सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज (२५ ऑक्टोबर) राजभवन, महाबळेश्वर येथे आगमन झाले. या वेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तसेच तहसीलदार सचिन मस्के यांनीही राज्यपालांचे स्वागत केले. यानंतर पोलीस विभागाच्यावतीने राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.
यानंतर राज्यपालांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमवेत महाबळेश्वर परिसरातील कायदा-सुव्यवस्था आणि पर्यटनविषयक बाबींवर चर्चा केली.
राज्यपाल म्हणाले की, “महाबळेश्वरला देश-विदेशातून पर्यटक येतात. त्यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी.”
तसेच, राज्यपालांनी स्थानिक शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले.
या वेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि उपसचिव एस. राममूर्ती हेही उपस्थित होते.


