<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>सांगली Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/shangali/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/shangali</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Wed, 27 May 2026 06:07:52 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2025/01/satara-150x150.png</url>
	<title>सांगली Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/shangali</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>५० तोळे सोनं, वंशाला मुलगाच हवा; तामिळनाडूत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/26443</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/26443#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 27 May 2026 06:07:52 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=26443</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील पलूस येथील एका विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्नानंतर सतत हुंड्याची मागणी,</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26443">५० तोळे सोनं, वंशाला मुलगाच हवा; तामिळनाडूत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>सांगली प्रतिनिधी</strong></p>
<p>सांगली जिल्ह्यातील पलूस येथील एका विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्नानंतर सतत हुंड्याची मागणी, “वंशाला मुलगा हवा” या कारणावरून मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत विवाहितेचा मृतदेह गेल्या चार दिवसांपासून पलूस ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत.</p>
<p>मृत विवाहितेचे नाव आरती प्रशांत जाधव (वय ३७) असे असून तिचा मृत्यू तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पतीसह सहाजणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पलूस परिसरात संताप व्यक्त केला जात असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.</p>
<p>मृत्यूची माहिती लपवण्याचा प्रयत्न?</p>
<p>आरतीच्या माहेरच्यांच्या आरोपानुसार, शनिवारी सकाळी तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना थेट देण्याऐवजी सासरच्यांनी स्थानिक सुवर्णकारांशी संपर्क साधून परस्पर शवविच्छेदन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण घटनेबाबत संशय अधिक गडद झाला. आरतीचा भाऊ आणि नातेवाईकांनी पती प्रशांत जाधव, सासू, नणंद आणि इतर नातेवाईकांनी मिळून तिचा छळ करून जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.</p>
<p>“मुलगा नाही” म्हणून अमानुष छळ</p>
<p>२०११ मध्ये आरतीचा विवाह नागपट्टीनम येथील सुवर्ण व्यवसायिक प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता. विवाहानंतर तिला दोन मुली झाल्या. मात्र “वंशाला दिवा हवा” या कारणावरून तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.</p>
<p>नातेवाईकांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी पुन्हा गर्भधारणा झाल्यास आरतीच्या जीवाला धोका असल्याचा स्पष्ट इशारा दिला होता. तरीदेखील मुलासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आला. इतकेच नव्हे तर, तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.</p>
<p>५० तोळे सोन्याची मागणी</p>
<p>आरतीच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर सासरकडून तब्बल ५० तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती. उर्वरित सोने माहेरहून आणण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. गेल्या सहा वर्षांपासून तिला माहेरच्यांशी संपर्कही करू दिला जात नसल्याचा धक्कादायक आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.</p>
<p>या प्रकरणी आरतीचे वडील सुभाष बळवंत कदम (वय ७४) यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०१५ ते २३ मे २०२६ या कालावधीत आरतीचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.</p>
<p>मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी</p>
<p>फिर्यादीत नमूद केल्यानुसार, “तुला मुलगा होत नाही” तसेच “माहेरहून सोने आण” या कारणांवरून आरोपींकडून वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि मारहाण करण्यात येत होती. विशेषतः पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी प्रत्यक्ष हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.</p>
<p>सततच्या छळामुळे आरती मानसिकदृष्ट्या खचली होती आणि या छळातूनच तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.</p>
<p>सहाजणांविरोधात गुन्हा</p>
<p>या प्रकरणी प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव, संध्या प्रकाश साळुंखे, प्रकाश जोतिराम साळुंखे, प्रतिक प्रकाश साळुंखे आणि शेजल प्रकाश साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा तामिळनाडूतील नागपट्टीनम येथे घडल्याने पुढील तपास नागपट्टीनम सिटी पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाषेची अडचण आणि स्थानिक प्रक्रियेमुळे तक्रार नोंदवण्यात अडथळे येत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पलूस पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला.</p>
<p>अद्याप अटक नाही</p>
<p>या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र संशयास्पद मृत्यू, हुंडाबळी आणि मुलासाठीच्या छळाच्या आरोपांमुळे या घटनेने सामाजिक संताप उसळला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पलूस परिसरात आरतीला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी होत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26443">५० तोळे सोनं, वंशाला मुलगाच हवा; तामिळनाडूत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/26443/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावताना शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; हार्ट अटॅकने प्राणज्योत मालवली</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/26371</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/26371#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 25 May 2026 17:45:27 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=26371</guid>

					<description><![CDATA[<p>सांगोला प्रतिनिधी जनगणनेसारखे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना सांगोल्यातील एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26371">जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावताना शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; हार्ट अटॅकने प्राणज्योत मालवली</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगोला प्रतिनिधी</strong></span></p>
<p>जनगणनेसारखे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना सांगोल्यातील एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. राजाराम दामोदर ढोले (वय ४९) असे मृत शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे सांगोला तालुक्यात शोककळा पसरली आहे.</p>
<p>राजाराम ढोले हे सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. शासनाच्या जनगणना मोहिमेसाठी त्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या दरम्यान ढोले हे सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम करत होते. घराघरांत जाऊन माहिती नोंदवित असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते खाली कोसळले.</p>
<p>स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.</p>
<p>या घटनेची माहिती समोर येताच शिक्षकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रशासनात हळहळ व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय जबाबदारी पार पाडताना एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.</p>
<p>राजाराम ढोले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.</p>
<p>दरम्यान, जनगणनेसारख्या व्यापक मोहिमेत कार्यरत कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण आणि आरोग्याच्या समस्या याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शिक्षक संघटनांकडूनही ढोले यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत व विशेष सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26371">जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावताना शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; हार्ट अटॅकने प्राणज्योत मालवली</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/26371/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>विट्यात नरबळीचा सल्ला देणाऱ्या ‘भोंदू बाबा’ टोळीचा पर्दाफाश; कडेश्वर धाम मठ पोलिसांच्या रडारवर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/26301</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/26301#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 24 May 2026 08:12:18 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=26301</guid>

					<description><![CDATA[<p>विटा प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला असून, पतीची शारीरिक व्याधी</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26301">विट्यात नरबळीचा सल्ला देणाऱ्या ‘भोंदू बाबा’ टोळीचा पर्दाफाश; कडेश्वर धाम मठ पोलिसांच्या रडारवर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>विटा प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली जिल्ह्यातील विटा शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला असून, पतीची शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी एका महिलेला नरबळीचा सल्ला देणाऱ्या तिघा भोंदू बाबांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली सामान्य नागरिकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टोळीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.</p>
<p>या प्रकरणात महेश बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत निकम (रा. घोगाव, ता. पलूस, सध्या रा. भवानी माळ, विटा) आणि सूरज उपाध्याय (रा. विटा, ता. खानापूर) यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांनाही सोमवार, दि. २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महिला पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.</p>
<p>देवांचा संचार असल्याचा दावा; श्रद्धेचा गैरफायदा</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी एका विवाहित महिलेला आणि तिच्या पतीला लक्ष्य करत त्यांच्या कौटुंबिक अडचणी व शारीरिक व्याधीवर उपाय असल्याचे सांगून विश्वासात घेतले. संकेत निकम याच्या अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, कालभैरव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असल्याचा दावा या तिघांकडून करण्यात येत होता.</p>
<p>“दैवी शक्तीच्या माध्यमातून सर्व संकटे दूर करता येतात,” असे सांगत त्यांनी संबंधित दाम्पत्याला विविध पूजा, हवन, विशेष विधी आणि तथाकथित आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली जाळ्यात ओढले. यानंतर या प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेत नरबळीचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.</p>
<p>नरबळी, गर्भपात आणि गूढ विधींचा दबाव</p>
<p>दि. १ मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत विटा येथील पाटील वस्ती परिसरात तसेच संबंधित महिलेच्या घरी वारंवार वेगवेगळे धार्मिक विधी करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.</p>
<p>पतीची शारीरिक व्याधी कायमची दूर करण्यासाठी “विशेष बळी” देणे आवश्यक असल्याचे सांगत संशयितांनी नरबळीचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर गर्भपातासंदर्भातही महिलेला दिशाभूल करणारे सल्ले देण्यात आल्याचे समोर आले आहे.</p>
<p>या प्रकारामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, राज्यात अद्यापही अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.</p>
<p>कडेश्वर धाम मठाची पोलिसांकडून चौकशी</p>
<p>या तिघांची भोंदूगिरी विटा येथील पाटील वस्ती परिसरातील “कडेश्वर धाम अध्यात्म संस्था” या मठातून सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या मठाची सखोल चौकशी सुरू केली असून, येथे आणखी कोणकोणत्या प्रकारचे विधी किंवा आर्थिक व्यवहार सुरू होते का, याचाही तपास केला जात आहे.</p>
<p>मठात येणाऱ्या भाविकांची माहिती, आर्थिक व्यवहार, कथित धार्मिक कार्यक्रम आणि संशयितांशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p>
<p>अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत कारवाईची शक्यता</p>
<p>या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. नरबळी, भूतबाधा, देवाचा संचार, चमत्काराच्या नावाखाली फसवणूक आणि मानसिक छळ यांसारख्या प्रकारांवर या कायद्यात कठोर तरतुदी आहेत.</p>
<p>दरम्यान, या घटनेमुळे विटा शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचे चमत्कार, देवसंचार किंवा गुप्त विधींच्या नावाखाली फसवणूक होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/26301">विट्यात नरबळीचा सल्ला देणाऱ्या ‘भोंदू बाबा’ टोळीचा पर्दाफाश; कडेश्वर धाम मठ पोलिसांच्या रडारवर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/26301/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सांगली जिल्ह्यात पहिला टँकर सुरू, ४.८० कोटींचा कृती आराखडा मंजूर;आटपाडीतील पिंपरी खुर्दपासून उपाययोजनांची सुरुवात</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/25911</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/25911#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 16 May 2026 09:17:11 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=25911</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी मे महिन्याच्या मध्यावरच सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे जिल्ह्यातील</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/25911">सांगली जिल्ह्यात पहिला टँकर सुरू, ४.८० कोटींचा कृती आराखडा मंजूर;आटपाडीतील पिंपरी खुर्दपासून उपाययोजनांची सुरुवात</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मे महिन्याच्या मध्यावरच सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे जिल्ह्यातील पहिला शासकीय पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. वाढत्या उन्हाच्या झळा आणि घटलेल्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या असून तब्बल ४ कोटी ८० लाख ४८ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे.</p>
<p>ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी याबाबत माहिती दिली.</p>
<p>प्रशासनाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यात आवश्यकतेनुसार एकूण ६६ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १२६ विहिरींचे अधिग्रहण तसेच नऊ विंधन विहिरी कार्यान्वित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पाणीटंचाई अधिक गंभीर होण्यापूर्वीच उपाययोजना राबवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>सध्या आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील चव्हाण वस्तीवर पहिला शासकीय टँकर सुरू करण्यात आला असून या भागातील नागरिकांना त्याचा दिलासा मिळत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने गावातील पारंपरिक स्रोत कोरडे पडू लागले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला.</p>
<p>दरम्यान, खानापूर आणि शिराळा तालुक्यांमध्येही पाणीटंचाईची स्थिती निर्माण होत आहे. खानापूर तालुक्यातील रेवणगाव आणि ऐनवाडी येथे प्रत्येकी दोन कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे एक कूपनलिका, तसेच करमाळे येथे एक कूपनलिका आणि एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. अशा प्रकारे सध्या सात विहिरी आणि कूपनलिकांद्वारे पाच गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.</p>
<p>ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेतला जात असून ज्या ठिकाणी मागणी वाढेल, त्या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विहिरींचे अधिग्रहण, कूपनलिका सुरू करणे आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर या माध्यमातून उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.</p>
<p>दरवर्षी उन्हाळ्यात सांगली जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाई गंभीर रूप धारण करते. विशेषतः आटपाडी, खानापूर आणि जत परिसरात भूजल पातळी झपाट्याने खालावत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहते. यंदाही पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने पूर्वतयारीला गती दिली असून पुढील काही आठवड्यांत टँकर आणि जलस्रोत अधिग्रहणाची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/25911">सांगली जिल्ह्यात पहिला टँकर सुरू, ४.८० कोटींचा कृती आराखडा मंजूर;आटपाडीतील पिंपरी खुर्दपासून उपाययोजनांची सुरुवात</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/25911/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>लग्नासाठी आलेल्या मुलांनवर  काळाचा घाला: येरळा नदीत ८ मुले बुडाली; ७ जणांना वाचवण्यात यश, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/25273</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/25273#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 03 May 2026 07:42:34 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=25273</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. लग्न</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/25273">लग्नासाठी आलेल्या मुलांनवर  काळाचा घाला: येरळा नदीत ८ मुले बुडाली; ७ जणांना वाचवण्यात यश, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. लग्न समारंभासाठी आलेल्या मुलांनी उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी येरळा नदीत पोहण्यासाठी उतरल्यानंतर अचानक जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत आठ जण पाण्यात बुडाले, त्यापैकी सात जणांना स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले; मात्र २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.</p>
<p>मृत तरुणीचे नाव फिरदोस जाकीर शिकलगार (वय २०) असे असून ती मूळची कोरेगाव येथील रहिवासी होती. सध्या ती मुंबई येथे वास्तव्यास होती. भाळवणी येथील शिकलगार मळ्यात आयोजित लग्न समारंभासाठी ती आपल्या नातेवाईकांसह आली होती.</p>
<p>पोहण्याचा आनंद ठरला जीवघेणा</p>
<p>शिवतेज मंगल कार्यालयात लग्नाचा कार्यक्रम सुरू असताना, काही मुले व तरुण-तरुणींनी जवळच असलेल्या येरळा नदीकाठी जाऊन पोहण्याचा निर्णय घेतला. अंदाजे १७ ते १८ जणांचा हा गट होता, ज्यामध्ये १२ ते १४ वयोगटातील मुले-मुलींचा समावेश होता. त्यांच्या सोबत काही पालकही नदीकाठावर उपस्थित होते.</p>
<p>सुरुवातीला सर्वजण पाण्यात खेळत होते. मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने काही मुले अचानक खोल पाण्यात गेली. त्यांना वाचवण्यासाठी इतरांनी धाव घेतली, पण याच प्रयत्नात आणखी काही जण बुडू लागले आणि क्षणार्धात गोंधळ उडाला.</p>
<p>स्थानिकांचा धाडसी प्रयत्न, सात जणांना जीवनदान</p>
<p>घटनेची माहिती मिळताच नदीकाठावर उपस्थित पालक आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ पाण्यात उडी घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सात जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. काही मुले बेशुद्ध अवस्थेत होती.</p>
<p>या सर्वांना तातडीने विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन ते चार मुलांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.</p>
<p>उपचारादरम्यान फिरदोसचा मृत्यू</p>
<p>दरम्यान, गंभीर अवस्थेत असलेल्या फिरदोस शिकलगार हिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने लग्न समारंभावर शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.</p>
<p>सावधगिरीचा अभाव ठरला कारणीभूत?</p>
<p>या दुर्घटनेमुळे नदीकाठावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक आणि स्थानिक प्रशासनाची देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उन्हाळ्यात नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.</p>
<p>काळजी घ्या, जीव वाचवा!</p>
<p>नदीतील पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज घ्या</p>
<p>लहान मुलांना एकटे पाण्यात जाऊ देऊ नका</p>
<p>लाइफगार्ड किंवा स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय पोहणे टाळा</p>
<p>आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मागा</p>
<p>ही घटना केवळ एक अपघात नसून, निष्काळजीपणाची मोठी किंमत कशी मोजावी लागते याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/25273">लग्नासाठी आलेल्या मुलांनवर  काळाचा घाला: येरळा नदीत ८ मुले बुडाली; ७ जणांना वाचवण्यात यश, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/25273/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>राज्यात १२५२ शाळा, ८२७ तुकड्या कायम अपात्र; मान्यता रद्दीच्या उंबरठ्यावर &#8211; हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/23971</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/23971#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 05 Apr 2026 15:53:59 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=23971</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नावर शासनाने मोठा निर्णय घेतला असून मूल्यांकन प्रक्रियेत वारंवार अपात्र ठरलेल्या १२५२ शाळा</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23971">राज्यात १२५२ शाळा, ८२७ तुकड्या कायम अपात्र; मान्यता रद्दीच्या उंबरठ्यावर &#8211; हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नावर शासनाने मोठा निर्णय घेतला असून मूल्यांकन प्रक्रियेत वारंवार अपात्र ठरलेल्या १२५२ शाळा आणि ८२७ तुकड्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे दोन दशकांहून अधिक काळ विनावेतन किंवा अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी आल्याची भावना व्यक्त होत आहे.</p>
<p>सन २००० मध्ये राज्यातील सुमारे सहा हजारांहून अधिक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आली होती. त्या काळात शिक्षणाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात या शाळांचे टप्प्याटप्प्याने मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकनात पात्र ठरणाऱ्या काही शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात आले, तर पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या अनेक शाळांना वारंवार संधी देण्यात आली.</p>
<p>तथापि, अनेकदा संधी देऊनही आवश्यक निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या १२५२ शाळा आणि ८२७ तुकड्यांना शासनाने कायमस्वरूपी अपात्र घोषित केले आहे. परिणामी या शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.</p>
<p>महिनाभराची मुदत</p>
<p>शासनाने संबंधित संस्थांना एक अंतिम संधी देत ३० एप्रिल २०२६ पर्यंत स्वयं-अर्थसहाय्यित तत्त्वावर नव्याने मान्यता घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जर या मुदतीत संस्थांनी आवश्यक अर्ज करून मान्यता घेतली नाही, तर संबंधित शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय अंमलात आणला जाईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.</p>
<p>तसेच या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे नजीकच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.</p>
<p>तीन वर्षे अपात्र ठरल्यास मान्यता रद्द</p>
<p>शासनाने १ एप्रिल २०२६ पासून कठोर निकष लागू केले आहेत. एखादी शाळा सलग तीन वर्षे मूल्यांकन प्रक्रियेत अपात्र ठरल्यास तिची मान्यता किंवा परवानगी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण व्यवस्थेत दर्जा टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.</p>
<p>शिक्षकांवर बेरोजगारीची टांगती तलवार</p>
<p>या निर्णयामुळे सर्वाधिक फटका बसणार आहे तो या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना. अनेक शिक्षक २० ते २५ वर्षे पगाराच्या आशेवर विनावेतन किंवा अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत. शासनाकडून कधीतरी अनुदान मिळेल आणि नियमित पगार सुरू होईल, या आशेवर त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम सुरू ठेवले. मात्र आता शाळाच बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्याने हजारो शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.</p>
<p>शिक्षक संघटनांकडून या शिक्षकांचे अनुदानित शाळांमध्ये मानवी दृष्टिकोनातून समायोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.</p>
<p>अशा आहेत अपात्र शाळा</p>
<p>विभागशाळातुकड्याप्राथमिक ४३३३३ माध्यमिक३२४४१२उच्च माध्यमिक ५०५३८२ एकूण १२५२८२७</p>
<p>आंदोलनाचा इशारा</p>
<p>विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “समाज घडविण्याचे काम करणाऱ्या बिनपगारी शिक्षकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा खंडेराव जगदाळे, राज्य उपाध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृती समिती यांनी दिला आहे.</p>
<p>शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान</p>
<p>दरम्यान, या निर्णयामुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. एकीकडे शिक्षणाचा दर्जा टिकवण्याचा शासनाचा प्रयत्न असला, तरी दुसरीकडे हजारो शिक्षकांचे रोजगार, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था या सर्वच बाबींचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23971">राज्यात १२५२ शाळा, ८२७ तुकड्या कायम अपात्र; मान्यता रद्दीच्या उंबरठ्यावर &#8211; हजारो शिक्षकांचे भविष्य अधांतरी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/23971/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>२४ तासांत सांगली हादरली! तिहेरी खूनांनी उडाली खळबळ; ॲसिड हल्ल्यात महिलेचा मृत्यू</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/23745</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/23745#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 01 Apr 2026 09:09:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=23745</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी खूनाच्या घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23745">२४ तासांत सांगली हादरली! तिहेरी खूनांनी उडाली खळबळ; ॲसिड हल्ल्यात महिलेचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी खूनाच्या घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जत तालुक्यात दोन तर सांगली शहरातील संजयनगर परिसरात एक अशी तीन गंभीर घटना सोमवारी समोर आल्या. या सलग घटनांमुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे एका प्रकरणात महिलेवर ॲसिड हल्ला करण्यात आला असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत तरुणावर धारदार कोयत्याने वार करून आरोपी पळ काढत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने धाडसाने पाठलाग करून त्याला पकडले.</p>
<p>पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील पहिल्या घटनेत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात संशयित आरोपीने धारदार शस्त्राने वार करून संबंधित व्यक्तीचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.</p>
<p>जत तालुक्यातील दुसऱ्या घटनेत एका महिलेवर ॲसिड हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.</p>
<p>दरम्यान, सांगली शहरातील संजयनगर परिसरातही धक्कादायक घटना घडली. एका तरुणावर भरदिवसा धारदार कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तेथून जात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत आरोपीचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.</p>
<p>सलग तीन खूनाच्या घटनांमुळे सांगली जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेची भावना व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने या सर्व प्रकरणांचा सखोल तपास सुरू केला असून आरोपींना लवकरच कठोर शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.</p>
<p>या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सलग घडलेल्या या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनीही शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23745">२४ तासांत सांगली हादरली! तिहेरी खूनांनी उडाली खळबळ; ॲसिड हल्ल्यात महिलेचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/23745/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सांगली हादरली! पोटच्या मुलींना उलटं लटकवून  मारहाण; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर, निर्दयी बाप पोलिसांच्या ताब्यात</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/23527</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/23527#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 27 Mar 2026 08:25:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=23527</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23527">सांगली हादरली! पोटच्या मुलींना उलटं लटकवून  मारहाण; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर, निर्दयी बाप पोलिसांच्या ताब्यात</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या केवळ संशयावरून संतापलेल्या एका बापाने स्वतःच्या दोन मुलींना रात्रभर घराच्या छताला उलटे लटकवून अमानुष छळ केल्याने एका मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली आहे.</p>
<p>मृत मुलीचे नाव सारिका दादू यमगर असे असून ती शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी होती. तर तिची बहीण अनुजा यमगर हिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.</p>
<p>चोरीच्या संशयातून संताप</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात यमगर कुटुंब वास्तव्यास आहे. सारिका आणि अनुजा या दोन्ही बहिणींवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने चोरी केल्याचा संशय व्यक्त केला. शेजाऱ्याने मुलींवर चोरीचा आळ घेतल्याने त्यांच्या वडिलांचा संताप अनावर झाला.</p>
<p>संतापाच्या भरात दादू हैबत यमगर या वडिलांनी प्रथम दोन्ही मुलींना बेदम मारहाण केली. त्यानंतरही राग शांत न झाल्याने त्यांनी घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोघींनाही दोरीने उलटे लटकवून ठेवले. हा अमानुष छळ तब्बल रात्रभर सुरू होता.</p>
<p>पाण्यासाठी आक्रोश, पण दया नाही</p>
<p>रात्रभर उलटे लटकवून ठेवल्याने दोन्ही मुली वेदनेने तडफडत होत्या. त्या वारंवार पिण्यासाठी पाणी मागत होत्या, मात्र निर्दयी बापाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. थंडी, भूक आणि मारहाण यामुळे दोन्ही मुलींची प्रकृती अधिकच खालावली.</p>
<p>पहाटेच्या सुमारास सारिका ही बेशुद्ध पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. तर अनुजा ही गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडली.</p>
<p>मृत्यू लपवण्याचाही प्रयत्न</p>
<p>घटनेनंतर कुटुंबीयांनी हा प्रकार बाहेर येऊ नये म्हणून सारिकावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याचवेळी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अनुजाला शुद्ध आली आणि तिने संपूर्ण प्रकार डॉक्टरांना सांगितला.</p>
<p>रुग्णालय प्रशासनाने तातडीने आटपाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि या भीषण घटनेचा भांडाफोड झाला.</p>
<p>आरोपी वडील पोलिसांच्या ताब्यात</p>
<p>या प्रकरणी पोलिसांनी दादू हैबत यमगर याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खून आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेचा अधिक तपास आटपाडी पोलीस करत आहेत.</p>
<p>गावात संतापाची लाट</p>
<p>चोरीच्या केवळ संशयावरून स्वतःच्या पोटच्या मुलींना अशा अमानुष पद्धतीने शिक्षा देण्याच्या घटनेने बनपुरी गावासह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/23527">सांगली हादरली! पोटच्या मुलींना उलटं लटकवून  मारहाण; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर, निर्दयी बाप पोलिसांच्या ताब्यात</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/23527/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा विस्तार; ‘कमवा आणि शिका’ योजनेतून दरमहा २ हजार रुपये &#8211; चंद्रकांत पाटील</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/22777</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/22777#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 09 Mar 2026 14:42:30 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=22777</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी महिला सबलीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे ही काळाची</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/22777">मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा विस्तार; ‘कमवा आणि शिका’ योजनेतून दरमहा २ हजार रुपये &#8211; चंद्रकांत पाटील</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>महिला सबलीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सुमारे पाच लाख मुलींना ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जूनपासून शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.</p>
<p>सांगली येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘कन्या सबलीकरण’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात कराटे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.</p>
<p>सांगली जिल्ह्यात महिला सबलीकरणासाठी प्रायोगिक स्वरूपात उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगत पाटील म्हणाले, “जिल्ह्यातील ५० शाळांमधील सुमारे ३६ हजार मुलींना दर शनिवारी एक तास कराटे व ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी १५ हजार ४०० मुलींना पहिला ‘येलो बेल्ट’ प्रदान करण्यात आला आहे. पुढील बेल्टसाठी आवश्यक असलेले शुल्कही प्रशासनाच्या वतीने भरले जाईल.”</p>
<p>तसेच जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>दरम्यान, महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे कौतुक केले. “मुलींचे कराटे प्रशिक्षण पाहून मला माझ्या दोन मुलींची आठवण झाली. या मुलींचे प्रशिक्षण पाहून माझे म्हातारपण सुखरूप जाईल,” असे ते म्हणताच कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.</p>
<p>या उपक्रमाअंतर्गत कराटे प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे एक हजार विद्यार्थिनींना येलो बेल्ट ग्रेडचे प्रमाणपत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमामुळे मुलींमध्ये स्वसंरक्षणाची जाणीव आणि आत्मविश्वास वाढत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/22777">मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा विस्तार; ‘कमवा आणि शिका’ योजनेतून दरमहा २ हजार रुपये &#8211; चंद्रकांत पाटील</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/22777/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर दाम्पत्य अटकेत; मिरजेत आलिशान बंगल्यावर छापा, कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास वेगात</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/22542</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/22542#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 04 Mar 2026 16:17:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=22542</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत तीन महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/22542">पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर दाम्पत्य अटकेत; मिरजेत आलिशान बंगल्यावर छापा, कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास वेगात</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत तीन महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मिरजेतील डॉक्टर दाम्पत्याच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी नुकतीच छापेमारी केली. या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.</p>
<p>मिरजेतील गुरुवार पेठ, छलवादी गल्ली येथील डॉ. इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार (वय ५१) आणि त्यांची पत्नी जास्मिन इब्राहिम नायकवडी-इनामदार (वय ४१) यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणात इब्राहिम यांचा भाऊ अब्दुलमहंमदसाब नायकवडी यालाही अटक करण्यात आली होती.</p>
<p>इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या तिघांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल २ कोटी १५ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.</p>
<p>पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याने गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली. सुरुवातीला काहींना परतावा दिल्यानंतर अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र नंतर व्यवहार थांबवून संपर्क टाळण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही पोलिसांना चकवा देत होते.</p>
<p>दरम्यान, मिरजेतील त्यांच्या आलिशान बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, मोबाईल फोन, संगणक संच आणि बँक व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली. जप्त साहित्याच्या आधारे आर्थिक प्रवाहाचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.</p>
<p>अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपास यंत्रणा आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक खोलवर चौकशी करत आहे.</p>
<p>क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अल्पावधीत मोठा परतावा देण्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/22542">पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर दाम्पत्य अटकेत; मिरजेत आलिशान बंगल्यावर छापा, कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास वेगात</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/22542/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
