<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Thu, 16 Apr 2026 14:41:51 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2025/01/satara-150x150.png</url>
	<title>Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>अंजली दमानियांचा थेट आरोप: खरातशी संबंधित बड्या व्यक्तींची यादी उघड</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24528</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24528#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 14:41:51 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24528</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी भोंदूगिरी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24528">अंजली दमानियांचा थेट आरोप: खरातशी संबंधित बड्या व्यक्तींची यादी उघड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></p>
<p>भोंदूगिरी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पत्रकार परिषदेत दमानिया यांनी खरातशी संबंधित असल्याचा दावा करत अनेक राजकीय नेते, शासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.</p>
<p>दमानिया यांनी सादर केलेल्या यादीत राज्यातील काही वरिष्ठ राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांची नावे असल्याचे त्यांनी नमूद केले. या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्ती आणि पदाधिकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आल्याने ‘नाशिक कनेक्शन’ पुन्हा चर्चेत आले आहे.</p>
<p>यादीत कळवणचे आमदार नितीन पवार, सिन्नर येथील उदय सांगळे, विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे, मंत्री दादा भुसे यांचे पीए रामदास खेडकर, तसेच चंद्रकांत पाटील यांचे पीए मंगेश देशपांडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे ओएसडी राहुल कोतडे यांची नावेही जाहीर करण्यात आली. याशिवाय प्रभाकर काळे, बाळासाहेब बोराडे, नंदकिशोर काटोरे, सचिन चुंभळे, मंगेश नवाळे, राहुल देशमुख, अविनाश पोटे, कमलाकर पोटे आणि महेंद्र शेळके-पाटील यांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला.</p>
<p>दमानिया यांनी सांगितले की, त्यांच्या हाती लागलेल्या कॉल रेकॉर्ड्स आणि भेटींच्या तपशीलांमध्ये रूपाली चाकणकर, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर आणि संकेत सायकर यांची नावे समोर आली आहेत. संबंधित व्यक्तींचे खरातशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा दावा त्यांनी केला असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>दरम्यान, अशोक खरात याला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली असून, तो मागील महिनाभरापासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर महिला अत्याचाराचे आठ, फसवणुकीचे सहा आणि धमकीचा एक अशा एकूण १५ गुन्ह्यांची नोंद आहे. तपासादरम्यान ‘पुत्रप्राप्ती’चे आमिष दाखवून एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.</p>
<p>पत्नी फरार; मालमत्तेचा तपास सुरू</p>
<p>अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही शिर्डी येथील जमीन बळकावल्याच्या प्रकरणात अद्याप फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि विशेष तपास पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. तपासादरम्यान काही राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता उभारल्याचेही प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.</p>
<p>या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले जाणार का, तसेच या प्रकरणाचा तपास आणखी कोणत्या दिशेने पुढे जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24528">अंजली दमानियांचा थेट आरोप: खरातशी संबंधित बड्या व्यक्तींची यादी उघड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24528/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मुंबईत १८ एप्रिलपासून कॅब चालकांचा संप; आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24524</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24524#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 14:03:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24524</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी शहरातील अॅप-आधारित कॅब सेवांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी चिंताजनक घडामोड समोर आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24524">मुंबईत १८ एप्रिलपासून कॅब चालकांचा संप; आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>शहरातील अॅप-आधारित कॅब सेवांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी चिंताजनक घडामोड समोर आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कॅब चालक संघटनांनी १८ एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला असून, आंदोलन अधिक तीव्र करत आझाद मैदानात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दैनंदिन प्रवास व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>अॅप-आधारित कॅब कंपन्यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाडे दरांमध्ये सातत्याने होणारे चढ-उतार, कमिशनची वाढती टक्केवारी आणि परिणामी चालकांच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेक चालकांनी कंपन्यांकडून लागू करण्यात येणाऱ्या अटी व नियम अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे.</p>
<p>कॅब चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या संदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपात मुंबईसह राज्यभरातील हजारो चालक सहभागी होण्याची शक्यता असून, यामुळे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकते.</p>
<p>या संपाचा सर्वाधिक फटका रोज कॅब सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे कर्मचारी, विमानतळावर जाणारे प्रवासी तसेच उशिरा रात्री प्रवास करणाऱ्यांना पर्यायी वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागू शकतो. विशेषतः सार्वजनिक वाहतुकीवर आधीच ताण असताना हा संप अतिरिक्त दबाव निर्माण करू शकतो.</p>
<p>दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून रेल्वे, बस किंवा इतर उपलब्ध साधनांचा वापर करावा, असे आवाहन लवकरच केले जाण्याची शक्यता आहे.</p>
<p>कॅब चालक आणि सरकार यांच्यातील संभाव्य चर्चेतून या आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर या संपाचा नेमका किती परिणाम होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24524">मुंबईत १८ एप्रिलपासून कॅब चालकांचा संप; आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24524/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ठाणे रेल्वे स्थानकाचा आज १७३ वा वर्धापन दिन; ऐतिहासिक वारशाचा उत्सव</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24519</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24519#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 05:21:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24519</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक चा १७३ वा वर्धापन दिन आज, गुरुवारी उत्साहात</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24519">ठाणे रेल्वे स्थानकाचा आज १७३ वा वर्धापन दिन; ऐतिहासिक वारशाचा उत्सव</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक चा १७३ वा वर्धापन दिन आज, गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. देशातील पहिल्या रेल्वे प्रवासाच्या साक्षीदार ठरलेल्या या स्थानकाच्या वाढदिवसानिमित्त विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>भारतातील पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावर धावली होती. सुमारे ३३.८ किमी अंतर केवळ ५७ मिनिटांत पार करणाऱ्या या ऐतिहासिक प्रवासात ‘साहिब, सिंध आणि सुलतान’ या वाफेच्या इंजिनांनी १४ डब्यांची गाडी ओढली होती. या गाडीत सुमारे ४०० पाहुणे प्रवासी होते. भारतीय रेल्वेच्या प्रवासाची ही सुरुवात आजही अभिमानाने स्मरली जाते.</p>
<p>या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांच्या पुढाकाराने आज सकाळी ११ वाजता स्थानकाच्या फलाट क्रमांक एकजवळील जुन्या रेल्वे इंजिनाजवळ मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.</p>
<p>कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती अपेक्षित आहे.</p>
<p>दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. पश्चिमेकडील सॅटीस पुलानंतर आता पूर्वेकडील सॅटीस पुलाचे कामही वेगाने सुरू असून, सुमारे २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग, १२ मीटर रुंद मार्गिका आणि सुमारे ९ हजार चौरस मीटर डेक उभारण्यात येणार आहे. याशिवाय ११ मजली बहुउद्देशीय इमारतीत वाहनतळ, रेल्वे व बस सेवा तसेच व्यापारी संकुल उभारण्याची योजना आहे.</p>
<p>दरम्यान, १८५३ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वे प्रवासाचा विस्तार आज देशाच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. प्रारंभीची ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी पुढे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वेत विलीन झाली आणि दिल्ली, कानपूर, अलाहाबाद ते नागपूर व रायचूरपर्यंत विस्तारली. पुढे ३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी ते कुर्ला दरम्यान देशातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सेवा सुरू झाली, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया रचला गेला.</p>
<p>इतिहासाचा साक्षीदार असलेले ठाणे स्थानक आजही आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24519">ठाणे रेल्वे स्थानकाचा आज १७३ वा वर्धापन दिन; ऐतिहासिक वारशाचा उत्सव</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24519/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>वर्ध्यात उष्णतेचा कहर; ४५ अंशांचा अंदाज, आज शाळा-अंगणवाड्यांना सुट्टी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24515</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24515#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 05:03:23 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24515</guid>

					<description><![CDATA[<p>वर्धा प्रतिनिधी विदर्भात एप्रिलच्या मध्यातच उन्हाची तीव्रता धोकादायक पातळीवर पोहोचली असून वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा प्रचंड तडाखा बसत</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24515">वर्ध्यात उष्णतेचा कहर; ४५ अंशांचा अंदाज, आज शाळा-अंगणवाड्यांना सुट्टी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>वर्धा प्रतिनिधी</strong></span></p>
<p>विदर्भात एप्रिलच्या मध्यातच उन्हाची तीव्रता धोकादायक पातळीवर पोहोचली असून वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा प्रचंड तडाखा बसत आहे. तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, गुरुवार, १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.</p>
<p>जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश काढत उष्णतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क भूमिका घेतली आहे.</p>
<p>मागील काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने चढत असून अनेक ठिकाणी तो ४० अंशांच्या पुढे गेला आहे. अकोला येथे ४४.२ अंश, अमरावती ४४.० अंश, तर नागपूरमध्ये ४३.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. वर्ध्यातही पारा ४३.९ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे.</p>
<p>हवामान विभागाने वर्ध्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत उष्णलाटेची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना उष्णतेचा अधिक त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंगणवाडी केंद्रेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा प्रशासनालाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.</p>
<p>दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कपडा वापरावा तसेच हलके आणि सैल कपडे परिधान करावेत, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.</p>
<p>विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट कायम आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.</p>
<p>जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे, भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात उष्णलाटेची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.</p>
<p>विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयाचे पालकांकडून स्वागत होत असून, उष्णतेपासून बचावासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24515">वर्ध्यात उष्णतेचा कहर; ४५ अंशांचा अंदाज, आज शाळा-अंगणवाड्यांना सुट्टी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24515/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24511</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24511#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 04:47:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[अकोला]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24511</guid>

					<description><![CDATA[<p>अकोला प्रतिनिधी एप्रिलच्या मध्यातच विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र होत असताना अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची भीती व्यक्त केली</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24511">अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>अकोला प्रतिनिधी</strong></span></p>
<p>एप्रिलच्या मध्यातच विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र होत असताना अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील जुने भागातील दगडी पुलाजवळील अगरवेस परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) एका टेम्पोमध्ये ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या मृत्यूकडे गंभीरतेने पाहिले जात आहे.</p>
<p>बुधवारी अकोल्याचा पारा ४४.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. सकाळी दहाच्या सुमारासच रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून दुपारपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवरही शुकशुकाट दिसून येत आहे.</p>
<p>दुपारी १२ ते ४ या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. फेरीवाले, रिक्षाचालक, बांधकाम मजूर यांसारखे उघड्यावर काम करणारे नागरिक सावलीचा आसरा घेताना दिसत असून उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.</p>
<p>हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. १९ एप्रिलपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वातावरण कोरडे आणि उष्ण राहणार असल्याचा अंदाज आहे.</p>
<p>दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही सुरू आहे. प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारच्या घातपाताची चिन्हे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.</p>
<p>याबाबत जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत लेव्हरकर यांनी सांगितले की, “मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून सर्व अंगांनी तपास करण्यात येत आहे.”</p>
<p>खबरदारीचा इशारा</p>
<p>दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, अंगात अशक्तपणा, शरीराचे तापमान अचानक वाढणे ही उष्माघाताची लक्षणे मानली जातात. अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.</p>
<p>तसेच, दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, सैल व हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे, तसेच शक्यतो सावलीत राहणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24511">अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24511/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>राज्य ‘रेड झोन’च्या उंबरठ्यावर; उष्णतेची लाट तीव्र तीन-चार दिवस दिलासा नाही; विदर्भात तापमान ४४ अंशांपलीकडे</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24503</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24503#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 04:26:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24503</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झपाट्याने वाढत असून काही जिल्हे ‘अति-उच्च उष्णता धोका’ (रेड झोन) श्रेणीत जाण्याच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24503">राज्य ‘रेड झोन’च्या उंबरठ्यावर; उष्णतेची लाट तीव्र तीन-चार दिवस दिलासा नाही; विदर्भात तापमान ४४ अंशांपलीकडे</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झपाट्याने वाढत असून काही जिल्हे ‘अति-उच्च उष्णता धोका’ (रेड झोन) श्रेणीत जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, तर अनेक जिल्हे ‘उच्च जोखीम’ (ऑरेंज झोन) मध्ये दाखल झाले आहेत. ‘कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर’ (CEEW) या संस्थेने याबाबत इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचे चित्र आहे.</p>
<p>भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्हे तसेच अकोला, अमरावती आणि वर्धा येथे गुरुवारी (ता. १६) ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.</p>
<p>तापमानाचा चढता पारा</p>
<p>विदर्भात अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथेही तापमानात सातत्याने वाढ होत आहे.</p>
<p>मध्य महाराष्ट्रात लोहगाव, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.</p>
<p>मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड येथे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.</p>
<p>पुढील चार दिवसांचा अंदाज</p>
<p>• कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा : कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ</p>
<p>• विदर्भ : पुढील ४८ तासांत २ ते ३ अंशांनी वाढ</p>
<p>• हवामान स्थिती : बहुतांश भागात कोरडे वातावरण</p>
<p>• कोकण किनारपट्टी (पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) : उष्ण व दमट हवामान</p>
<p>उष्णतेची कारणमीमांसा</p>
<p>कर्नाटक आणि महाराष्ट्रालगतच्या समुद्रसपाटीवरील मधल्या वातावरणीय थरात निर्माण झालेल्या प्रति-चक्रीय स्थितीमुळे (ॲन्टी-सायक्लोन) उष्णतेची तीव्रता वाढत आहे. उत्तर कर्नाटकावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने उष्ण हवेचा साठा वाढून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे.</p>
<p>विभागनिहाय उष्णतेची लाट</p>
<p>• विदर्भ : १५ ते १९ एप्रिल &#8211; तीव्र उष्णतेची लाट</p>
<p>• मध्य महाराष्ट्र : १५ ते १८ एप्रिल &#8211; उष्णतेचा प्रकोप</p>
<p>• मराठवाडा : १६ ते १८ एप्रिल &#8211; उष्णतेची लाट</p>
<p>पुणे जिल्ह्यात चाळीशीपार</p>
<p>पुणे शहर व परिसरातही तापमानाने चाळीशीचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बुधवारी (ता. १५) नोंदलेली तापमाने पुढीलप्रमाणे</p>
<p>• शिवाजीनगर : ३९.२°C</p>
<p>• कोरेगाव पार्क : ३९.३°C</p>
<p>• मगरपट्टा : ३९.६°C</p>
<p>• हडपसर : ३८.५°C</p>
<p>• वडगाव शेरी : ३८.८°C</p>
<p>• चिंचवड : ३८.७°C</p>
<p>जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती अधिक तीव्र असून</p>
<p>• पुरंदर : ४०.४°C</p>
<p>• लवळे : ४०.४°C</p>
<p>• बारामती : ४०.२°C</p>
<p>दरम्यान, पुणे व आसपासच्या भागात गुरुवार ते शनिवार (१६ ते १८ एप्रिल) दरम्यान कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.</p>
<p>नागरिकांसाठी सूचना</p>
<p>उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि वृद्ध, लहान मुले व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24503">राज्य ‘रेड झोन’च्या उंबरठ्यावर; उष्णतेची लाट तीव्र तीन-चार दिवस दिलासा नाही; विदर्भात तापमान ४४ अंशांपलीकडे</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24503/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्रात प्रशासकीय हालचालींना वेग; पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कुठे वाचा&#8230;</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24499</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24499#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 04:15:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24499</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेत सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्राला अद्यापही विराम मिळालेला नसून, राज्य सरकारने आणखी पाच</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24499">महाराष्ट्रात प्रशासकीय हालचालींना वेग; पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कुठे वाचा&#8230;</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेत सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्राला अद्यापही विराम मिळालेला नसून, राज्य सरकारने आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांतील वरिष्ठ पदांवर फेरबदल करण्यात आल्यानंतर आता नव्या नियुक्त्यांमुळे प्रशासनातील महत्त्वाच्या पदांची पुनर्रचना करण्यात आली आहे.</p>
<p>ताज्या आदेशानुसार, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२० बॅचचे अधिकारी असलेले जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम करत प्रशासनिक अनुभव मिळवला आहे.</p>
<p>दरम्यान, पर्यटन संचालनालय, मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बी. एन. पाटील यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ‘रुसा’ (RUSA) योजनेच्या प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. २०१४ बॅचचे हे अधिकारी नव्या जबाबदारीतून राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रकल्पांना चालना देणार आहेत.</p>
<p>याच पार्श्वभूमीवर, यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत असलेले मंगेश जोशी यांची पर्यटन संचालनालय, मुंबई येथे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन व प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवामुळे पर्यटन विभागातील कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.</p>
<p>सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२२ बॅचचे जैन सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी तसेच सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ग्रामीण विकास आणि आदिवासी भागातील अनुभव त्यांच्या नव्या पदावर उपयोगी ठरणार आहे.</p>
<p>तसेच, २०२३ बॅचचे अधिकारी रेवैया डोंगरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी तसेच केळापूर उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे कार्यरत होते.</p>
<p>राज्यातील प्रशासकीय बदल्यांचा हा सिलसिला पुढेही सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी काळात आणखी काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24499">महाराष्ट्रात प्रशासकीय हालचालींना वेग; पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कुठे वाचा&#8230;</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24499/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बीएमसीच्या सीबीएसई शाळांची दमदार कामगिरी; दहावीचा निकाल ९२.८९%</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24494</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24494#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 03:55:35 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24494</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही उल्लेखनीय यशाची</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24494">बीएमसीच्या सीबीएसई शाळांची दमदार कामगिरी; दहावीचा निकाल ९२.८९%</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राहिली आहे. महानगरपालिकेच्या ११ सीबीएसई शाळांचा एकत्रित निकाल ९२.८९ टक्के इतका लागला असून, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने होत असलेली प्रगती या निकालातून अधोरेखित झाली आहे.</p>
<p>महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या शाळांमधून यंदा एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले. विशेष म्हणजे, चार शाळांनी १०० टक्के निकालाची नोंद करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.</p>
<p>यंदाच्या निकालात मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामणे हिने ९७.८ टक्के गुण मिळवत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ पुनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के) आणि राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय पुनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) व श्रेया सिंग (९६.४ टक्के), तसेच मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.</p>
<p>दरम्यान, भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर), मिठा नगर (मुलुंड) आणि पुनम नगर (अंधेरी) या चार शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवून विशेष कामगिरी बजावली आहे.</p>
<p>निकालाच्या विश्लेषणातून गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षणीय प्रगती केल्याचे दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळविले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यांचे हे एकत्रित फलित असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले.</p>
<p>दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे तसेच उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24494">बीएमसीच्या सीबीएसई शाळांची दमदार कामगिरी; दहावीचा निकाल ९२.८९%</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24494/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>२४ तासांत गुन्हा उघड; बुलेटसह मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24490</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24490#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 19:36:48 +0000</pubDate>
				<category><![CDATA[क्राईम न्यूज]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24490</guid>

					<description><![CDATA[<p>रणजित मस्के : प्रतिनिधी सातारा : मारहाण करून बुलेट आणि अन्य साहित्य लुटणाऱ्या आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24490">२४ तासांत गुन्हा उघड; बुलेटसह मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>रणजित मस्के : प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सातारा : मारहाण करून बुलेट आणि अन्य साहित्य लुटणाऱ्या आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.</p>
<p>दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी शशिकांत रामचंद्र गोरे (वय ३१, रा. मेढा ता. जावली, जि. सातारा) यांनी कोंडवे परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथे अज्ञात आरोपींनी मारहाण करून त्यांची बुलेट दुचाकी, मोबाईल चार्जर आणि इतर साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.</p>
<p>गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार डीबी पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला.</p>
<p>गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंडवे येथून दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून बुलेट दुचाकीसह मोबाईल चार्जर व अन्य साहित्य असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करत आहेत.</p>
<p>या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :<br />
सपोनि सुदर्शन काटकर, सपोनि अन्वर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस हवालदार मनोज गायकवाड, पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, पोलीस हवालदार राजू शिखरे, महिला पोलीस हवालदार विद्या कुंभार, महिला पोलीस हवालदार तेजा तुपे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन झनकर.</p>
<p>दरम्यान, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24490">२४ तासांत गुन्हा उघड; बुलेटसह मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24490/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत रक्तरंजित थरार; डीजेसमोर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24486</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24486#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 16:40:27 +0000</pubDate>
				<category><![CDATA[चंद्रपूर]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24486</guid>

					<description><![CDATA[<p>चंद्रपूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण असताना चंद्रपूर शहरात मात्र या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24486">आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत रक्तरंजित थरार; डीजेसमोर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>चंद्रपूर : प्रतिनिधी</strong></span></p>
<p>भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण असताना चंद्रपूर शहरात मात्र या उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गांधी चौक परिसरात आयोजित मिरवणुकीदरम्यान डीजेसमोर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.</p>
<p>इंदिरानगर येथील ‘भीम रत्न बहुउद्देशीय अनुयायी मंडळा’तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास डीजेसमोर मोठ्या उत्साहात नृत्य सुरू असताना झालेल्या धक्काबुक्कीवरून रविकांत टेंभूरकर (वय ३६) यांचा काही युवकांशी वाद झाला. सुरुवातीला किरकोळ भांडण वाटणारा हा वाद काही क्षणांतच गंभीर स्वरूप धारण करून हिंसाचारात परिवर्तित झाला.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त झालेल्या पाच जणांनी एकत्र येत रविकांत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला आणि काही वेळातच परिसरात रक्ताचा सडा पडला. गंभीर जखमी अवस्थेत रविकांत यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.</p>
<p>या घटनेनंतर चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिरवणुकीत काही युवक शस्त्रांसह फिरत असल्याचेही समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.</p>
<p>दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24486">आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत रक्तरंजित थरार; डीजेसमोर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24486/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
