<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>ठाणे Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/thane/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/thane</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Thu, 16 Apr 2026 05:21:14 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2025/01/satara-150x150.png</url>
	<title>ठाणे Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/thane</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>ठाणे रेल्वे स्थानकाचा आज १७३ वा वर्धापन दिन; ऐतिहासिक वारशाचा उत्सव</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24519</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24519#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 05:21:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24519</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक चा १७३ वा वर्धापन दिन आज, गुरुवारी उत्साहात</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24519">ठाणे रेल्वे स्थानकाचा आज १७३ वा वर्धापन दिन; ऐतिहासिक वारशाचा उत्सव</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णपान ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक चा १७३ वा वर्धापन दिन आज, गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. देशातील पहिल्या रेल्वे प्रवासाच्या साक्षीदार ठरलेल्या या स्थानकाच्या वाढदिवसानिमित्त विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>भारतातील पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावर धावली होती. सुमारे ३३.८ किमी अंतर केवळ ५७ मिनिटांत पार करणाऱ्या या ऐतिहासिक प्रवासात ‘साहिब, सिंध आणि सुलतान’ या वाफेच्या इंजिनांनी १४ डब्यांची गाडी ओढली होती. या गाडीत सुमारे ४०० पाहुणे प्रवासी होते. भारतीय रेल्वेच्या प्रवासाची ही सुरुवात आजही अभिमानाने स्मरली जाते.</p>
<p>या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांच्या पुढाकाराने आज सकाळी ११ वाजता स्थानकाच्या फलाट क्रमांक एकजवळील जुन्या रेल्वे इंजिनाजवळ मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.</p>
<p>कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ, आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांची उपस्थिती अपेक्षित आहे.</p>
<p>दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठाणे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत. पश्चिमेकडील सॅटीस पुलानंतर आता पूर्वेकडील सॅटीस पुलाचे कामही वेगाने सुरू असून, सुमारे २.२४ किमी लांबीचा उन्नत मार्ग, १२ मीटर रुंद मार्गिका आणि सुमारे ९ हजार चौरस मीटर डेक उभारण्यात येणार आहे. याशिवाय ११ मजली बहुउद्देशीय इमारतीत वाहनतळ, रेल्वे व बस सेवा तसेच व्यापारी संकुल उभारण्याची योजना आहे.</p>
<p>दरम्यान, १८५३ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वे प्रवासाचा विस्तार आज देशाच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. प्रारंभीची ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी पुढे १९०० मध्ये इंडियन मिडलँड रेल्वेत विलीन झाली आणि दिल्ली, कानपूर, अलाहाबाद ते नागपूर व रायचूरपर्यंत विस्तारली. पुढे ३ फेब्रुवारी १९२५ रोजी बॉम्बे व्हीटी ते कुर्ला दरम्यान देशातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सेवा सुरू झाली, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा पाया रचला गेला.</p>
<p>इतिहासाचा साक्षीदार असलेले ठाणे स्थानक आजही आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24519">ठाणे रेल्वे स्थानकाचा आज १७३ वा वर्धापन दिन; ऐतिहासिक वारशाचा उत्सव</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24519/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>“कैसे हराया’ म्हणणाऱ्या सहर शेख आता स्वतःच वादाच्या भोवऱ्यात” जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24473</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24473#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 16:09:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24473</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली ‘कैसे हराया’ ही घोषणा आता सहर शेख यांच्यासाठीच अडचणीचे</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24473">“कैसे हराया’ म्हणणाऱ्या सहर शेख आता स्वतःच वादाच्या भोवऱ्यात” जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली ‘कैसे हराया’ ही घोषणा आता सहर शेख यांच्यासाठीच अडचणीचे कारण ठरताना दिसत आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चर्चेत आलेल्या सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्याविरोधात जात प्रमाणपत्र प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाच्या चौकशीत समोर आला आहे.</p>
<p>या प्रकरणामुळे सहर शेख यांचे नगरसेविका पद धोक्यात आले असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र प्रथमदर्शनी अवैध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>चार शासकीय यंत्रणांची दिशाभूल</p>
<p>चौकशीत असे आढळून आले की, संबंधितांनी बनावट किंवा दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे राज्यातील चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांकडून लाभ घेतला. यात राज्य निवडणूक आयोग, ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा समावेश आहे. या सर्व यंत्रणांना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे.</p>
<p>‘नमुना ८’चा वापर, ‘नमुना १०’चा अभाव</p>
<p>तक्रारदार जावेद सिद्दीकी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, युनूस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असून महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांना ‘नमुना १०’ अंतर्गत प्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी ‘नमुना ८’ चा वापर करून इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप आहे.</p>
<p>याच प्रमाणपत्राच्या आधारे सहर शेख यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यामुळे आरक्षणाच्या निकषांचे उल्लंघन झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.</p>
<p>कागदपत्रांतील गंभीर त्रुटी</p>
<p>तहसीलदारांच्या अहवालात अनेक विसंगती अधोरेखित करण्यात आल्या आहेत. सहर शेख यांनी सादर केलेल्या जात दाखल्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख नसणे, अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसणे, तसेच युनूस शेख यांच्या शालेय दाखल्यांमधील नावातील बदल यांसारख्या बाबी संशय निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत.</p>
<p>याशिवाय, संबंधित कुटुंबीयांचे मूळ वास्तव्य गाझियाबाद येथे असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र कसे मिळाले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.</p>
<p>सुनावणीतील घडामोडी</p>
<p>या प्रकरणातील पहिली सुनावणी टाळल्यानंतर दुसऱ्या सुनावणीत प्रशासनाने सादर केलेल्या पुराव्यांमुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. संबंधितांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची विश्वासार्हता संशयास्पद असल्याचे प्रशासनाचे मत आहे.</p>
<p>गुन्हा दाखल होण्याची शक्यता</p>
<p>उपविभागीय अधिकारी आणि कोकण विभागीय जात पडताळणी समितीने या प्रकरणात फौजदारी कारवाईची शिफारस केली आहे. खोटी माहिती देणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आणि शासकीय यंत्रणांची दिशाभूल करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.</p>
<p>दरम्यान, या प्रकरणामुळे ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सहर शेख यांचे पद रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24473">“कैसे हराया’ म्हणणाऱ्या सहर शेख आता स्वतःच वादाच्या भोवऱ्यात” जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24473/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ठाण्यात आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल;  पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24370</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24370#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 14 Apr 2026 03:51:33 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24370</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे, प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ठाणे शहरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरासह</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24370">ठाण्यात आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल;  पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे, प्रतिनिधी</strong></span></p>
<p>डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ठाणे शहरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरासह उपनगरांमध्ये एकूण ६४ मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने मंगळवारी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीत बदल लागू केले आहेत.</p>
<p>कोर्ट नाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खोपट, कोपरी आनंदनगर, धामणकर नाका, डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण फाटा, उल्हासनगर गोल मैदान तसेच सुभाष टेकडी या भागांतून मिरवणुका निघणार असल्याने या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खोपट येथून सकाळी संविधान रॅली काढण्यात येणार असून कोर्ट नाका आणि स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर स्मारकाजवळ तसेच कोपरी भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळच्या सुमारास मोठ्या मिरवणुकांची गर्दी अपेक्षित असल्याने पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.</p>
<p>ठाणे शहरातील प्रमुख बदल</p>
<p>जीपीओ ते कोर्ट नाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना जीपीओ येथे प्रवेश बंद राहील. ही वाहने सेंट्रल मैदान, ठाणे मध्यवर्ती कारागृह, दादोजी कोंडदेव स्टेडियम, अग्निशमन दल मार्गे वळविण्यात येतील. कळवा खाडी पुलाकडून येणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी राहील.</p>
<p>सॅटीस पुलावरून जाणाऱ्या टीएमटी व एसटी बसांना टॉवर नाका व टेंभी नाका मार्गे प्रवेश न देता गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास मार्गे वळविण्यात येणार आहे. टॉवर नाका–टेंभी नाका परिसरातील रिक्षा व चारचाकी वाहनांना मुस चौक येथे प्रवेशबंदी राहील.</p>
<p>कॅडबरी व नौपाड्याकडून डॉ. आंबेडकर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना खोपट येथे अडवून कोलबाड व मिनाताई ठाकरे चौक मार्गे वळवले जाईल. तसेच आंबेडकर रोडवरून खोपटकडे येणाऱ्या वाहनांना उथळसर नाका मार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.</p>
<p>डोंबिवलीत १० ठिकाणी बंदी</p>
<p>डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पाटणकर चौक, कोपर ब्रिज, रेतीबंदर चौक, म्हसोबा चौक, ठाकुर्ली टी-पॉइंट आदी दहा ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>भिवंडीतील निर्बंध</p>
<p>धामणकर नाका व रांजनोली चौकातून स्व. आनंद दिघे चौक आणि केशरबाग नाका येथे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहील. या वाहनांना वंजारपट्टी मार्गे वळविण्यात येणार आहे.</p>
<p>उल्हासनगरमध्ये पार्किंगलाही मनाई</p>
<p>गोल मैदान, नेहरू चौक, न्यू इरा चौक, शिवाजी चौक ते डॉ. आंबेडकर चौक या मार्गावर वाहन उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सुभाष टेकडी ते लाल चक्की चौक दरम्यान मिरवणूक संपेपर्यंत पूर्णतः प्रवेशबंदी राहील.</p>
<p>कल्याणमध्येही बदल</p>
<p>कल्याण पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र चौक व कल्याण फाटा येथे वाहनांना प्रवेशबंदी राहील. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण, खारेगाव व मुंबई-नाशिक महामार्गाने वळवली जातील. शहाड जकात नाका मार्गे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रेम ऑटो सर्कल येथे अडविण्यात येईल. तसेच जड-अवजड वाहनांसाठी काही मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. याची वाहन चालकांनी दखल घ्यावी.<br />
दरम्यान, मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी संयम राखून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पर्यायी मार्गांचा अवलंब केल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24370">ठाण्यात आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल;  पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24370/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मेघना पवार यांची &#8216;स्वराज्य पोलीस मित्र&#8217; संघटनेच्या कल्याण तालुका संपर्क प्रमुखपदी निवड</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24112</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24112#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 08 Apr 2026 12:45:29 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24112</guid>

					<description><![CDATA[<p>रणजित मस्के &#124; प्रतिनिधी ठाणे: स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या ठाणे व मुंबई विभागातील</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24112">मेघना पवार यांची &#8216;स्वराज्य पोलीस मित्र&#8217; संघटनेच्या कल्याण तालुका संपर्क प्रमुखपदी निवड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>रणजित मस्के | प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ठाणे: स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या ठाणे व मुंबई विभागातील मुख्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ठाणे येथील रेल्वे ऑफिसमध्ये संपन्न झाली. या बैठकीत कल्याण येथील सामाजिक कार्यकर्त्या मेघना किरण पवार यांची संघटनेच्या &#8216;कल्याण तालुका संपर्क प्रमुख&#8217; पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ५ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या या सभेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मेघना यांचा विशेष सन्मान करून त्यांना पुढील जबाबदारी सोपवण्यात आली.</p>
<p>मेघना पवार या संघटनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उज्वला किरण पवार यांच्या कन्या आहेत. &#8216;रक्तदान हेच महादान&#8217; हा मंत्र जपत मेघना यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यांतही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत ही निवड करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मेघना पवार यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे कल्याण तालुक्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24112">मेघना पवार यांची &#8216;स्वराज्य पोलीस मित्र&#8217; संघटनेच्या कल्याण तालुका संपर्क प्रमुखपदी निवड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24112/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>VIDEO &#124; एकविरा देवी यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/23279</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/23279#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 22 Mar 2026 20:31:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=23279</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ठाणे : लोणावळा येथील एकविरा देवी मंदिर येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी जाहीर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23279">VIDEO | एकविरा देवी यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ठाणे : लोणावळा येथील एकविरा देवी मंदिर येथे होणाऱ्या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस ही टोलमाफी लागू राहणार आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="550" data-dnt="true">
<p lang="mr" dir="ltr">देवी भक्तांसाठी आनंदाची बातमी — एकविरा आईच्या यात्रेसाठी तीन दिवस टोल माफ! <a href="https://t.co/P7X4os90Pl">pic.twitter.com/P7X4os90Pl</a></p>
<p>&mdash; Balya Mama &#8211; Suresh Rekha Gopinath Mhatre (@MeBalyaMama) <a href="https://twitter.com/MeBalyaMama/status/2035658320330342540?ref_src=twsrc%5Etfw">March 22, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>राज्यातील आगरी-कोळी समाजाचे कुळदैवत असलेल्या एकविरा देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर तसेच रायगड जिल्ह्यातील हजारो भाविक लोणावळा येथे दर्शनासाठी जात असतात. मोठ्या संख्येने भाविक वाहनांनी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करत असल्याने टोलमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच टोल नाक्यांवर अनेकदा वादाचे प्रसंग आणि वाहतूक कोंडीही होत होती.</p>
<p>या पार्श्वभूमीवर टोलमाफीची मागणी करण्यात आली होती. महामार्ग व टोल प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून यात्रेच्या तीन दिवसांत टोलमाफी लागू राहणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिली.</p>
<p>दरम्यान, टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे अधिकृत पत्र आवश्यक असणार आहे. हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यानंतर एकविरा देवीच्या भाविकांना टोलमाफी दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23279">VIDEO | एकविरा देवी यात्रेनिमित्त मुंबई-पुणे महामार्गावर तीन दिवस टोलमाफी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/23279/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ई-चलान म्हणजे ‘डिजिटल रॉबरी’; वाहतूकदार संघटनांचा आझाद मैदानावर मोर्चा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/22593</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/22593#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 05 Mar 2026 10:21:27 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=22593</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी ई-चलानच्या माध्यमातून राज्य सरकार महसूल वाढविण्याचा प्रयत्न करत असून वाहतूकदारांवर अन्यायकारक दंडाची कारवाई केली जात आहे,</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/22593">ई-चलान म्हणजे ‘डिजिटल रॉबरी’; वाहतूकदार संघटनांचा आझाद मैदानावर मोर्चा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ई-चलानच्या माध्यमातून राज्य सरकार महसूल वाढविण्याचा प्रयत्न करत असून वाहतूकदारांवर अन्यायकारक दंडाची कारवाई केली जात आहे, असा गंभीर आरोप वाहतूकदार संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ई-चलानविरोधात गुरुवारी आझाद मैदान येथे वाहनांसह मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.</p>
<p>ई-चलानविरोधात ५ मार्चपासून संप पुकारण्याचा निर्णय विविध वाहतूकदार संघटनांनी घेतला आहे. या आंदोलनासाठी सर्व संघटनांनी एकत्र येत ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’ची स्थापना केली आहे. बुधवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीच्या सदस्यांनी आंदोलनाची माहिती दिली.</p>
<p>संघटनांच्या मते, वाहतूक नियमभंगाच्या कारवाईसाठी पोलिसांना ठरावीक लक्ष्य (टार्गेट) देण्यात येत असून त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर दंडाच्या केसेस नोंदवल्या जात आहेत. त्यामुळे ई-चलानची संख्या सातत्याने वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.</p>
<p>ई-चलानमधील दंडातून सवलत देण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी नाराजी वाहतूकदारांनी व्यक्त केली. परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनीही ई-चलानमुळे वाहतूकदारांना अडचणी येत असल्याची कबुली दिली होती; मात्र ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असे संघटनांचे म्हणणे आहे.</p>
<p>मुंबई महानगरातील सुमारे ४० हजार बसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बस मालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी सांगितले की, ई-चलानच्या नावाखाली गैरप्रकार होत असून प्रत्येक कॉन्स्टेबलला कारवाईचे लक्ष्य दिले जात आहे. त्यामुळे ही व्यवस्था महसूल वाढविण्याचे साधन बनल्याचा आरोप त्यांनी केला. ई-चलान ही केवळ वाहतूकदारांसाठीच नव्हे तर सर्व वाहनधारकांसाठी जाचक ठरत असल्याने ती रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.</p>
<p>‘पुराव्याविना दंडवसुली’चा आरोप</p>
<p>संघटनेचे पदाधिकारी के. व्ही. शेट्टी यांनी ई-चलान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, ई-चलानसाठी वापरण्यात येणारी उपकरणे मान्यताप्राप्त नसून अनेक प्रकरणांत पुराव्याशिवायच दंड आकारला जातो. पुरावा म्हणून दिली जाणारी छायाचित्रे अनेकदा धुसर असतात, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेला त्यांनी ‘सरकारची डिजिटल रॉबरी’ असे संबोधले.</p>
<p>या पार्श्वभूमीवर गुरुवारी आझाद मैदान येथे वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येणार असून शासनाने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वाहतूकदार संघटनांनी दिला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/22593">ई-चलान म्हणजे ‘डिजिटल रॉबरी’; वाहतूकदार संघटनांचा आझाद मैदानावर मोर्चा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/22593/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>१२ वीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू&#8221; डोंबिवली–कळवा मार्गावर सकाळची गर्दी ठरली घातक</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/21379</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/21379#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 11 Feb 2026 04:08:21 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=21379</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी बारावीची परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. डोंबिवली</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/21379">१२ वीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू&#8221; डोंबिवली–कळवा मार्गावर सकाळची गर्दी ठरली घातक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>बारावीची परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. डोंबिवली येथील रहिवासी असलेला सोहम कठरे (वय १८) याचा मृतदेह कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांजवळ आढळून आला. लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन तो खाली पडल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.</p>
<p>सोहम कठरे हा डोंबिवली येथे आई-वडिलांसोबत वास्तव्यास होता. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, तो मंगळवारी सकाळी कळवा येथे परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होता. सकाळच्या वेळेत मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच गर्दीतून प्रवास करत असताना कळवा–मुंब्रा दरम्यान तोल जाऊन तो रेल्वेगाडीतून खाली पडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.</p>
<p>मंगळवारी सकाळी रेल्वे रुळांजवळ एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने सोहम याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.</p>
<p>या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले असून, घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच, घटनेच्या वेळी त्या लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी किंवा प्रत्यक्षदर्शी यांचा शोध घेण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे.</p>
<p>दरम्यान, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठ्या तणावात प्रवास करावा लागतो. सकाळच्या वेळेत लोकलमधील गर्दी ही जीवघेणी ठरत असल्याच्या घटना वारंवार घडत असून, या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूमुळे कठरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/21379">१२ वीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू&#8221; डोंबिवली–कळवा मार्गावर सकाळची गर्दी ठरली घातक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/21379/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>दिसायला तरुण, कर्तृत्व मात्र परिपक्व; २२ व्या वर्षी आयपीएस झालेला मराठी चेहरा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/20725</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/20725#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 27 Jan 2026 03:22:24 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=20725</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे &#124; प्रतिनिधी कपाळावर अशोकस्तंभ, खांद्यावर चमकणारे तारे आणि अंगात खाकी वर्दी-मात्र चेहऱ्यावर अजूनही महाविद्यालयीन तरुणाचीच छाप. राजस्थान</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/20725">दिसायला तरुण, कर्तृत्व मात्र परिपक्व; २२ व्या वर्षी आयपीएस झालेला मराठी चेहरा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>ठाणे | प्रतिनिधी</strong></p>
<p>कपाळावर अशोकस्तंभ, खांद्यावर चमकणारे तारे आणि अंगात खाकी वर्दी-मात्र चेहऱ्यावर अजूनही महाविद्यालयीन तरुणाचीच छाप. राजस्थान केडरमधील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी म्हणून अभिजीत पाटील सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जेनरेशन झेडमधील या अधिकाऱ्याने कोणत्याही महागड्या कोचिंगशिवाय, पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून अनेकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.</p>
<p>११ जून १९९९ रोजी ठाण्यात जन्मलेल्या अभिजीत पाटील यांनी बी.टेक. (सिव्हिल व एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग) शिक्षण घेत असतानाच यूपीएससीची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, पदवी परीक्षेचा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी यूपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली होती. २०२२ च्या यूपीएससी परीक्षेत देशात ४७० वी रँक मिळवत त्यांनी आयपीएस पदावर आपली निवड निश्चित केली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस होणाऱ्या अभिजीत पाटील यांची देशातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी गणना होते.</p>
<p>कमी वयात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली असली, तरी आत्मविश्वास आणि कामातील शिस्तीमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बेबी फेस’मुळे अनेकदा लोक गोंधळतात; मात्र निर्णयक्षमता आणि कार्यतत्परतेमुळे ते सहकाऱ्यांमध्येही विश्वासार्ह ठरले आहेत.</p>
<p>अभिजीत यांचे वडील बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते, तर आई सिंचन विभागात सेवेत होत्या. दोघेही सध्या निवृत्त आहेत. ठाणे येथे राहणाऱ्या या कुटुंबाचा मूळचा महाराष्ट्राशी घट्ट संबंध आहे. अभिजीत यांना दोन बहिणी असून ते कुटुंबातील धाकटे आहेत.</p>
<p>पदवीच्या शेवटच्या वर्षातच यूपीएससीचा अभ्यास सुरू करणाऱ्या अभिजीत पाटील यांचे वय २०२६ मध्ये २६ वर्षे आहे. मात्र त्यांच्या जिद्दीचा आणि शिस्तबद्ध तयारीचा प्रवास पाहता, अनुभवाने मोठ्या असलेल्यांनाही त्यांचा अभिमान वाटावा असा हा प्रवास आहे. वय लहान असले तरी कर्तृत्व मोठे असू शकते, याचेच जिवंत उदाहरण म्हणजे अभिजीत पाटील.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/20725">दिसायला तरुण, कर्तृत्व मात्र परिपक्व; २२ व्या वर्षी आयपीएस झालेला मराठी चेहरा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/20725/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>‘पूर्वीचा भाजप मेलाय, आताचा भाजप फक्त सत्तेचा व्यापारी’ &#8216;ठाण्यातील संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/20155</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/20155#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 13 Jan 2026 05:42:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=20155</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/20155">‘पूर्वीचा भाजप मेलाय, आताचा भाजप फक्त सत्तेचा व्यापारी’ &#8216;ठाण्यातील संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. “पूर्वीचा भाजप मेलाय, आताचा भाजप फक्त सत्तेचा आणि पैशांचा व्यापारी झाला आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.</p>
<p>सध्याच्या राजकारणात उमेदवारी मागे घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर दिल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी पैशांना नकार देत निवडणूक लढवणाऱ्या ‘ज्योती ताई’ यांना मंचावर बोलावून त्यांचे कौतुक केले. “पैशांना न झुकणं हीच खरी लोकशाही आहे,” असे ते म्हणाले.</p>
<p>‘ही शेवटची निवडणूक ठरू शकते’</p>
<p>“सामान्य जनतेसाठी ही शेवटची निवडणूक ठरू शकते,” असा इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, “यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील, असं वाटत नाही. महापौर कोण होणार, हेही ठरवण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राहील की नाही, हा प्रश्न आहे.”</p>
<p>राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “एकत्र का येत नाही, असा प्रश्न विचारला जायचा. आता आलो तरीही प्रश्न संपले नाहीत. पण मराठी माणसाला जागं करण्यासाठी ही युती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>भाषा, अस्मिता आणि ‘गद्दारी’वर घणाघात</p>
<p>“मराठीबाबत बोललं की लगेच इतर भाषिकांचं काय, असा सवाल केला जातो. पण आमच्या घरात जो दादागिरी करतो, त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं नाही तर छत्रपतींचं राज्य कसलं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.</p>
<p>“मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे. पण आई मेली तरी चालेल, अशी मानसिकता असणारे लोक महाराष्ट्रात कसे चालतात?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि फुटीर गटावर निशाणा साधला.</p>
<p>शिंदे–भाजपवर थेट टीका</p>
<p>“जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो, तोच माणूस ठाण्याशीही गद्दारी करतो,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केले. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचाही त्यांनी समाचार घेतला.</p>
<p>“बिबट्यांसाठी ‘शूट अ‍ॅट साइट’चे आदेश दिले जातात, पण जंगलाची जमीन सही करून विकणाऱ्यांवर ‘शूट अ‍ॅट साइन’ची हिंमत वनमंत्री दाखवणार का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.</p>
<p>ठाण्याचा विकास आणि बाळासाहेबांची आठवण</p>
<p>ठाण्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “कधीकाळी ठाण्यात बैलगाडीतून प्रचार व्हायचा. २०१२ च्या शेवटच्या महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी ठाण्याला विशेष महत्त्व दिलं होतं. ‘एक सभा मुंबईत आणि एक माझ्या ठाण्यात,’ असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं.”</p>
<p>ठाण्यातील नाट्यगृह, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि गडकरी रंगायतन यांचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकाळातील विकासकामांची आठवण करून दिली.</p>
<p>पोस्टर, पर्यावरण आणि ‘विनाशाची गती’</p>
<p>ठाण्यात लावण्यात आलेल्या सरकारी पोस्टरवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ही विकासाची नाही, तर विनाशाची गती आहे.” मुलुंड मेट्रो प्रकल्पामुळे पर्यावरणावर निर्माण झालेल्या संकटाकडे लक्ष वेधत त्यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली.</p>
<p>“आज मुंबईत श्वास घ्यायलाही त्रास होतो. उद्या काही झालं तर हे गद्दार हेलिकॉप्टरने पळून जातील, कुणी नागपूरला, कुणी दिल्लीला,” असा आरोप त्यांनी केला.</p>
<p>बीएमसीचा खजिना आणि कर्जाचा डोंगर</p>
<p>मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बीएमसीच्या ठेवी ९२ हजार कोटींपर्यंत होत्या. त्यातून ७० हजार कोटी काढण्यात आले. आता महापालिकेच्या डोक्यावर सुमारे ३ लाख कोटींचं कर्ज आहे. पैसा परत कुठून येणार?”</p>
<p>ऑक्ट्रॉय बंदी, उद्योगांचे गुजरातकडे स्थलांतर आणि केंद्राच्या धोरणांवर टीका करत त्यांनी आरोप केला की, “इंग्रजांनी जेवढं लुटलं नाही, तेवढं भाजप सत्तेच्या जोरावर लुटत आहे.”</p>
<p>नगरसेवक पदासाठी कोट्यवधी रुपये वाटले जात असल्याचा आरोप करत, “हा पैसा कुणाच्या खिशातून येतो?” असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण संपवले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/20155">‘पूर्वीचा भाजप मेलाय, आताचा भाजप फक्त सत्तेचा व्यापारी’ &#8216;ठाण्यातील संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/20155/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>“कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटींची ऑफर”; राज ठाकरेंचा महायुतीवर गंभीर आरोप</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/20144</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/20144#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 13 Jan 2026 02:58:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=20144</guid>

					<description><![CDATA[<p>ठाणे प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. प्रचाराच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/20144">“कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटींची ऑफर”; राज ठाकरेंचा महायुतीवर गंभीर आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>ठाणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील संयुक्त सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले.</p>
<p>उमेदवारी मागे घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर थेट आरोपांची तोफ डागली. “कुणाला १ कोटी, कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, तर कुणाला थेट १५ कोटींची ऑफर देण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.</p>
<p>“प्रचार थांबताच पैसे वाटप सुरू होईल”</p>
<p>सभा संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, “निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उद्या प्रचार थांबेल आणि त्यानंतर घराघरांत पैसे वाटप सुरू होईल. आधीच काही ठिकाणी पैसे वाटायला सुरुवात झाली आहे. भाजपाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेंच्या सेनेचे लोक ते पैसे पकडत आहेत. मग या सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे, हेच समजत नाही.”</p>
<p>कल्याण-डोंबिवली परिसराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “मी नुकताच कल्याण-डोंबिवलीत फिरलो. तिथे प्रचंड वातावरण आहे. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यामुळे काही लोक आजच्या सभेला येऊ शकले नाहीत. आज तिथे घराघरांत पाच-पाच हजार रुपये वाटले जात आहेत. मग तुम्ही नेमका कोणता विकास केला? कल्याण-डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडला आहे.”</p>
<p>‘एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर’</p>
<p>राज ठाकरे यांनी उमेदवारांना दिल्या जात असल्याच्या कथित ऑफर्सचा तपशील देताना सांगितले की, “एका प्रभागात एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना मिळून १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्या कुटुंबाने ही ऑफर नाकारली. एका महिला उमेदवाराला ५ कोटींची, तर दुसऱ्या एका उमेदवाराला १ कोटींची ऑफर देण्यात आली. म्हणजे कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटी अशा पद्धतीने उमेदवारी मागे घेण्यासाठी व्यवहार सुरू आहेत.”</p>
<p>फडणवीसांवर टोलेबाजी</p>
<p>यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय? हे सगळे फक्त ससाणे आहेत, जाऊन पक्षीच मारून आणायचे आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.</p>
<p>गौतम अदाणी यांच्या संदर्भात सुरू झालेल्या चर्चेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी अदाणींचं प्रकरण काढताच काही लोकांच्या मिरच्या झोंबल्या. मग माझा आणि अदाणींचा फोटो फिरवायला लागले. माझ्या घरी गौतम अदाणी आले होते, रतन टाटा आले होते, मुकेश अंबानी आले होते, कलाकारही आले होते. मग? माझ्या घरी आले म्हणून मी यांची पापं झाकायची का?”</p>
<p>“अदाणी दोन-तीन वर्षांपूर्वी घरी आले होते. आले म्हणजे काय करायचं? हाकलून द्यायचं का? शिवाय अदाणींशी दोस्ती करण्याइतका अडाणी मी नाही,” असा टोमणाही त्यांनी लगावला.</p>
<p>गुजराती समाजाविषयी स्पष्टीकरण</p>
<p>राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही. मात्र जे काही डाव रचले जात आहेत, त्याविरोधात इथल्या गुजराती समाजानेही बोललं पाहिजे.” अदाणी समूहावर टीका करताना त्यांनी सांगितले की, “नवी मुंबईचा विमानतळ सोडला, तर अदाणीने एकही विमानतळ बांधलेला नाही. जे विमानतळ घेतले आहेत, ते गन पॉईंटवर चालवायला घेतले आहेत. पोर्टच्या बाबतीतही हेच चित्र आहे.”</p>
<p>महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे असून, महायुतीकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/20144">“कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटींची ऑफर”; राज ठाकरेंचा महायुतीवर गंभीर आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/20144/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
