ठेवण्यात आले आहे. यामध्ये निवास आणि भोजनाचा खर्च समाविष्ट करण्यात आलेला नाही, एका गाडीमध्ये ४५ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवासी उपलब्ध झाली की लगेच बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती स्थानक प्रमुख राहुल शिंगाडे यांनीदिली