<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>ठाणे Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/thane/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/thane</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Tue, 15 Sep 2026 15:40:52 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.1.1</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/08/cropped-SATARA-PRATINIDHI-scaled-1-32x32.png</url>
	<title>ठाणे Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/thane</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>इंजिनिअर पतीसह सासरच्यांकडून पैशांचा तगादा; उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32257</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32257#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 15 Sep 2026 15:40:52 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32257</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी उल्हासनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सासरच्या मंडळींकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32257">इंजिनिअर पतीसह सासरच्यांकडून पैशांचा तगादा; उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>उल्हासनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सासरच्या मंडळींकडून माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला जात असल्याच्या आरोपातून एका २८ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे उल्हासनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.</p>
<p>नित्या राय असे मृत विवाहितेचे नाव आहे. नित्याचा सुमारे पाच वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या गौरव राय याच्याशी विवाह झाला होता. नित्या हीदेखील उच्चशिक्षित होती. विवाहाच्या वेळी नित्याच्या वडिलांनी हुंडा दिल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले आणि सासरच्या मंडळींकडून नित्याला माहेरहून पैसे आणण्यासाठी मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.</p>
<p>‘माहेरहून पैसे घेऊन ये’, असा सातत्याने तगादा लावला जात असल्याने नित्या मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अखेर या जाचाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. उच्चशिक्षित असूनही वैवाहिक आयुष्यातील कथित छळामुळे तिने जीवन संपवल्याने या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.</p>
<p>या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नित्याचा पती गौरव राय, सासू आणि आजी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती गौरव राय याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.</p>
<p>हुंडा देऊनही छळाची परंपरा संपत नसल्याचे चित्र या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. उच्चशिक्षित कुटुंबांमध्येही पैशांसाठी विवाहित महिलांवर मानसिक दबाव आणला जात असल्याच्या घटना घडत असल्याने समाजमन हादरले आहे. विशेषतः नऊ महिन्यांच्या चिमुकलीला मागे ठेवून नित्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे राय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.</p>
<p>हुंड्यासाठी होणारा मानसिक आणि शारीरिक छळ रोखण्यासाठी कायदे असतानाही अशा घटना घडत असल्याने त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. नित्याच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, छळाचे स्वरूप आणि पैशांच्या मागणीसंदर्भातील आरोप यांचा तपास पोलीस करत आहेत.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32257">इंजिनिअर पतीसह सासरच्यांकडून पैशांचा तगादा; उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या, नऊ महिन्यांची चिमुकली पोरकी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32257/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आता ‘सर्पदंशापासून बचाव’चे धडे! १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष अभियान; सर्पमित्र, आरोग्य व वन विभागाचे तज्ज्ञ देणार मार्गदर्शन</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32101</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32101#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 12 Sep 2026 15:53:56 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32101</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी डोंगराळ आणि वनक्षेत्रालगत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32101">आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आता ‘सर्पदंशापासून बचाव’चे धडे! १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष अभियान; सर्पमित्र, आरोग्य व वन विभागाचे तज्ज्ञ देणार मार्गदर्शन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>डोंगराळ आणि वनक्षेत्रालगत असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृहांमध्ये १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे. सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, साप आढळल्यास कसे वागावे आणि सर्पदंश झाल्यास तातडीने कोणते उपाय करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.</p>
<p>आदिवासी विकास विभागाच्या अनेक आश्रमशाळा आणि वसतिगृहे ही डोंगर, जंगल तसेच दुर्गम भागांच्या सान्निध्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा साप, विंचू आणि अन्य वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः रात्रीच्या वेळी शाळा परिसर, वसतिगृह, स्वच्छतागृह, पाण्याची ठिकाणे तसेच झुडपांच्या परिसरात साप आढळण्याच्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनातील सापाबाबतची भीती दूर करून त्यांना सुरक्षित व वैज्ञानिक पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.</p>
<p>या अभियानांतर्गत प्रत्येक शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृहामध्ये किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र घेण्यात येणार आहे. स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, आरोग्य विभाग आणि वन विभागाच्या सहकार्याने ही सत्रे आयोजित केली जाणार आहेत. सापांची ओळख, साप आढळण्याची संभाव्य ठिकाणे, सापांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि सर्पदंशाच्या वेळी तातडीने करावयाची कृती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.</p>
<p>साप आढळल्यास त्याला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न करू नये, सुरक्षित अंतर राखावे आणि घाबरून धावपळ करण्याऐवजी शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जावे, यावर विशेष भर दिला जाणार आहे. सर्पदंश झाल्यासही घाबरून चुकीचे उपचार करण्यापेक्षा बाधित व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे आणि विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे.</p>
<p>सर्पदंशाबाबत ग्रामीण आणि आदिवासी भागांत आढळणारे अनेक गैरसमज दूर करण्यावरही अभियानात भर असेल. सर्पदंश झाल्यानंतर जखम कापणे, रक्त शोषून घेणे, घट्ट दोर बांधणे, विविध वनौषधी किंवा घरगुती उपचार करणे अशा चुकीच्या पद्धती टाळण्याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक उपचार आणि वेळेवर वैद्यकीय मदत हाच जीव वाचविण्याचा योग्य मार्ग असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले जाणार आहे.</p>
<p>विशेष म्हणजे, जनजागृतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अभियानादरम्यान शाळेच्या परिसरात जिवंत साप आणून प्रात्यक्षिक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साप दाखविण्याऐवजी सुरक्षित माध्यमातून, चित्रफिती, डिजिटल सादरीकरणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून माहिती देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या डिजिटल स्टुडिओमध्येही सर्पदंश प्रतिबंध आणि आपत्कालीन प्रतिसादाबाबत तज्ज्ञांची विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत.</p>
<p>आपत्कालीन संपर्क यंत्रणा होणार अद्ययावत</p>
<p>सर्पदंशाची घटना घडल्यास उपचारासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहांची आपत्कालीन संपर्क यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांना दर तीन महिन्यांनी आपत्कालीन संपर्काची माहिती तपासून अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.</p>
<p>यामध्ये जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व दूरध्वनी क्रमांक, अँटी-स्नेक वेनम उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रांची किंवा साठवणूक केंद्रांची माहिती, आपत्कालीन वाहतुकीची व्यवस्था, संबंधित संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक यांचा समावेश असेल. त्यामुळे सर्पदंशाची घटना घडल्यास कोणत्या रुग्णालयात तातडीने उपचार मिळू शकतात, याची माहिती शाळा प्रशासनाकडे आधीपासून उपलब्ध राहणार आहे.</p>
<p>दरम्यान, महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंशाचा अधिसूचित आजार म्हणून समावेश केल्याच्या पार्श्वभूमीवर या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद करणे, त्यांचा अहवाल सादर करणे, घटनांचे निरीक्षण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर अँटी-स्नेक वेनम उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रांची आणि साठवणूक केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे.</p>
<p>अभियानाच्या कालावधीत प्रत्येक शाळेत राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांची आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित विभागाला सादर करावी लागणार आहे. त्यामुळे हे अभियान केवळ औपचारिक जनजागृतीपुरते मर्यादित न राहता आश्रमशाळांमधील सर्पदंश प्रतिबंध आणि आपत्कालीन व्यवस्थेचा आढावाही घेणारे ठरणार आहे.</p>
<p>भीती नव्हे, विज्ञान; विलंब नव्हे, तातडीचा उपचार! डोंगर-जंगलाच्या सान्निध्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्पदंशाचा धोका हा केवळ आरोग्याचा प्रश्न नसून त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, सर्पदंश टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळवून देणे, या त्रिसूत्रीवर या अभियानाचा मुख्य भर राहणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32101">आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना आता ‘सर्पदंशापासून बचाव’चे धडे! १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष अभियान; सर्पमित्र, आरोग्य व वन विभागाचे तज्ज्ञ देणार मार्गदर्शन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32101/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>लोकलची गर्दी जीवघेणी! दारात उभी महिला रुळावर कोसळली;  मोठा अनर्थ टळला, मुंब्रा दिवा हादरले</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31990</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31990#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 10 Sep 2026 14:53:38 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31990</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31990">लोकलची गर्दी जीवघेणी! दारात उभी महिला रुळावर कोसळली;  मोठा अनर्थ टळला, मुंब्रा दिवा हादरले</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. मध्य रेल्वेवरील डोंबिवली–सीएसएमटी मार्गावर गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. तुडुंब गर्दीमुळे दारात उभी असलेल्या एका महिला प्रवाशाचा तोल जाऊन ती थेट रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने त्यावेळी लोकल सिग्नलमुळे थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. महिलेला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.</p>
<p>सकाळी डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. डोंबिवली स्थानकातून सुटल्यानंतर पुढील स्थानकांकडे जाताना प्रवाशांची संख्या वाढत गेली. दिवा स्थानक ओलांडल्यानंतर मुंब्राच्या दिशेने जात असताना लोकलला सिग्नल मिळाल्याने गाडीचा वेग मंदावला आणि ती थांबली. याचवेळी दाराजवळ उभ्या असलेल्या महिला प्रवाशांचा तोल गेला आणि त्यातील एक महिला थेट खाली रुळावर पडली.</p>
<p>महिला रुळावर पडल्याचे लक्षात येताच डब्यात एकच गोंधळ उडाला. काही क्षणांसाठी प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र लोकल थांबलेली असल्याने सहप्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यामुळे गंभीर दुर्घटना टळली. संबंधित महिलेला किरकोळ दुखापत झाली असून या घटनेने लोकल प्रवासातील गर्दी किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे, याचे पुन्हा एकदा विदारक चित्र समोर आले.</p>
<p>या घटनेनंतर काही महिला प्रवाशांनी गर्दीच्या लोकलमध्ये राहण्यापेक्षा खाली उतरून रुळाच्या बाजूने मुंब्रा स्थानक गाठण्याचा मार्ग स्वीकारल्याची माहिती समोर आली. रेल्वे मार्गावरून पायी जाणे स्वतःमध्ये अत्यंत धोकादायक असतानाही गर्दीपासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना असा निर्णय घ्यावा लागणे हीच रेल्वे व्यवस्थेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे.</p>
<p>गर्दीच्या लोकलचा जीवघेणा प्रवास</p>
<p>दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे परिसरातून मुंबईच्या दिशेने दररोज मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवास करतात. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. अनेकदा प्रवाशांना दरवाजात उभे राहून किंवा दरवाजाला धरून प्रवास करण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत एखादा अचानक धक्का, ब्रेक, सिग्नलमुळे झालेली हालचाल किंवा वळणावर लोकलचा झटका प्रवाशाच्या जीवावर बेतू शकतो.</p>
<p>दिवा-मुंब्रा दरम्यानचा तीव्र वळणाचा भाग यामुळे विशेषतः धोकादायक मानला जातो. याच परिसरात यापूर्वी गर्दीमुळे प्रवासी लोकलमधून खाली पडल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जून २०२५ मध्ये मुंब्रा परिसरात दोन गर्दीच्या लोकलमधून प्रवासी खाली पडल्याच्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले होते. प्राथमिक माहितीनुसार तीव्र वळणावर लोकलला अचानक झटका बसल्याने दरवाजाजवळ उभे असलेले प्रवासी एकमेकांवर आदळले आणि काही जण खाली पडले होते.</p>
<p>याच पट्ट्यातील गर्दीचा प्रश्न नवा नाही. २०२६ मध्येही ठाणे-दिवा पट्ट्यातून प्रवासी लोकलमधून खाली पडण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचे वृत्त आहे. जुलैमध्ये दिवा-मुंब्रा वळणावर गर्दीच्या लोकलच्या दरवाजात धोकादायकरीत्या लटकणाऱ्या महिला प्रवाशाचा व्हिडीओही चर्चेत आला होता. या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला होता.</p>
<p>एसी लोकलनंतर साध्या लोकलवर गर्दीचा ताण</p>
<p>सकाळच्या वेळेत या मार्गावरील लोकल सेवांचे नियोजन करताना प्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानकनिहाय होणारी गर्दी लक्षात घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. एसी लोकलनंतर धावणाऱ्या साध्या लोकलमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी चढतात. परिणामी काही स्थानकांवर डब्यांची क्षमता संपल्यानंतरही प्रवासी चढण्याचा प्रयत्न करतात आणि दाराजवळ प्रचंड गर्दी होते.</p>
<p>गर्दीचे व्यवस्थापन केवळ अतिरिक्त गाड्या सोडण्यापुरते मर्यादित राहता कामा नये, तर गर्दीच्या वेळेत कोणत्या स्थानकावर किती प्रवासी चढतात, कोणत्या गाड्यांमध्ये सर्वाधिक ताण निर्माण होतो आणि कोणत्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक धोका आहे, याचा स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे आहे.</p>
<p>२०२५ची दुर्घटना विसरली का?</p>
<p>दिवा-मुंब्रा परिसरातील धोकादायक वळणावर जून २०२५ मध्ये झालेली दुर्घटना आजही प्रवाशांच्या स्मरणात आहे. त्या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर गर्दी, दरवाजात उभे राहणारे प्रवासी आणि तीव्र वळण या तिन्ही बाबींचा सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती.</p>
<p>मात्र वर्ष उलटूनही गर्दीची समस्या कायम असल्याचे आजच्या घटनेने दाखवून दिले आहे. फरक एवढाच की आज लोकल धावत नव्हती. सिग्नलमुळे गाडी थांबलेली असल्याने एका महिलेचा जीव वाचला. जर त्याच क्षणी लोकल वेगात असती, तर आजची घटना केवळ किरकोळ दुखापतीवर थांबली असतीच असे नाही.</p>
<p>रेल्वे प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे</p>
<p>दिवा-मुंब्रा-कळवा पट्ट्यातील वाढती प्रवासी संख्या, गर्दीच्या वेळेतील तुडुंब लोकल आणि धोकादायक वळणे यांचा एकत्रित विचार करून मध्य रेल्वेने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. गर्दीच्या वेळेत अतिरिक्त लोकल फेऱ्या, प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी योग्य वेळापत्रक, महिला डब्यांमध्ये प्रभावी गर्दी नियंत्रण आणि धोकादायक ठिकाणी विशेष सुरक्षा उपाय यांचा विचार होणे आवश्यक आहे.</p>
<p>प्रवाशांनीही लोकलच्या दरवाजात उभे राहून अथवा रुळावरून चालत जाण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन करणे आवश्यक आहे. मात्र प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच आहे.</p>
<p>मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा आधार आहे. त्यामुळे ‘गर्दी आहे, प्रवासी काय करणार?’ या मानसिकतेतून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. एका महिलेचा आज जीव थोडक्यात वाचला; उद्या अशीच घटना घडून एखाद्या कुटुंबावर कायमचा आघात होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा-मुंब्रा पट्ट्यातील गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31990">लोकलची गर्दी जीवघेणी! दारात उभी महिला रुळावर कोसळली;  मोठा अनर्थ टळला, मुंब्रा दिवा हादरले</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31990/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कळव्यात हिट अँड रन! कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31785</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31785#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 07 Sep 2026 03:44:33 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31785</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ठाणे : कळवा येथील खारीगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात चारचाकी वाहनाने नागरिकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31785">कळव्यात हिट अँड रन! कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे :</strong> </span>कळवा येथील खारीगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात चारचाकी वाहनाने नागरिकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण चारचाकी वाहन चालवत होता. सोसायटीच्या आवारातून महामार्गाच्या दिशेने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने परिसरातील नागरिकांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या अन्य दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.</p>
<p>दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून वाहनचालकाचा शोध घेण्यात येत आहे. वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, तसेच अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग किती होता, याची माहिती तपासातून समोर येणार आहे. या घटनेमुळे खारीगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31785">कळव्यात हिट अँड रन! कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31785/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>दहीहंडीच्या थराने हिरावले तरुणपण; १८ वर्षांपासून मुलासाठी झिजणाऱ्या आईची सरकारकडे याचना</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31722</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31722#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 04 Sep 2026 17:31:59 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31722</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी दहीहंडीच्या उंचच उंच थरांचा थरार, गोविंदा पथकांचा उत्साह आणि हंडी फोडल्यानंतर होणारा जल्लोष यामुळे हा उत्सव</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31722">दहीहंडीच्या थराने हिरावले तरुणपण; १८ वर्षांपासून मुलासाठी झिजणाऱ्या आईची सरकारकडे याचना</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>दहीहंडीच्या उंचच उंच थरांचा थरार, गोविंदा पथकांचा उत्साह आणि हंडी फोडल्यानंतर होणारा जल्लोष यामुळे हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या उत्साहाला सुरक्षिततेची जोड नसेल तर एका क्षणातील चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. भिवंडीतील नागेश भोईर यांचे आयुष्य याचेच विदारक उदाहरण आहे. २००९ मध्ये वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून पडल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्या अपघातानंतर गेली १८ वर्षे त्यांचे आयुष्य अंथरुणापुरते मर्यादित झाले आहे.</p>
<p>आजही नागेश यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. औषधोपचार, फिजिओथेरपी आणि वेळोवेळी रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च कुटुंबासाठी मोठे आर्थिक आव्हान बनला आहे. त्यामुळे ‘मला थेट आर्थिक मदत नको. मी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा,’ अशी मागणी नागेश यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.</p>
<p>एका अपघाताने बदलले आयुष्य</p>
<p>दहीहंडीच्या थरावर चढताना नागेश खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू झाले; मात्र दुखापतीचे परिणाम कायमस्वरूपी ठरले. स्वतःच्या पायावर उभे राहणे, काम करणे आणि सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगणे, ही स्वप्ने त्या एका अपघातानंतर हिरावली गेली.</p>
<p>अपघाताच्या वेळी नागेश अवघे २४ वर्षांचे होते. तरुण वयात झालेल्या या दुर्घटनेनंतर त्यांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल झाला. गेली १८ वर्षे त्यांना अंथरुणावरच राहावे लागत आहे. नियमित वैद्यकीय उपचार, औषधे आणि फिजिओथेरपीची आवश्यकता असते. प्रकृतीनुसार साधारण दोन महिन्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.</p>
<p>मित्रांची मदतही अपुरी</p>
<p>अपघातानंतर सुरुवातीच्या काळात मित्र, परिचित आणि नातेवाईकांनी उपचारांसाठी मदतीचा हात दिला. मात्र, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचारांमुळे ही मदत हळूहळू कमी होत गेली. सध्या काही मोजके मित्र औषधोपचारासाठी मदत करीत आहेत. परंतु दीर्घकालीन उपचारांचा खर्च भागविणे कुटुंबासाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे.</p>
<p>‘माझ्या उपचारांसाठी मला आर्थिक मदत देण्यापेक्षा मी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, त्या उपचारांचा खर्च शासनाने थेट उचलावा. माझ्यावर आयुष्यभर उपचार सुरू राहणार आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत कायमस्वरूपी मदतीची व्यवस्था करावी,’ अशी अपेक्षा नागेश यांनी व्यक्त केली आहे.</p>
<p>‘पैशांसाठी जीव धोक्यात घालू नका’</p>
<p>आपल्या अनुभवातून नागेश यांनी दहीहंडी खेळणाऱ्या तरुणांनाही सावध केले आहे. दहीहंडीच्या थरांची उंची वाढवून केवळ स्पर्धेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करू नका, असे ते सांगतात.</p>
<p>‘गोविंदांनी स्पर्धा करू नये. पाच-सहा थर लावून आनंदाने दहीहंडी साजरी करावी. पैशांसाठी जीव धोक्यात घालू नका. आज स्पर्धेत बक्षीस मिळेल; पण त्यानंतर काही दुर्घटना घडली तर त्रास सहन करणाऱ्या व्यक्तीकडे पाहायला कोणी येत नाही,’ असा संदेश नागेश यांनी गोविंदा पथकांना दिला आहे.</p>
<p>उंच थरांसोबत वाढते अपघाताचे धोके</p>
<p>दहीहंडीच्या उत्सवाचे स्वरूप गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलले आहे. मानवी मनोऱ्यांची उंची, विविध गोविंदा पथकांमधील स्पर्धा आणि मोठ्या बक्षिसांच्या घोषणा यामुळे थरांचा थरार वाढला आहे. मात्र, त्याचबरोबर अपघाताचा धोकाही वाढतो.</p>
<p>उंच थरावरून पडल्यास मणका, डोके, मान तसेच हात-पायांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. काही दुर्घटनांमध्ये कायमचे अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे दहीहंडीचा उत्साह कायम ठेवतानाच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज नागेश यांच्या घटनेतून अधोरेखित होते.</p>
<p>वृद्ध आई-वडिलांवर देखभालीची जबाबदारी</p>
<p>नागेश यांच्या उपचारांची आणि दैनंदिन देखभालीची जबाबदारी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांवर आहे. वडील खासगी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरी कायमस्वरूपी परिचारिका किंवा डॉक्टर ठेवणे कुटुंबाला शक्य होत नाही.</p>
<p>‘आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही घरी परिचारिका किंवा डॉक्टर ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी जे काही करायचे आहे ते आम्हालाच करावे लागते. त्याचे वडील आणि मी त्याच्यासाठी झिजत आहोत. तो ज्या वेळी, ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईल, त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा. एवढीच आमची मागणी आहे,’ अशी व्यथा नागेश यांच्या आईने व्यक्त केली.</p>
<p>दहीहंडीच्या एका अपघाताने तरुण वयातील नागेश यांचे आयुष्यच बदलले. आता उर्वरित आयुष्यासाठी सुरू असलेल्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, हीच त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा आहे. दहीहंडीच्या उत्सवात थरारापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरजही या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31722">दहीहंडीच्या थराने हिरावले तरुणपण; १८ वर्षांपासून मुलासाठी झिजणाऱ्या आईची सरकारकडे याचना</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31722/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ठाण्यात दहीहंडीचा थरार! मानाच्या हंड्यांवर कलाकारांची मांदियाळी; २५ लाखांच्या बक्षिसासाठी गोविंदांची झुंज</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31710</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31710#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 04 Sep 2026 14:54:18 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31710</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ‘ढाक्कुमाकुम&#8230; ढाक्कुमाकुम&#8230;’च्या तालावर उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. गोपाळकाळाच्या पार्श्वभूमीवर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31710">ठाण्यात दहीहंडीचा थरार! मानाच्या हंड्यांवर कलाकारांची मांदियाळी; २५ लाखांच्या बक्षिसासाठी गोविंदांची झुंज</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>‘ढाक्कुमाकुम&#8230; ढाक्कुमाकुम&#8230;’च्या तालावर उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. गोपाळकाळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मानाच्या दहीहंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाचा उत्सव केवळ गोविंदा पथकांच्या थरारापुरता मर्यादित राहणार नाही. विश्वविक्रमाचे आव्हान, लाखो रुपयांची बक्षिसे आणि मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे यंदाच्या दहीहंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.</p>
<p>टेंभी नाका, तलावपाळी, वर्तकनगर, रघुनाथनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड परिसरात भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मंडळांनी गोविंदा पथकांच्या स्वागतासाठी तसेच सुरक्षिततेसाठी जय्यत तयारी केली असून, विविध थरांसाठी रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्याच्या चुरशीसोबतच बक्षिसांसाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.</p>
<p>वर्तकनगरमध्ये विश्वविक्रमाचे आव्हान</p>
<p>वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी यंदा विशेष चर्चेत आहे. विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच १० थर रचणाऱ्या पथकासाठी ११ लाख रुपयांचे बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी जाहीर करण्यात आली आहे.</p>
<p>याशिवाय विविध थरांसाठी स्वतंत्र पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. महिला गोविंदा पथकांनाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. यंदाच्या उत्सवातून अभिजात आणि समृद्ध मराठी भाषेचा गौरव करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.</p>
<p>संकल्प प्रतिष्ठानची २१ वी दहीहंडी</p>
<p>रघुनाथनगर, वागळे इस्टेट येथे रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे २१ व्या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांच्या थरारासोबतच मनोरंजनाचा तडका हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे.</p>
<p>‘हास्य जत्रा’ फेम अमीर हडकर, अभिनेता दिगंबर नाईक, दीपक वेतकर, राजू फाटक, गायिका श्वेता दांडेकर, ‘सूर नवा ध्यास नवा’च्या तिसऱ्या पर्वातील गायक मनुव्वर अली, अभिनेते नागेश मोरवेकर, अभिनेत्री विदुला चौगुले, पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे, गायक आदेश तेलंग, नृत्यांगना सायली पराडकर आणि गायक मंगेश शिर्के आदी कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.</p>
<p>त्यामुळे गोविंदा पथकांच्या चुरशीबरोबरच संगीत, नृत्य आणि विनोदाची मेजवानी ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.</p>
<p>रेमंडमध्ये गोविंदांचा जल्लोष</p>
<p>‘गोविंदांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेमंड परिसरातही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.</p>
<p>गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांसोबत मराठी आणि हिंदी लोकनृत्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच नवयुग मित्र मंडळाच्या वतीने ठाणे जिल्हा सैनिक फेडरेशनमधील निवृत्त सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.</p>
<p>टेंभी नाक्याच्या मानाच्या हंडीचे आकर्षण</p>
<p>धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाशी जोडलेली टेंभी नाक्याची दहीहंडी ठाण्यातील मानाच्या हंड्यांपैकी एक मानली जाते. यंदाही या ठिकाणी गोविंदा पथकांच्या थरारासोबत नामवंत गायक आणि कलाकारांच्या नृत्य-संगीताचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.</p>
<p>मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती आणि महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडविणारा लावणीचा कार्यक्रम हे यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.</p>
<p>कामगार नाक्यावर संगीताची मेजवानी</p>
<p>वागळे इस्टेटमधील कामगार नाका, रोड क्रमांक २३ येथे एकनाथ भोईर फाऊंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास गायिका वैशाली सामंत, गायक रोहित राऊत, निवेदक स्वप्नील जाधव आणि गायिका अमृता दहिवेलकर यांची उपस्थिती राहणार आहे.</p>
<p>ढोल-ताशांचा गजर, मानवी मनोऱ्यांचा थरार</p>
<p>ठाण्यातील प्रमुख दहीहंड्यांबरोबरच शहरातील विविध भागांत छोट्या-मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर शहरात गोविंदा पथकांची लगबग आणि सराव सुरू राहणार असून, उत्सवाच्या दिवशी ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे’च्या घोषणा आणि उंचच उंच मानवी मनोरे यामुळे ठाणे शहर दुमदुमणार आहे.</p>
<p>यंदाच्या दहीहंडीमध्ये परंपरा, साहस, विक्रम आणि मनोरंजनाचा संगम पाहायला मिळणार असल्याने ठाणेकरांसाठी हा उत्सव विशेष ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, मानवी मनोरे रचताना गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31710">ठाण्यात दहीहंडीचा थरार! मानाच्या हंड्यांवर कलाकारांची मांदियाळी; २५ लाखांच्या बक्षिसासाठी गोविंदांची झुंज</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31710/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; २१ मुलींच्या विनयभंगाचा आरोप</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31495</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31495#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 30 Aug 2026 22:01:19 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31495</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31495">आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; २१ मुलींच्या विनयभंगाचा आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>शहापूर :</strong> </span>ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रमशाळेच्या स्वयंपाकगृहात मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या ५९ वर्षीय गणपत गवळी याच्यावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप असून, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारच्या प्रकरणात निलंबित होण्याची ही त्याची दुसरी वेळ असल्याची माहिती समोर आली आहे.</p>
<p>काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनी दुपारचे जेवण झाल्यानंतर ताटे धुण्यासाठी स्वयंपाकगृहाकडे जात असताना गवळी याने त्यांच्या अंगाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेच्या संचालिका गौरी सारक्ते यांच्याकडे तक्रार केली. मात्र, विद्यार्थिनींनी तक्रार करूनही संचालिकांनी त्याची वेळीच दखल घेतली नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.</p>
<p>त्यानंतर विद्यार्थिनींनी एका शिक्षकाकडे हा प्रकार सांगितला. संबंधित शिक्षकाने तातडीने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या चौकशीत विद्यार्थिनींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ती दडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका संचालिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या भूमिकेबाबतही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.</p>
<p>आश्रमशाळेच्या परिसरात सुरक्षेसाठी दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, घटना घडली त्यावेळी हे कॅमेरे सुरू होते की बंद, तसेच उपलब्ध फुटेज तपासण्यात आले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आश्रमशाळेत सुमारे ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.</p>
<p>प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, त्यामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापिका यांचा समावेश आहे. आश्रमशाळेत संगणक कक्ष, डिजिटल वर्ग यांसह आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याची माहितीही समोर आली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31495">आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; २१ मुलींच्या विनयभंगाचा आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31495/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>तीन महिन्यांनंतर गावदेवी भाजी मंडई पुन्हा गजबजणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31311</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31311#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 27 Aug 2026 06:08:16 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31311</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांचे प्रमुख केंद्र असलेली गावदेवी भाजी मंडई</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31311">तीन महिन्यांनंतर गावदेवी भाजी मंडई पुन्हा गजबजणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांचे प्रमुख केंद्र असलेली गावदेवी भाजी मंडई अखेर तब्बल तीन महिन्यांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. २१ मे रोजी लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर बंद असलेल्या मंडईच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम ठाणे महापालिकेने पूर्ण केले असून, गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या मंडई इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या अधिकृत ओटलेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.</p>
<p>गावदेवी मंदिर परिसरात असलेल्या या मंडईत एकूण १५५ ओटले आहेत. भाजीपाला, फळे यांच्यासह कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री येथे केली जाते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने या मंडईत दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे मंडई बंद असल्याचा परिणाम केवळ विक्रेत्यांवरच नव्हे, तर परिसरातील ग्राहकांवरही झाला होता.</p>
<p>आगीच्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू</p>
<p>२१ मे रोजी गावदेवी भाजी मंडईला अचानक भीषण आग लागली होती. आगीने काही वेळातच मंडई परिसराला विळखा घातल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग विझविताना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकारी सागर शिंदे आणि महापालिकेचे सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने ठाणे शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.</p>
<p>या दुर्घटनेनंतर मंडईतील सुरक्षितता, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच मंडई परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांचा मुद्दाही ऐरणीवर आला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मंडईच्या दुरुस्तीबरोबरच सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष दिले.</p>
<p>१ जूनपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन</p>
<p>आगीच्या घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने मंडईची दुरुस्ती करून १ जूनपर्यंत ती पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात विविध तांत्रिक अडचणी आणि दुरुस्तीच्या कामांमुळे हे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे मंडई सुरू होण्यास विलंब झाला.</p>
<p>या विलंबाचा सर्वाधिक फटका अधिकृत ओटलेधारकांना बसला. तीन महिन्यांहून अधिक काळ व्यवसाय बंद राहिल्याने भाजी विक्रेते आणि अन्य व्यावसायिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. रोजच्या विक्रीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.</p>
<p>मंडई पुन्हा सुरू होणार; विक्रेत्यांना दिलासा</p>
<p>महापालिका प्रशासनाने अखेर दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम पूर्ण केले असून मंडई लोकार्पणासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंडईचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर अधिकृत ओटलेधारकांना पुन्हा आपला व्यवसाय सुरू करता येणार आहे.</p>
<p>मंडई पुन्हा सुरू झाल्याने विक्रेत्यांसोबतच परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना भाजीपाला व इतर वस्तूंसाठी परिसरातील पर्यायी बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत होते. आता गावदेवी मंडई पुन्हा सुरू झाल्यानंतर परिसरातील बाजारपेठेला पूर्वीची गती मिळण्याची अपेक्षा आहे.</p>
<p>अनधिकृत व्यवसायांचा मुद्दा पुन्हा चर्चेत</p>
<p>दरम्यान, आगीच्या दुर्घटनेनंतर मंडई परिसरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांचा मुद्दा चर्चेत आला होता. मंडईतील अधिकृत १५५ ओटलेधारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध असताना त्याबाहेरील अनधिकृत व्यवसायांवर प्रशासन कितपत नियंत्रण ठेवणार, हा प्रश्नही उपस्थित झाला होता.</p>
<p>मंडईचे लोकार्पण होत असताना भविष्यात अग्निसुरक्षा नियमांचे पालन, अनधिकृत व्यवसायांना आळा आणि मंडई परिसरातील गर्दीचे नियोजन याकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहणे अपेक्षित आहे. २१ मेच्या दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांना गमावल्यानंतर आता नव्याने सुरू होणारी मंडई अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31311">तीन महिन्यांनंतर गावदेवी भाजी मंडई पुन्हा गजबजणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31311/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ईद-ए-मिलादनिमित्त ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंब्र्यात वाहतुकीत मोठे बदल</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31222</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31222#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 25 Aug 2026 17:58:29 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31222</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांमध्ये</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31222">ईद-ए-मिलादनिमित्त ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंब्र्यात वाहतुकीत मोठे बदल</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्रा परिसरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने व्यापक वाहतूक नियोजन केले आहे. बुधवारी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध मार्गांवर प्रवेशबंदी, वाहतूक वळविणे तसेच वाहनतळासंदर्भात निर्बंध लागू राहणार आहेत.</p>
<p>मिरवणुकीच्या मार्गांवर वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी शक्यतो मिरवणुकीच्या मार्गावर जाणे टाळावे आणि पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना अंबाडी नाक्यावर अडथळा</p>
<p>वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ किंवा मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गाचा वापर करून पुढे जाता येईल.</p>
<p>तसेच वाडा येथून नदीनाका मार्गे भिवंडी शहरात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा येथे प्रवेशबंदी असेल. हलकी वाहने पारोळ फाटा येथून उजवे वळण घेऊन खोणीगाव, तळवळी फाटा, कांबा रोड आणि वसई रोडमार्गे करावली किंवा विश्वभारती फाटा येथून गोरसईगावमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील.</p>
<p>वडपे तपासणी नाक्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग बदल</p>
<p>वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांबोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.</p>
<p>या मार्गावरील वाहने धामणकरनाका जलवाहिनी येथे उजवे वळण घेऊन जलवाहिनी मार्गाने वाडा किंवा पुढील ठिकाणी जाऊ शकतील. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका येथे उतरविण्यात येणार आहे.</p>
<p>दरम्यान, ठाणे आणि कल्याणकडून जुना आग्रा रोडमार्गे वाडा, चाविंद्रा आणि मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंपाच्या पुढे प्रवेशबंदी असेल. या वाहनांनी पेट्रोल पंपाजवळून उजवे वळण घेऊन नागावमार्गे पुढे जावे.</p>
<p>रांजनोळी नाक्यावर एसटी, केडीएमटी आणि इतर वाहनांना प्रवेशबंदी</p>
<p>रांजनोळी चौकातून भिवंडी शहराच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस, केडीएमटी बस, जड-अवजड वाहने, रिक्षा तसेच मध्यम आणि हलक्या वाहनांना रांजनोळी नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.</p>
<p>जड-अवजड, मध्यम आणि हलक्या वाहनांना रांजनोळी नाक्यावरून वळसा घालून मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका, अंजूरफाटा, वसई रोड किंवा ओवळी खिंडमार्गे ओवळी गाव, ताडाळी जकात नाका आणि जलवाहिनी मार्गाने पुढे जाता येईल.</p>
<p>एसटी, केडीएमटी आणि रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रांजनोळी नाका येथे उतरावे लागणार आहे.</p>
<p>राबोडीतही वाहतूक बदल</p>
<p>ठाणे शहरातील राबोडी परिसरातील के. व्हिला नाका मार्गे आकाशगंगा आणि राबोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना के. व्हिला येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.</p>
<p>या वाहनांनी के. व्हिला नाक्यावरून सरळ मीनाताई ठाकरे चौक रोडने जुने राबोडी पोलीस ठाणे मार्गे इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.</p>
<p>पत्रीपुलावरून वाहतूक वळविणार</p>
<p>कल्याणमधील पत्रीपुल परिसरातही वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. एपीएमसी बाजार आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेशबंदी असेल.</p>
<p>या वाहनांनी पत्रीपुल येथून डावीकडे वळून गोविंदवाडी बायपासमार्गे पुढे इच्छितस्थळी जावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.</p>
<p>विठ्ठलवाडीत मिरवणुकीनुसार वाहतूक तात्पुरती बंद</p>
<p>विठ्ठलवाडी परिसरातील नेहरूनगर, उल्हासनगर जुना बस स्टॉप, मेन रोड, हिललाइन पोलीस ठाण्यासमोरील रस्ता, नेताजी चौक, भाटिया चौक, कुर्ला कॅम्प रोड, समतानगर रोड आणि कैलास कॉलनी या मिरवणुकीच्या मार्गावर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत.</p>
<p>मिरवणूक पुढील चौकात मार्गस्थ झाल्यानंतर संबंधित मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. मिरवणुकीच्या मार्गावर वाहने उभी करण्यासही बंदी असेल. वाहनचालकांना मुख्य रस्ता सोडून परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गांवर वाहने उभी करण्याची मुभा देण्यात आली आहे.</p>
<p>मुंब्र्यात अवजड वाहनांसह बसलाही प्रवेशबंदी</p>
<p>मुंब्रा परिसरातही मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन करण्यात आले आहे. रेतीबंदरमार्गे मुंब्रा शहरात जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना रेतीबंदर तसेच वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.</p>
<p>या वाहनांनी रेतीबंदर-मुंब्रा बाह्यवळण मार्गाचा वापर करून पुढे इच्छितस्थळी जावे.</p>
<p>तसेच रेतीबंदरमार्गे मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व खासगी आणि सरकारी बसगाड्यांनाही रेतीबंदर व वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी राहणार आहे. या बसमधील प्रवाशांना रेतीबंदर परिसरात उतरावे लागेल किंवा बसला मुंब्रा बाह्यवळण मार्गाने पुढे जाता येईल.</p>
<p>वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन</p>
<p>ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पर्यायी मार्गांवरील वाहतुकीवरही होऊ शकतो. त्यामुळे वाहनचालकांनी बुधवारी दुपारी २ ते रात्री १० या कालावधीत प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, मिरवणुकीच्या मार्गावर वाहने नेणे टाळावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>मिरवणूक जसजशी पुढे सरकेल, तसतसे काही मार्गांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31222">ईद-ए-मिलादनिमित्त ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंब्र्यात वाहतुकीत मोठे बदल</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31222/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतींना चित्रकलेतून उजाळा; ठाण्यात उद्या ‘आनंद चित्रकथा’</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31124</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31124#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 24 Aug 2026 06:04:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31124</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ठाणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर आपल्या कार्याची ठसठशीत छाप उमटविणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५व्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31124">धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतींना चित्रकलेतून उजाळा; ठाण्यात उद्या ‘आनंद चित्रकथा’</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ठाणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर आपल्या कार्याची ठसठशीत छाप उमटविणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी (२५ ऑगस्ट) ‘आनंद चित्रकथा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारटक्के फाऊंडेशन, येवनेट मल्टिमीडिया प्रा. लि. आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.</p>
<p>ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.</p>
<p>धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख केवळ राजकीय किंवा सामाजिक संदर्भात न राहता ती विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीतून पुढे यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील शासकीय, महापालिका, खासगी तसेच अन्य शाळांमधील केजीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात राहणार आहे. कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे.</p>
<p>चित्रकलेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे कार्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या सामाजिक कार्यातील विविध पैलू, सामान्य नागरिकांशी असलेले त्यांचे नाते, समाजासाठी केलेले कार्य आणि त्यातून निर्माण झालेली प्रेरणा विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून मांडली जाणार आहे. त्यामुळे ‘आनंद चित्रकथा’ हा केवळ चित्रकला स्पर्धेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कलात्मक जाणिवेला आणि सामाजिक भानाला चालना देणारा उपक्रम ठरण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.</p>
<p>मान्यवरांचा पुरस्काराने गौरव</p>
<p>या कार्यक्रमाच्या निमित्ताने कला आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना ‘धर्मवीर आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.</p>
<p>कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.</p>
<p>धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘आनंद चित्रकथा’मध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाण्याचे नगरसेवक तथा बारटक्के फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप बारटक्के यांनी केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31124">धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतींना चित्रकलेतून उजाळा; ठाण्यात उद्या ‘आनंद चित्रकथा’</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31124/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
