<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>सातारा प्रतिनिधि, Author at Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/author/satarapratinidhigmail-com/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/author/satarapratinidhigmail-com</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Fri, 18 Sep 2026 16:24:33 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.1.1</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/08/cropped-SATARA-PRATINIDHI-scaled-1-32x32.png</url>
	<title>सातारा प्रतिनिधि, Author at Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/author/satarapratinidhigmail-com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान; मोठ्या प्रकल्पांवर नोडल अधिकाऱ्यांची नजर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32474</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32474#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 16:24:33 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Air Pollution]]></category>
		<category><![CDATA[AQI]]></category>
		<category><![CDATA[Ashwini Bhide]]></category>
		<category><![CDATA[BMC]]></category>
		<category><![CDATA[BMC Updates]]></category>
		<category><![CDATA[Civic News]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Mumbai Air Pollution]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32474</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मुंबई : पावसाळ्यातील उपाययोजनांप्रमाणेच आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32474">मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान; मोठ्या प्रकल्पांवर नोडल अधिकाऱ्यांची नजर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई :</strong></span> पावसाळ्यातील उपाययोजनांप्रमाणेच आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर विशेष लक्ष ठेवून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.</p>
<p>बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग, खाते, प्रकल्प आणि उपक्रमांचा मासिक आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) महानगरपालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्त भिडे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.</p>
<p>सध्या मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात असला तरी आगामी काळात त्यात वाढ होऊ नये, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. तसेच १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी आवरण लावणे यासह आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले.</p>
<p>‘पादचारी प्रथम’ अभियानाला सातत्याची गरज</p>
<p>महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सुमारे ३०७ किलोमीटर लांबीचे २०० पदपथ निवडण्यात आले आहेत. या पदपथांवरील अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याचे काम सुरू आहे. विविध विभागांमध्ये झालेल्या कार्यवाहीचे दृश्य परिणाम दिसत असून, या अभियानात सातत्य ठेवून ते अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.</p>
<p>नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करा</p>
<p>नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी या महानगरपालिकेच्या कामकाजाचे वास्तव मूल्यमापन करणाऱ्या असतात. त्यामुळे तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचे वेळेत आणि योग्य पद्धतीने निराकरण करावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.</p>
<p>‘मार्ग’ (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स) प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तक्रारी ज्या स्तरावर सोडवणे अपेक्षित आहे, त्याच स्तरावर त्यांचे निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.</p>
<p>१३९ वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचा अभ्यास</p>
<p>मुंबईतील वाहतुकीस अडथळा ठरणारी सुमारे १३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांचा सखोल अभ्यास करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यकतेनुसार अडथळा ठरणारी बांधकामे नियमानुसार निष्कासित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.</p>
<p>रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या आदी विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर संबंधित परिमंडळांच्या उपआयुक्तांनी लक्ष ठेवावे. प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित व्यक्तींची (पीएपी) यादी संबंधित विभागांनी वेळेत सादर करावी, जेणेकरून प्रकल्पांच्या कामात विलंब होणार नाही, असेही अश्विनी भिडे यांनी सांगितले.</p>
<p>बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, खातेप्रमुख आणि संचालक उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32474">मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान; मोठ्या प्रकल्पांवर नोडल अधिकाऱ्यांची नजर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32474/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>शीव रेल्वे पूल ऑक्टोबरअखेर वाहतुकीसाठी खुला होणार? १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; अभिजीत बांगर यांची पाहणी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32470</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32470#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 15:06:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32470</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मुंबईकरांची तब्बल दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या शीव (सायन) रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32470">शीव रेल्वे पूल ऑक्टोबरअखेर वाहतुकीसाठी खुला होणार? १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; अभिजीत बांगर यांची पाहणी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मुंबईकरांची तब्बल दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या शीव (सायन) रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुलाशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरपासून मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळाची पाहणी करून उर्वरित कामांना वेग देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.</p>
<p>शीव रेल्वे स्थानकाजवळील हा पूल तब्बल ११२ वर्षे जुना असून तो असुरक्षित ठरविण्यात आल्यानंतर त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली. त्याचबरोबर मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. या अतिरिक्त मार्गिकांसाठी रेल्वे रुळांवर पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जुन्या पुलाच्या जागी नव्या आराखड्यानुसार पूल उभारण्यात आला आहे.</p>
<p>नवीन पुलाची रचना जुन्या पुलापेक्षा वेगळी असून तो ५४.५ मीटर लांबीचा एकाच स्पॅनचा आणि २९ मीटर रुंदीचा आहे. विशेष म्हणजे पुलाखाली कोणताही मधला खांब नसल्याने रेल्वे रुळांच्या विस्तारासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे. या रचनेमुळे भविष्यात सीएसएमटी-कुर्ला मार्गावरील पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याच्या कामालाही मदत होणार आहे.</p>
<p>पुलाच्या रेल्वे हद्दीतील मुख्य कामाची जबाबदारी मध्य रेल्वेकडे असून, महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्यांचे नूतनीकरण, मजबुतीकरण आणि संबंधित नागरी कामे मुंबई महापालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून करण्यात येत आहे. निविदेनुसार या कामाची अंतिम मुदत फेब्रुवारी २०२७पर्यंत होती. मात्र, मुंबईकरांची गैरसोय लक्षात घेऊन त्यापूर्वीच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.</p>
<p>दरम्यान, पुलाच्या रेल्वे भागातील महत्त्वाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या सुमारे ५०० टन वजनाच्या दोन पोलादी तुळया टप्प्याटप्प्याने बसविण्यात आल्या. पहिल्या तुळईच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २१ ऑगस्टला, तर दुसऱ्या तुळईच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. दोन्ही तुळयांवरील अपघात प्रतिबंधक सुरक्षा कठडे आणि डेक स्लॅबवरील वेअरिंग कोटचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मध्य रेल्वेने रेल्वे हद्दीतील पुलाचे काम पूर्ण केल्याचे अलीकडील अहवालात नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>पुलाच्या पश्चिम बाजूला लालबहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग, धारावी या भागातील पोहोच रस्त्याचे पुनर्बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पूर्वेकडील भागातील कामासाठी मध्य रेल्वेने २५ ऑगस्टपासून काही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. त्यानंतर पूर्वेकडील पोहोच रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. उर्वरित सिमेंट काँक्रीटची कामे वेगाने सुरू असून रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून ती पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे.</p>
<p>या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे शीव, धारावी, कुर्ला आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या महत्त्वाच्या भागांमधील पूर्व-पश्चिम वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पूल बंद असल्यामुळे या परिसरातील वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पूल सुरू झाल्यानंतर या मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.</p>
<p>अभिजीत बांगर यांच्या पाहणीनंतर आता १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी, वाहतूक नियोजन आणि संबंधित यंत्रणांच्या परवानग्या पूर्ण झाल्यावर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांचे लक्ष आता ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32470">शीव रेल्वे पूल ऑक्टोबरअखेर वाहतुकीसाठी खुला होणार? १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; अभिजीत बांगर यांची पाहणी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32470/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>निठारी हत्याकांडातील निर्दोष कोलीचा हरिद्वारमध्ये अंत; चहाच्या दुकानात गळफास, देश हादरवणाऱ्या प्रकरणाची अखेर अशी झाली</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32466</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32466#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:59:54 +0000</pubDate>
				<category><![CDATA[नवी दिल्ली वृत्तसंस्था]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32466</guid>

					<description><![CDATA[<p>नवी दिल्ली वृत्तसंस्था नोएडातील बहुचर्चित आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याचा हरिद्वारमध्ये संशयास्पदरीत्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32466">निठारी हत्याकांडातील निर्दोष कोलीचा हरिद्वारमध्ये अंत; चहाच्या दुकानात गळफास, देश हादरवणाऱ्या प्रकरणाची अखेर अशी झाली</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>नवी दिल्ली वृत्तसंस्था</strong></span></p>
<p>नोएडातील बहुचर्चित आणि देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याचा हरिद्वारमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरिद्वारमधील भूपतवाला परिसरातील सप्त सरोवर रोडवर लालमाता मंदिरासमोरील एका चहाच्या दुकानात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने निठारी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कोली गेल्या काही दिवसांपासून भूपतवाला परिसरात चहाचे दुकान चालवत होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह दुकानात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच सप्तऋषी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. कोली हा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैण भागातील मंगरुखाल गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.</p>
<p>निठारी प्रकरणाने देश हादरला</p>
<p>२९ डिसेंबर २००६ रोजी नोएडातील निठारी परिसरात मोनिंदर सिंग पंढेर याच्या घरामागील नाल्यात लहान मुलांचे सांगाडे आणि मानवी अवशेष आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण १९ प्रकरणांमध्ये त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.</p>
<p>या प्रकरणात सत्र न्यायालयाने सुरेंद्र कोलीला १३ प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे निठारी हत्याकांडातील कोलीचे नाव देशभर चर्चेत आले. मात्र, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.</p>
<p>पुरावे अपुरे; उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता</p>
<p>ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत सुरेंद्र कोलीला १२ प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त केले. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप न करता कोलीच्या निर्दोष मुक्ततेचा मार्ग मोकळा केला. न्यायालयीन प्रक्रियेनंतर निठारी प्रकरणातील त्याच्याविरुद्धची प्रकरणे संपुष्टात आली.</p>
<p>सर्व प्रकरणांतून सुटका झाल्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये सुरेंद्र कोली तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो उत्तराखंडमध्ये परतला आणि हरिद्वारमध्ये चहाचे दुकान चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता त्याच दुकानात त्याचा मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.</p>
<p>‘सेक्टर ३६’मुळे पुन्हा चर्चेत आले होते प्रकरण</p>
<p>निठारी हत्याकांडाने समाजमन हादरवून सोडले होते. या घटनेवर आधारित ‘सेक्टर ३६’ हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला. निठारी परिसरातील घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.</p>
<p>दरम्यान, सुरेंद्र कोलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आत्महत्येची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असली तरी पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. निठारी हत्याकांडामुळे तब्बल दोन दशकांपूर्वी देशाला हादरवून सोडणारे नाव असलेल्या सुरेंद्र कोलीच्या मृत्यूने या गाजलेल्या प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक अध्याय समोर आला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32466">निठारी हत्याकांडातील निर्दोष कोलीचा हरिद्वारमध्ये अंत; चहाच्या दुकानात गळफास, देश हादरवणाऱ्या प्रकरणाची अखेर अशी झाली</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32466/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर; मुंबईत पेट्रोल १११.२१, डिझेल ९७.८३ रुपये</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32462</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32462#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:50:05 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32462</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे वाहनचालकांचे लक्ष लागले असतानाच १८ सप्टेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32462">पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर; मुंबईत पेट्रोल १११.२१, डिझेल ९७.८३ रुपये</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे वाहनचालकांचे लक्ष लागले असतानाच १८ सप्टेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर बहुतांश स्थिर राहिले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये, तर डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये, तर कोलकात्यात पेट्रोल ११३.५१ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०७.९४ रुपये आणि डिझेल ९९.५५ रुपये, बंगळुरूमध्ये पेट्रोल १११.६८ रुपये आणि डिझेल ९९.५६ रुपये, तर हैदराबादमध्ये पेट्रोल ११५.६९ रुपये आणि डिझेल १०४.२३ रुपये प्रति लिटर आहे.</p>
<p>दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीवरील शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर एक रुपयाने कमी करून ५० पैसे करण्यात आले असून, डिझेलवरील शुल्कात पाच रुपयांची कपात करून ते २० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील शुल्कही चार रुपयांनी कमी करून १५ रुपये करण्यात आले आहे. हे बदल १६ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.</p>
<p>मात्र, निर्यात शुल्कातील कपातीचा देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरावर थेट परिणाम झालेला नाही. देशातील इंधनाचे दर ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, रिफायनिंग खर्च, वाहतूक खर्च, कर तसेच रुपया-डॉलर विनिमय दर यांसारख्या विविध घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क कमी झाले असले तरी देशांतर्गत ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या दरात तत्काळ दिलासा मिळालेला नाही.</p>
<p>शहरानुसार इंधनाच्या किमतींमध्ये फरक असतो. स्थानिक कर आणि इतर खर्चांमुळे प्रत्येक शहरातील दर वेगळे असू शकतात. तसेच इंधनाचे दर दररोज बदलण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी इंधन भरताना स्थानिक पेट्रोल पंपावरील त्या दिवसाचा लागू दर तपासून घेणे आवश्यक आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32462">पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर; मुंबईत पेट्रोल १११.२१, डिझेल ९७.८३ रुपये</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32462/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>गणपती विसर्जनानंतर प्रवाशांना दिलासा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरही विशेष नियोजन</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32458</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32458#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:44:51 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32458</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दक्षिण मुंबईकडे येतात. विसर्जन मिरवणुका</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32458">गणपती विसर्जनानंतर प्रवाशांना दिलासा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरही विशेष नियोजन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दक्षिण मुंबईकडे येतात. विसर्जन मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री नियमित लोकल फेऱ्यांनंतर चर्चगेट ते विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे विसर्जनानंतर उशिरा परतणाऱ्या हजारो प्रवाशांना या विशेष सेवांचा फायदा होणार आहे.</p>
<p>पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या नियोजनानुसार, या विशेष लोकल चर्चगेट आणि विरारदरम्यान धावतील आणि मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या विशेष लोकल पहाटे १.१५ ते ३.४५ या कालावधीत चालवल्या जातील. तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विशेष लोकल रात्री १२.१५ ते पहाटे ३ या कालावधीत उपलब्ध असतील. विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने परतीच्या प्रवासासाठी नियमित लोकलवर येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टीने या अतिरिक्त फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.</p>
<p>दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्नी रोड परिसरात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने पश्चिम रेल्वेने या स्थानकासाठी स्वतंत्र गर्दी नियंत्रणाचे नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ३७ जलद अप लोकलना सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे जलद लोकलच्या प्रवाशांचे विविध स्थानकांवर विभाजन होऊन चर्नी रोड परिसरातील गर्दीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.</p>
<p>याशिवाय, १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक लांबीचा फलाट उपलब्ध नसल्यामुळे तीन १५ डब्यांच्या लोकलना ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स या स्थानकांवर थांबा दिला जाणार नाही. या बदलामुळे संबंधित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपला प्रवास आणि उतरण्याचे स्थानक आधीच निश्चित करणे आवश्यक आहे.<br />
चर्नी रोड स्थानकावरील गर्दी नियंत्रणासाठी आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० या कालावधीत अप मार्गावर धावणाऱ्या १०१ लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबणार नाहीत. विसर्जनाच्या काळात स्थानक परिसरात होणारी गर्दी, फलाटांवरील प्रवाशांची संख्या आणि सुरक्षित हालचाल लक्षात घेऊन हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.</p>
<p>गणेश विसर्जनाच्या दिवशी चर्नी रोड आणि परिसरातील स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी येण्याची शक्यता असल्याने तिकीट खिडक्यांवरही गर्दी वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन चर्नी रोड स्थानकावर अतिरिक्त तात्पुरत्या तिकीट खिडक्या सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. त्यामुळे नियमित तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सुलभ होणार आहे.</p>
<p>गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येतो. विसर्जन मिरवणुका, भाविकांची गर्दी आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे कार्यक्रम यामुळे दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी नियमित लोकल सेवांवर अचानक वाढलेला प्रवासी भार येऊ नये आणि गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत व्हावे, यासाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त लोकलसह स्थानकनिहाय उपाययोजना आखल्या आहेत.</p>
<p>विशेष लोकल सेवांमुळे चर्चगेटपासून विरारपर्यंतच्या प्रवाशांना विसर्जनानंतरही रेल्वेचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मात्र, चर्नी रोड स्थानकावरील काही लोकलच्या थांब्यात करण्यात आलेले बदल लक्षात घेणे प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, शक्य असल्यास आगाऊ तिकीट काढावे आणि गर्दीच्या काळात फलाटावर सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>अनंत चतुर्दशीच्या रात्री मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने रेल्वे, वाहतूक आणि पोलिस प्रशासनासमोर गर्दी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरील तात्पुरते थांबा बदल आणि अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था यामुळे विसर्जनानंतरच्या परतीच्या प्रवासातील गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32458">गणपती विसर्जनानंतर प्रवाशांना दिलासा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरही विशेष नियोजन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32458/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मिरजेत विसर्जन मिरवणुकीच्या कमानींवर राजकीय सामना; ठाकरेसेनेच्या ‘गद्दार खंडोजी खोपडे’ला शिंदेसेनेचे दिशाला सलियन–सुशांत राजपूत यांच्या प्रतिमांतून प्रत्युत्तर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32454</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32454#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:35:06 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32454</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील स्वागत कमानींच्या तब्बल ४५ वर्षांच्या परंपरेला यंदाही उजाळा मिळाला</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32454">मिरजेत विसर्जन मिरवणुकीच्या कमानींवर राजकीय सामना; ठाकरेसेनेच्या ‘गद्दार खंडोजी खोपडे’ला शिंदेसेनेचे दिशाला सलियन–सुशांत राजपूत यांच्या प्रतिमांतून प्रत्युत्तर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील स्वागत कमानींच्या तब्बल ४५ वर्षांच्या परंपरेला यंदाही उजाळा मिळाला आहे. मात्र, यंदाच्या कमानींना धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांसोबतच राजकीय रंग चढल्याचे चित्र आहे. मिरवणूक मार्गावर ठाकरेसेना आणि शिंदेसेनेकडून समोरासमोर उभारण्यात आलेल्या कमानींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.</p>
<p>ठाकरेसेनेने उभारलेल्या कमानीवर ‘गद्दार खंडोजी खोपडे’ या विषयावरील देखावा साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज खंडोजी खोपडे याला शासन करीत असल्याचे या देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेच्या कमानीवर दिशा सालियन आणि सुशांत राजपूत यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या असून, ‘आम्हाला न्याय द्या’, असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही कमानी मिरज शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.</p>
<p>मिरजच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित भव्य स्वागत कमानी उभारल्या जातात. यंदाही अनेक संस्थांनी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण विषयांची निवड केली आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या कमानीवर स्वामी समर्थांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. किसान चौकातील मराठा महासंघाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.</p>
<p>विश्वशांती मंडळाच्या कमानीवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. स्टेशन रोडवरील एकता सांस्कृतिक व क्रीडा मंडळाची कमान सामाजिक विषयावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळाच्या कमानीवर आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांची प्रतिमा असून, विश्वश्री मंडळाच्या कमानीवर बाबा महाकाल यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. विविध संस्थांनी आपल्या कमानींच्या माध्यमातून सामाजिक संदेश, ऐतिहासिक संदर्भ आणि धार्मिक श्रद्धा यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आहे.</p>
<p>मिरजेतील स्वागत कमानींची ही परंपरा १९८३ मध्ये हिंदू एकता आंदोलन संघटनेने सुरू केली. सुरुवातीला मोजक्या कमानींपासून सुरू झालेली ही परंपरा पुढे शहराच्या गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग बनली. गेल्या चार दशकांहून अधिक काळात विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांनी या परंपरेत सहभागी होत आपापल्या कल्पकतेनुसार कमानी उभारल्या आहेत.</p>
<p>विविध मंदिरांच्या प्रतिकृती, देवी-देवतांच्या प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध थोर महापुरुषांचे जीवनकार्य आणि सामाजिक संदेश कमानींच्या माध्यमातून मांडले जातात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसोबतच या कमानी पाहण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत असते.</p>
<p>यंदा हिंदू एकता आंदोलन, शिवसेना, मराठा महासंघ, विश्वशांती मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकता मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळ, शिंदेसेना यांच्यासह विविध संस्था आणि मंडळांनी कमानी उभारल्या आहेत. धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांसोबत सामाजिक प्रश्नांनाही यंदा स्थान देण्यात आले आहे.</p>
<p>मात्र, ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या कमानींवरील विषयांमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय चर्चेची किनार मिळाली आहे. उत्सवाच्या वातावरणात या कमानी नागरिकांचे आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान या कमानी विशेष चर्चेत राहण्याची शक्यता आहे. मिरजच्या पारंपरिक गणेशोत्सवातील कलात्मक आणि सामाजिक अभिव्यक्तीला यंदा राजकीय संदेशांची जोड मिळाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32454">मिरजेत विसर्जन मिरवणुकीच्या कमानींवर राजकीय सामना; ठाकरेसेनेच्या ‘गद्दार खंडोजी खोपडे’ला शिंदेसेनेचे दिशाला सलियन–सुशांत राजपूत यांच्या प्रतिमांतून प्रत्युत्तर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32454/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पुणे पोलीस भरतीतील कुराश प्रमाणपत्र घोटाळ्याचे राज्यभर कनेक्शन; हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रांचा संशय, ७१ जणांच्या नोकऱ्या रडारवर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32450</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32450#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 13:13:11 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32450</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी पुणे पोलीस भरतीमध्ये बनावट कुराश क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळविल्याचे प्रकरण आता राज्यव्यापी घोटाळ्याच्या दिशेने</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32450">पुणे पोलीस भरतीतील कुराश प्रमाणपत्र घोटाळ्याचे राज्यभर कनेक्शन; हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रांचा संशय, ७१ जणांच्या नोकऱ्या रडारवर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>पुणे पोलीस भरतीमध्ये बनावट कुराश क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करून नोकरी मिळविल्याचे प्रकरण आता राज्यव्यापी घोटाळ्याच्या दिशेने सरकले आहे. महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनच्या माध्यमातून २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत एक हजारांहून अधिक बनावट क्रीडा प्रमाणपत्रे वितरित झाल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रत्यक्षात कोणत्याही स्पर्धेत सहभागी न झालेल्या उमेदवारांना खेळाडू दाखवून प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप असून, त्यासाठी उमेदवारांकडून ५० हजारांपासून तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.</p>
<p>या प्रकरणात महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी जयवंत साळुंखे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे कोल्हापूर कनेक्शन समोर आल्यानंतर ऋती धैर्यशील पुनगावकर आणि धैर्यशील संभाजीराव पुनगावकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.</p>
<p>पुणे पोलीस भरतीतील तपासादरम्यान बनावट कुराश प्रमाणपत्रांचा वापर करून १९ उमेदवारांनी नोकरी मिळविल्याचे उघड झाले आहे. यापैकी दहा उमेदवार प्रशिक्षणासाठीही गेले होते. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे तसतशी या घोटाळ्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अन्य शासकीय आस्थापनांमध्येही अशाच प्रमाणपत्रांच्या आधारे काही उमेदवारांनी नोकरी मिळविल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.</p>
<p>७१ जणांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात</p>
<p>कुराश प्रमाणपत्राच्या आधारे राज्यभरात एकूण ७१ जणांची नियुक्ती झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या सर्व उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे ७१ जणांपैकी नेमके किती जणांनी बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेतला, याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.</p>
<p>पुणे पोलीस भरतीत समोर आलेले १९ उमेदवार हे या मोठ्या जाळ्याचा केवळ एक भाग असल्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील विविध भरती प्रक्रियेत कुराश किंवा संबंधित क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.</p>
<p>पन्नास हजार ते पाच लाखांचा ‘दर’</p>
<p>बनावट प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. उमेदवाराच्या गरजेनुसार आणि प्रमाणपत्राच्या स्वरूपानुसार ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी न झालेल्या उमेदवारांना खेळाडू म्हणून दाखवून प्रमाणपत्रे मिळवून देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या व्यवहारामागे आणखी कोण कोण सहभागी होते, आर्थिक देवाणघेवाण कशी झाली आणि त्यातून किती प्रमाणपत्रे वितरित झाली, याचा तपास केला जात आहे.</p>
<p>पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न?</p>
<p>कोल्हापुरातील पुनगावकर दाम्पत्याने मूळ आरोपींना मदत करताना काही कागदपत्रे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या दाम्पत्याच्या चौकशीतून बनावट प्रमाणपत्रांच्या निर्मिती आणि वितरणाचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. संबंधित अकॅडमीच्या माध्यमातून हे जाळे किती वर्षांपासून आणि किती व्यापक स्वरूपात सुरू होते, याचाही तपास करण्यात येत आहे.</p>
<p>राज्यभर पोलिसांची पथके</p>
<p>पुणे पोलीस भरतीतील गैरप्रकार समोर आल्यानंतर तपासाचा विस्तार राज्यभर करण्यात आला आहे. विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना झाली असून, संशयित प्रमाणपत्रे आणि नियुक्त्यांची पडताळणी सुरू आहे. ७१ जणांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असून, त्यामध्ये प्रमाणपत्राची सत्यता, संबंधित स्पर्धेतील सहभाग, प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया आणि नियुक्तीसाठी त्याचा झालेला वापर याची तपासणी केली जाणार आहे.</p>
<p>२०१६ ते २०२६ या कालावधीत एक हजारांहून अधिक प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने या प्रकरणाचा तपास केवळ पुणे पोलीस भरतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. या प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी किती उमेदवारांनी विविध शासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळविला, याचा शोध आता घेतला जात आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींची आणि संशयित नियुक्त्यांची संख्या आणखी वाढते का, याकडे लक्ष लागले आहे.</p>
<p>प्राथमिक तपासातील महत्त्वाचे आकडे : २०१६ ते २०२६ या काळात एक हजारांहून अधिक संशयित प्रमाणपत्रे, प्रमाणपत्रासाठी ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतचा कथित व्यवहार, पुणे पोलीस भरतीतील १९ उमेदवार आणि राज्यभरात कुराश प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्त झाल्याची माहिती असलेले ७१ जण. त्यामुळे या घोटाळ्याची खरी व्याप्ती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32450">पुणे पोलीस भरतीतील कुराश प्रमाणपत्र घोटाळ्याचे राज्यभर कनेक्शन; हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रांचा संशय, ७१ जणांच्या नोकऱ्या रडारवर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32450/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>“मनापासून माफी मागतो; पण संवैधानिक अधिकार बजावतच राहणार” &#8211; येरवडा कारागृहातून सुटताच संतोष पंडितांचा निर्धार</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32446</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32446#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 05:16:41 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32446</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी समाजमाध्यमांवरील कथित अवमानकारक वक्तव्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32446">“मनापासून माफी मागतो; पण संवैधानिक अधिकार बजावतच राहणार” &#8211; येरवडा कारागृहातून सुटताच संतोष पंडितांचा निर्धार</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>समाजमाध्यमांवरील कथित अवमानकारक वक्तव्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले समाजमाध्यम प्रभावक संतोष गजानन पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पंडित यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका बाजूला आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागितली, तर दुसऱ्या बाजूला लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा आपला संवैधानिक अधिकार असल्याचे सांगत तो अधिकार यापुढेही बजावत राहणार असल्याचे स्पष्ट केले.</p>
<p>“जे काही झाले तो माझ्यासाठी मोठा शॉक होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया पंडित यांनी दिली. त्याचवेळी, “मी जे काही करतोय तो माझा संवैधानिक अधिकार आहे. पहिल्यांदाही मी तो अधिकार बजावत होतो आणि यापुढेही बजावत राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>पंडित यांच्या अटकेनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर ते कारागृहाबाहेर आले. सुटकेनंतर त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे सांगितले.</p>
<p>“जे काही करत होतो ते सुरू करताना मी कोणाची परवानगी घेतली नाही. तो माझा संवैधानिक अधिकार आहे. तो अधिकार मी आजपर्यंत बजावत आलो आहे आणि यापुढेही बजावत राहणार आहे. मी थांबणार नाही,” असे पंडित म्हणाले.</p>
<p>लोकशाहीमध्ये जनता ही देशाची मालक असल्याचे सांगत त्यांनी सत्तेत असलेल्या लोकांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत, अशी भूमिका मांडली. “लोकशाहीत जनता देशाची मालक आहे. जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत. आपण ज्यांना निवडून देतो, जे लोक सत्तेत आहेत, मग तो कोणताही पक्ष असो, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले.</p>
<p>आपण कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका केलेली नसल्याचेही पंडित यांनी स्पष्ट केले. आपल्या भूमिकेचा उद्देश केवळ जनतेच्या हिताशी संबंधित प्रश्न मांडणे हा असल्याचा दावा त्यांनी केला.</p>
<p>दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. “माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. पण कोणाला चुकीचे वाटले असेल तर मी मनापासून माफी मागतो. माझा उद्देश जनतेचे भले व्हावे एवढाच आहे,” असे पंडित यांनी सांगितले.</p>
<p>“मी समाजकार्य करत नाही, तर माझा संवैधानिक अधिकार बजावत आहे. तो अधिकार मी बजावतच राहणार. थांबणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.</p>
<p>पंडित यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार त्यांनी फिर्यादीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, तसेच प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटींचा समावेश आहे. त्यामुळे कारागृहातून सुटका झाल्यानंतर पंडित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी संबंधित प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32446">“मनापासून माफी मागतो; पण संवैधानिक अधिकार बजावतच राहणार” &#8211; येरवडा कारागृहातून सुटताच संतोष पंडितांचा निर्धार</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32446/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>गणेशोत्सवात पुण्याच्या रस्त्यांवर ‘नो एंट्री’! १८ ते २५ सप्टेंबर वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख मार्ग बंद, पर्यायी रस्ते जाणून घ्या</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32442</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32442#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 05:05:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32442</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32442">गणेशोत्सवात पुण्याच्या रस्त्यांवर ‘नो एंट्री’! १८ ते २५ सप्टेंबर वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख मार्ग बंद, पर्यायी रस्ते जाणून घ्या</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत गरजेनुसार प्रमुख रस्ते बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.</p>
<p>गणेशोत्सव काळात लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यांसह मध्यवर्ती भागातील विविध मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी किंवा वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. तसेच काही रस्त्यांवरील एकेरी वाहतुकीचे नियम परिस्थितीनुसार तात्पुरते शिथिल करण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांची गर्दी वाढल्यास वाहतूक पोलिसांकडून संबंधित मार्गावरील वाहतूक वळविण्याचा अथवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.</p>
<p>लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते सेवासदन चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी डुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे जावे किंवा हमजेखान चौकातून महाराणा प्रताप रस्त्याने घोरपडी पेठ पोलिस चौकीमार्गे शंकरशेठ रस्त्याचा वापर करावा. तसेच सेवासदन चौक ते टिळक चौकदरम्यान सायंकाळी पाचनंतर गर्दी संपेपर्यंत वाहतूक बंद केली जाईल. बाजीराव रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी पूरम चौकातून टिळक रस्त्याने जावे.</p>
<p>शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक आणि पुढे रामेश्वर चौक ते जेधे चौक या मार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक निर्बंध लागू केले जाणार आहेत. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक, जे. एम. रस्ता, अलका चौक, टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. तसेच सिमला चौक, कामगार पुतळा चौक, शाहीर अमर शेख चौक, बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. दुसऱ्या बाजूने कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल, देवजीबाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रस्ता आणि शंकरशेठ रस्त्याने वाहतूक वळविण्यात येणार आहे.</p>
<p>बाजीराव रस्ता : पूरम चौक ते अप्पा बळवंत चौकदरम्यान सायंकाळी पाचनंतर वाहतुकीत बदल राहणार आहे. वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, टिळक चौक आणि केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकाकडे जावे. टेलिफोन भवन ते पूरम चौकदरम्यानचा एकेरी वाहतुकीचा नियम तात्पुरता शिथिल करून गरजेनुसार दुहेरी वाहतूक केली जाणार आहे.</p>
<p>अन्य प्रमुख बदल : सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण आणि हिराबाग चौक परिसरातील वाहतूक मन्साराम नाईक रस्ता, डॉ. कोटनीस हॉस्पिटल, शिवाजी रस्ता, भिकारदास चौक, खजिना विहीर चौक मार्गे टिळक रस्त्याकडे वळविण्यात येईल. दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक आणि हिराबाग चौक परिसरातही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.</p>
<p>सणस रस्त्यावरील गोटीराम भैया चौक ते गोविंद हलवाई चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार असून गोटीराम भैया चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, कस्तुरे चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. पानघंटी चौक ते गंज पेठ चौकीदरम्यान जैन मंदिर चौक, फुलवाला चौक आणि कस्तुरे चौक हा पर्यायी मार्ग राहणार आहे.</p>
<p>गावकसाब मशीद ते सेंट्रल स्ट्रीट चौकीदरम्यानच्या वाहतुकीसाठी बाबाजान चौक, सरबतवाला चौक मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच कोहिनूर चौक ते बाबाजान चौक या मार्गावरील वाहतूक भगवान महावीर चौक, सरबतवाला चौक मार्गे वळविण्यात येईल. जेधे प्रसाद रस्ता, सुभान शहा रस्ता, पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक तसेच सुभान शहा दर्गा ते सोन्या मारुती चौक परिसरातही वाहतूक बदल लागू राहणार आहेत.</p>
<p>या मार्गांवर ‘नो पार्किंग’</p>
<p>गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरत्या स्वरूपात ‘नो पार्किंग’ व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी रस्ता-जिजामाता चौक ते मंडई चौक आणि मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रस्ता-शनिपार ते फुटका बुरुज आणि अप्पा बळवंत चौक ते मोती चौक, टिळक रस्ता-एस. पी. कॉलेज मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक आणि शास्त्री रस्ता-सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक या मार्गांचा समावेश आहे.</p>
<p>एकेरी वाहतुकीचे नियमही गरजेनुसार शिथिल</p>
<p>१८ ते २५ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी पाचनंतर गरजेनुसार कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते महापालिका कार्यशाळा चौक आणि कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक या मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे नियम तात्पुरते शिथिल करण्यात येणार आहेत. गर्दीचा ओघ लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांकडून परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.</p>
<p>गणेशोत्सवातील वाढती गर्दी, देखावे पाहण्यासाठी येणारे नागरिक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बंद असलेल्या मार्गांवर वाहने नेणे टाळावे, रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग करू नये आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32442">गणेशोत्सवात पुण्याच्या रस्त्यांवर ‘नो एंट्री’! १८ ते २५ सप्टेंबर वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख मार्ग बंद, पर्यायी रस्ते जाणून घ्या</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32442/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, दहावीची १५ फेब्रुवारीपासून</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32438</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32438#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 04:47:13 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32438</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32438">दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, दहावीची १५ फेब्रुवारीपासून</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी परीक्षेच्या तारखांचे स्पष्ट चित्र मिळाले आहे.</p>
<p>दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची विद्यार्थी आणि पालकांकडून दरवर्षी उत्सुकतेने प्रतीक्षा केली जाते. यंदाही राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, तसेच शिक्षकांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करता यावे, या उद्देशाने परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत.</p>
<p>महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती दिली.</p>
<p>बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून</p>
<p>इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १६ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीची तयारीही पूर्ण करावी लागणार आहे.</p>
<p>दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून</p>
<p>इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.</p>
<p>राज्य मंडळाने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य वेळापत्रक असून विषयानुसार नेमकी परीक्षा कोणत्या दिवशी होणार, याची माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. दहावी आणि बारावीचे विषयनिहाय अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.</p>
<p>परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता उर्वरित अभ्यासक्रम, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका सोडविणे आणि पुनरावृत्ती यांचे नियोजन करता येणार आहे. विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संभाव्य वेळापत्रक लक्षात घेऊन विषयानुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32438">दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, दहावीची १५ फेब्रुवारीपासून</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32438/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
