
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे.” असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हा एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत अफवांकडे लक्ष न देण्याचा आवाहनही त्यांनी केलंय .
औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे जोरदार आंदोलन होत आहे. दरम्यान, नागपूर दंगलीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रहार होताना दिसतोय. गृहमंत्री नागपूरचे असताना दंगल होतेच कशी असा सवाल करत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घेरले आहे. नागपूरची दंगल हा सूनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत असल्याचं ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे. हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा.” ॲड. आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही म्हटलं.