
मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केल्यानंतर शासनाने गुरुवारी (ता. ९) मदतीचे दर व निकष जाहीर केले. मात्र, अनेक जिल्ह्यांचे तालुके वगळल्याने शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर शुक्रवारी (ता. १०) सरकारने सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करून २९ तालुक्यांचा नव्याने समावेश केला.
सुधारित यादीत एकूण २८२ तालुके, त्यापैकी २५१ पूर्णत: बाधित, तर ३१ अंशत: बाधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अंशत बाधित तालुक्यांमधील प्रत्यक्ष बाधित मंडळांनाच सवलती मिळणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी सरकारच्या सवलती
* जमीन महसुलात सूट
* सहकारी कर्जांचे पुनर्गठन
* शेतीकर्ज वसुलीस एक वर्षाची स्थगिती
* तिमाही वीज बिल माफी
* परीक्षा शुल्कात सवलत; इ. १०वी व १२वी विद्यार्थ्यांची फी माफी
* रब्बीसाठी १०,००० रु. प्रति हेक्टर अनुदान
* एनडीआरएफच्या निकषांनुसार नुकसान भरपाईचे दर कायम –
कोरडवाहू : ₹८,५००
बागायती : ₹१७,०००
बहुवार्षिक पिके : ₹२२,५००
* अंशत: बाधित तालुके
जिल्हा तालुके*
नाशिक कळवण, देवळा, इगतपुरी
धुळे धुळे, साक्री, सिंदखेडा
अहिल्यानगर (अहमदनगर) पारनेर, संगमनेर, अकोले
पुणे हवेली, इंदापूर
सांगली कडेगाव
सातारा सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी
कोल्हापूर कागल, शिरोळ, पन्हाळा
बुलढाणा नांदुरा, संग्रामपूर
गोंदिया तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव
गडचिरोली चारमोशी, कोरची
* या तालुक्यांतील फक्त प्रत्यक्ष बाधित मंडळांनाच सवलती लागू राहणार.
पूर्णत: बाधित तालुके
* पालघर
पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड
* नाशिक
मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला
* जळगाव
एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अंमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर
* अहिल्यानगर (अहमदनगर)
अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव
* सोलापूर
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, करमाळा, सांगोला
* सांगली
मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठेमहाकाळ, विटा, आटपाडी, जत
* सातारा
कोरेगाव, खटाव, माण
* कोल्हापूर
करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड
* छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
* जालना
बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद
* बीड
बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
* लातूर
लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर
* धाराशिव (उस्मानाबाद)
धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
* नांदेड
कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी
* परभणी
पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
* हिंगोली
हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
* बुलढाणा
चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगावजामोद
* अमरावती
अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर
* अकोला
अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, बार्शिटाकळी
* वाशिम
वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा
* यवतमाळ
पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी-जामणी
*वर्धा
वर्धा, सेलू, देवळी, आवी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी
* नागपूर
नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड
* भंडारा
साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर
* गोंदिया
देवरी.
* चंद्रपूर
चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रम्हपुरी
* गडचिरोली
गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज (वडसा)
शेतकरी संघटनांची प्रतिक्रिया
राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी मदतीचे दर वाढवावेत, वितरण प्रक्रियेला गती द्यावी आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.