<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>सांगली Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/shangali/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/shangali</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Fri, 18 Sep 2026 14:35:06 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.1.1</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/08/cropped-SATARA-PRATINIDHI-scaled-1-32x32.png</url>
	<title>सांगली Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/shangali</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>मिरजेत विसर्जन मिरवणुकीच्या कमानींवर राजकीय सामना; ठाकरेसेनेच्या ‘गद्दार खंडोजी खोपडे’ला शिंदेसेनेचे दिशाला सलियन–सुशांत राजपूत यांच्या प्रतिमांतून प्रत्युत्तर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32454</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32454#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:35:06 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32454</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील स्वागत कमानींच्या तब्बल ४५ वर्षांच्या परंपरेला यंदाही उजाळा मिळाला</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32454">मिरजेत विसर्जन मिरवणुकीच्या कमानींवर राजकीय सामना; ठाकरेसेनेच्या ‘गद्दार खंडोजी खोपडे’ला शिंदेसेनेचे दिशाला सलियन–सुशांत राजपूत यांच्या प्रतिमांतून प्रत्युत्तर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील स्वागत कमानींच्या तब्बल ४५ वर्षांच्या परंपरेला यंदाही उजाळा मिळाला आहे. मात्र, यंदाच्या कमानींना धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांसोबतच राजकीय रंग चढल्याचे चित्र आहे. मिरवणूक मार्गावर ठाकरेसेना आणि शिंदेसेनेकडून समोरासमोर उभारण्यात आलेल्या कमानींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.</p>
<p>ठाकरेसेनेने उभारलेल्या कमानीवर ‘गद्दार खंडोजी खोपडे’ या विषयावरील देखावा साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज खंडोजी खोपडे याला शासन करीत असल्याचे या देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेसेनेच्या कमानीवर दिशा सालियन आणि सुशांत राजपूत यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या असून, ‘आम्हाला न्याय द्या’, असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही कमानी मिरज शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.</p>
<p>मिरजच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित भव्य स्वागत कमानी उभारल्या जातात. यंदाही अनेक संस्थांनी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण विषयांची निवड केली आहे. हिंदू एकता आंदोलनाच्या कमानीवर स्वामी समर्थांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. किसान चौकातील मराठा महासंघाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.</p>
<p>विश्वशांती मंडळाच्या कमानीवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. स्टेशन रोडवरील एकता सांस्कृतिक व क्रीडा मंडळाची कमान सामाजिक विषयावर आधारित आहे. छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळाच्या कमानीवर आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांची प्रतिमा असून, विश्वश्री मंडळाच्या कमानीवर बाबा महाकाल यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. विविध संस्थांनी आपल्या कमानींच्या माध्यमातून सामाजिक संदेश, ऐतिहासिक संदर्भ आणि धार्मिक श्रद्धा यांचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आहे.</p>
<p>मिरजेतील स्वागत कमानींची ही परंपरा १९८३ मध्ये हिंदू एकता आंदोलन संघटनेने सुरू केली. सुरुवातीला मोजक्या कमानींपासून सुरू झालेली ही परंपरा पुढे शहराच्या गणेशोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग बनली. गेल्या चार दशकांहून अधिक काळात विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांनी या परंपरेत सहभागी होत आपापल्या कल्पकतेनुसार कमानी उभारल्या आहेत.</p>
<p>विविध मंदिरांच्या प्रतिकृती, देवी-देवतांच्या प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह विविध थोर महापुरुषांचे जीवनकार्य आणि सामाजिक संदेश कमानींच्या माध्यमातून मांडले जातात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसोबतच या कमानी पाहण्यासाठीही नागरिकांची गर्दी होत असते.</p>
<p>यंदा हिंदू एकता आंदोलन, शिवसेना, मराठा महासंघ, विश्वशांती मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकता मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक गणेश मंडळ, शिंदेसेना यांच्यासह विविध संस्था आणि मंडळांनी कमानी उभारल्या आहेत. धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांसोबत सामाजिक प्रश्नांनाही यंदा स्थान देण्यात आले आहे.</p>
<p>मात्र, ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या कमानींवरील विषयांमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला राजकीय चर्चेची किनार मिळाली आहे. उत्सवाच्या वातावरणात या कमानी नागरिकांचे आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत असून, विसर्जन मिरवणुकीदरम्यान या कमानी विशेष चर्चेत राहण्याची शक्यता आहे. मिरजच्या पारंपरिक गणेशोत्सवातील कलात्मक आणि सामाजिक अभिव्यक्तीला यंदा राजकीय संदेशांची जोड मिळाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32454">मिरजेत विसर्जन मिरवणुकीच्या कमानींवर राजकीय सामना; ठाकरेसेनेच्या ‘गद्दार खंडोजी खोपडे’ला शिंदेसेनेचे दिशाला सलियन–सुशांत राजपूत यांच्या प्रतिमांतून प्रत्युत्तर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32454/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सांगली जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीत ३९५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र; वेळापत्रकाकडे लक्ष</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32218</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32218#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 15 Sep 2026 05:55:44 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32218</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32218">सांगली जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीत ३९५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र; वेळापत्रकाकडे लक्ष</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सांगली :</strong></span> सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ३९५ उमेदवार मुलाखतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर याबाबतची माहिती पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता मुलाखतीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी बँकेकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पदांसाठी तब्बल ४ हजार ४८९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ७३३ उमेदवारांनी ६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा दिली, तर ७५६ उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. सांगली शहरातील पाच आणि आष्टा येथील एका केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.</p>
<p>भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेला ७० गुण, तर मुलाखतीला ३० गुणांचे महत्त्व देण्यात आले आहे. एका पदासाठी पाच उमेदवार या प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचे बँक प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानुसार ७९ पदांसाठी ३९५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.</p>
<p>लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. मात्र, मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण याबाबतचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. बँक प्रशासनाकडून पुढील टप्प्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांचे आता मुलाखतीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32218">सांगली जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीत ३९५ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र; वेळापत्रकाकडे लक्ष</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32218/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रात्री झोपेत असतानाच&#8230; सांगलीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अकॅडमी संस्थापकाला अटक</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31896</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31896#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 08 Sep 2026 20:21:26 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31896</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली : वाळवा तालुक्यातील एका निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31896">रात्री झोपेत असतानाच&#8230; सांगलीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अकॅडमी संस्थापकाला अटक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सांगली :</strong> </span>वाळवा तालुक्यातील एका निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे (दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा) यांच्याविरोधात आष्टा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काशीनाथ नांगरे याला अटक केली असून त्याची पत्नी मनीषा नांगरे फरार आहे.</p>
<p>पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ११ जून २०२६ पासून अकॅडमीत निवासी शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार वारंवार घडत होता. रात्री मुली झोपेत असताना अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ नांगरे त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक अत्याचार व विनयभंग करत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती पीडित विद्यार्थिनींनी अकॅडमीतील संबंधित मॅडम तसेच नांगरे याची पत्नी मनीषा हिला दिली होती.</p>
<p>मात्र, पीडित मुलींना मदत करण्याऐवजी मनीषा नांगरे हिने हा प्रकार कोणाला सांगू नका, अन्यथा तुमच्या शाळेचे नुकसान करू, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी काही काळ हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. अखेर त्यांनी धाडस करून आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी आष्टा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.</p>
<p>तक्रारीची दखल घेत आष्टा पोलिसांनी काशीनाथ नांगरे आणि मनीषा नांगरे यांच्याविरोधात पोक्सोसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. काशीनाथ नांगरे याला पोलिसांनी अटक केली असून मनीषा नांगरे हिचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.</p>
<p>दरम्यान, निवासी अकॅडमीत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत घडलेल्या या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. निवासी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31896">रात्री झोपेत असतानाच&#8230; सांगलीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार; अकॅडमी संस्थापकाला अटक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31896/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>विषप्राशनानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या पती-पत्नीची प्रकृती पुन्हा बिघडली; एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू, कर्जाच्या तगाद्याची चर्चा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/31829</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/31829#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 07 Sep 2026 14:05:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=31829</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात पती-पत्नीने विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31829">विषप्राशनानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या पती-पत्नीची प्रकृती पुन्हा बिघडली; एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू, कर्जाच्या तगाद्याची चर्चा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात पती-पत्नीने विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. संजय तात्यासो पाटील (४६) आणि मनीषा संजय पाटील (४२) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.</p>
<p>दाम्पत्याने २ सप्टेंबर रोजी विषारी पदार्थ प्राशन केल्याची माहिती आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना प्रथम पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने डॉक्टरांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोघांनाही घरी जाण्याची परवानगी दिली होती.</p>
<p>मात्र, घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघांची प्रकृती पुन्हा खालावली. रविवारी सकाळी त्यांना त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी दोघांनाही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.</p>
<p>उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू</p>
<p>मिरज शासकीय रुग्णालयात सकाळी सुमारे ११ वाजता मनीषा पाटील आणि संजय पाटील यांना दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी मनीषा पाटील यांना उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, संजय पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी सुमारे चार वाजता त्यांचाही मृत्यू झाला.</p>
<p>एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची नोंद पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.</p>
<p>कर्जाच्या तगाद्याची परिसरात चर्चा</p>
<p>दरम्यान, दाम्पत्याने कर्जाच्या तगाद्याला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा पलूस परिसरात आहे. मात्र, या चर्चेला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे विषप्राशन करण्यामागील नेमके कारण काय, याबाबत पोलिस तपासातूनच स्पष्टता येणार आहे. पोलिसांकडून कुटुंबीय तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविले जाण्याची शक्यता आहे.</p>
<p>पलूसमध्ये सलग दुसरी घटना</p>
<p>पलूस शहरात पती-पत्नीच्या विषप्राशनानंतर मृत्यूची ही काही दिवसांतील दुसरी घटना असल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी बाळासाहेब मुरलीधर कदम (५८) आणि त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (४६) यांच्या मृत्यूची घटना घडली होती.</p>
<p>बाळासाहेब कदम यांचा ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. तर उषा कदम यांच्यावर उपचार सुरू असताना १ सप्टेंबर रोजी सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. प्राथमिक तपासात घरगुती कारणाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी या घटनेमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.</p>
<p>सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे पलूस परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी जनजागृतीची गरज आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/31829">विषप्राशनानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या पती-पत्नीची प्रकृती पुन्हा बिघडली; एकाच दिवशी दोघांचाही मृत्यू, कर्जाच्या तगाद्याची चर्चा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/31829/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सांगली महापालिकेची आजची महासभा गाजणार</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/30844</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/30844#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 20 Aug 2026 02:28:21 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=30844</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली : शहरातील भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले, बंद पथदिवे, पावसामुळे खराब झालेले रस्ते, अपुरा पावसाळी मुरूम</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30844">सांगली महापालिकेची आजची महासभा गाजणार</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सांगली :</strong> </span>शहरातील भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले, बंद पथदिवे, पावसामुळे खराब झालेले रस्ते, अपुरा पावसाळी मुरूम तसेच महापालिकेची उद्याने सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांना देखभालीसाठी देण्याच्या प्रस्तावावरून गुरुवारी होणारी महापालिकेची महासभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरून बुधवारी झालेल्या पक्षीय बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.</p>
<p>पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, खड्डे आणि दलदलीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थायी समितीने आदेश देऊनही प्रभागांमध्ये पुरेसा पावसाळी मुरूम टाकला जात नसल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मुरूमाअभावी नागरिकांकडून जाब विचारला जात असून, प्रभागात फिरणेही अवघड झाल्याची व्यथा नगरसेवकांनी मांडली.</p>
<p>भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांचाही मुद्दा महासभेत उपस्थित होणार आहे. लहान मुले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महापालिका प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते का, असा सवाल नगरसेवकांकडून उपस्थित केला जाणार आहे.</p>
<p>गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंद पथदिव्यांचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये पथदिवे बंद असून, कंपनी आणि महापालिका प्रशासनातील वादामुळे दुरुस्ती रखडल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या विषयावरूनही प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.</p>
<p>दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील जानेवारी २००६ ते २०१० या कालावधीतील महापालिका हिश्श्याची ५० टक्के रक्कम देण्यासाठी ४.३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर आहे. तसेच महापालिकेच्या मालकीची जागा आणि एमएसईबीकडील जागेची अदलाबदल करण्याचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे.</p>
<p>शहरातील विविध उद्याने सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांना देखभालीसाठी देण्याचा प्रस्तावही महत्त्वाचा ठरणार आहे. उद्याने देताना कोणत्या अटी-शर्ती असतील, देखभालीचा दर्जा कसा राखला जाणार आणि नागरिकांना कोणत्या सुविधा मिळणार, याबाबत नगरसेवक प्रशासनाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.</p>
<p>शामरावनगरमधील दफनभूमीची काही जागा क्रीडांगणासाठी देण्याचा ठराव यापूर्वी झाला आहे. या निर्णयाला विरोध करणारा प्रस्ताव फिरोज पठाण यांच्यासह काही नगरसेवकांनी आणला आहे. त्यामुळे या विषयावरही महासभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30844">सांगली महापालिकेची आजची महासभा गाजणार</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/30844/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रेणावी घाटातील एसटी अपघातात मृतांचा आकडा तीनवर; ९ जण अतिदक्षता विभागात, १७ वर्षीय साक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/30658</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/30658#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 16 Aug 2026 11:31:04 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=30658</guid>

					<description><![CDATA[<p>विटा, सांगली प्रतिनिधी विटा-खानापूर मार्गावरील रेणावी घाटात गुरुवारी (ता. १३) दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30658">रेणावी घाटातील एसटी अपघातात मृतांचा आकडा तीनवर; ९ जण अतिदक्षता विभागात, १७ वर्षीय साक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>विटा, सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>विटा-खानापूर मार्गावरील रेणावी घाटात गुरुवारी (ता. १३) दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघाताने सांगली जिल्हा हादरला आहे. या अपघातातील गंभीर जखमी महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी चंद्रकांत पवार (वय १७, रा. ऐनवाडी, ता. खानापूर) हिचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी विट्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. दरम्यान, अद्याप १५ जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यापैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.</p>
<p>या अपघातात नंदाबाई हरिदास त्रिंबके (वय ६०, खानापूर) आणि धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८/८०, बांबवडे, जि. सातारा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. साक्षी पवार हिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांकडून तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.</p>
<p>३८ प्रवासी जखमी; १७ जणांची प्रकृती गंभीर</p>
<p>रेणावी घाटातील या अपघातात दोन्ही एसटी बसमधील एकूण ३८ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शाळकरी मुले आणि मुलींचाही समावेश आहे. अपघातानंतर गंभीर जखमींना तातडीने विटा तसेच परिसरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यापैकी सात गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.</p>
<p>उर्वरित जखमींवर विट्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी नऊ जण अतिदक्षता विभागात असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता जखमींच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.</p>
<p>घाटातील अपघाताने पुन्हा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर</p>
<p>विटा-खानापूर मार्गावरील रेणावी घाट हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असून या ठिकाणी दोन एसटी बसची धडक झाल्याने अपघाताची भीषणता वाढली. धडकेनंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिस, प्रशासन आणि बचाव पथकांनी युद्धपातळीवर मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.</p>
<p>अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी समन्वय साधला. जखमींना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण तसेच खासगी रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.</p>
<p>मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखांची मदत</p>
<p>दरम्यान, रेणावी घाटातील एसटी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तसेच अपघातातील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन आणि एसटी महामंडळाकडून केला जाणार आहे.</p>
<p>याबाबत आमदार सुहास बाबर यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात आल्याचे बाबर यांनी सांगितले.</p>
<p>कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर</p>
<p>अपघातात १७ वर्षीय साक्षी पवार हिचा मृत्यू झाल्याने ऐनवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. शिक्षण घेण्याच्या वयात साक्षीचा दुर्दैवी अंत झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन एसटी बसच्या धडकेत आधीच दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यात उपचारादरम्यान आणखी एका तरुणीचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेची दाहकता अधिकच वाढली आहे.</p>
<p>दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या नऊ जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा जखमींना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30658">रेणावी घाटातील एसटी अपघातात मृतांचा आकडा तीनवर; ९ जण अतिदक्षता विभागात, १७ वर्षीय साक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/30658/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रेणावी घाटात एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; २  प्रवाशांचा जागीच मृत्यू,२० जण जखमी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/30546</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/30546#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 14 Aug 2026 14:21:39 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=30546</guid>

					<description><![CDATA[<p>विटा प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30546">रेणावी घाटात एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; २  प्रवाशांचा जागीच मृत्यू,२० जण जखमी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>विटा प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.</p>
<p>प्राथमिक माहितीनुसार, विट्याहून आटपाडी घाटाच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढा (जि. सातारा)कडे जाणारी एसटी बस रेणावी घाटातील तीव्र वळणावर समोरासमोर आल्या. वळणावर दोन्ही बसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.</p>
<p>स्थानिकांची धाव; जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले</p>
<p>अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.</p>
<p>अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.</p>
<p>घाटातील वाहतूक विस्कळीत</p>
<p>या भीषण अपघातामुळे रेणावी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्यावर दोन्ही बस आडव्या झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम हाती घेतले.<br />
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करीत आहेत. घाटातील तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला की, अतिवेग अथवा वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना घडली, याचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेमुळे सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30546">रेणावी घाटात एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; २  प्रवाशांचा जागीच मृत्यू,२० जण जखमी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/30546/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>१३४ तोळे सोने, ४० किलो चांदी अन् चार कोटींचा मुद्देमाल परत; सांगली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/30348</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/30348#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 09 Aug 2026 06:07:08 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=30348</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सांगली जिल्हा पोलीस दलाने जप्त केलेला सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30348">१३४ तोळे सोने, ४० किलो चांदी अन् चार कोटींचा मुद्देमाल परत; सांगली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सांगली जिल्हा पोलीस दलाने जप्त केलेला सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यामध्ये १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि २४ हजार ५०० किलो बेदाणा यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेक पीडितांना मोठा दिलासा मिळाला.</p>
<p>खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुद्देमालाचे मालक आणि विश्वस्त उपस्थित होते.</p>
<p>यावेळी शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबरोबरच घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा लावणे आणि चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळवून देणे, हे पोलीस दलाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या पोर्टलसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांकडून प्रभावी तपास केला जात आहे. जप्त केलेला मुद्देमाल संबंधितांना परत दिल्याने नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होईल.</p>
<p>नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे काम उद्दिष्ट निश्चित करून करावे. महिनावार संबंधितांचा ऐवज परत करण्यासाठी पाठपुरावा करावा. गुन्ह्यातील मुद्देमाल परत मिळणे हा पीडितांसाठी केवळ आर्थिक दिलासा नसून, त्यांच्या मनातील विश्वास पुन्हा निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, असेही शर्मा यांनी नमूद केले.</p>
<p>पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्ह्यांचा तपास ही पोलिसांची प्रमुख जबाबदारी असली तरी चोरीला गेलेली संपत्ती संबंधितांना परत मिळाल्यानंतरच पीडिताला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसतो; त्यामागे संबंधितांची भावनिक गुंतवणूक असते. काही वस्तूंना सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्वही असते. त्यामुळे मुद्देमाल परत करताना पीडितांच्या भावनांचाही सन्मान केला जातो.</p>
<p>अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे.</p>
<p>‘स्पेशल २६’ची आठवण करून देणारी घटना</p>
<p>कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांच्या घरात १४ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटातील ‘स्पेशल २६’ची आठवण करून देणारी घटना घडली होती. घरातील मुद्देमाल चोरीला गेल्यानंतर त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे तपास करत अवघ्या दोन ते तीन दिवसांत मुद्देमाल हस्तगत केला.</p>
<p>या कार्यक्रमात डॉ. म्हेत्रे यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी त्यांनी तातडीने तपास करून मुद्देमाल परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.<br />
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी आभार मानले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30348">१३४ तोळे सोने, ४० किलो चांदी अन् चार कोटींचा मुद्देमाल परत; सांगली पोलिसांच्या कारवाईचे कौतुक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/30348/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्त्यासाठी बाहेर पडल्या अन्&#8230;; सांगलीत कारच्या धडकेत २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/30238</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/30238#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 07 Aug 2026 07:18:57 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=30238</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी  सांगली : मध्यरात्री ड्यूटी संपल्यानंतर भूक लागल्याने नाश्ता मिळतो का, हे पाहण्यासाठी सहकारी डॉक्टरांसोबत दुचाकीवरून बाहेर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30238">ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्त्यासाठी बाहेर पडल्या अन्&#8230;; सांगलीत कारच्या धडकेत २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी </strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>सांगली :</strong> </span>मध्यरात्री ड्यूटी संपल्यानंतर भूक लागल्याने नाश्ता मिळतो का, हे पाहण्यासाठी सहकारी डॉक्टरांसोबत दुचाकीवरून बाहेर पडलेल्या २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहकारी डॉक्टर जखमी झाले असून, विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>मृत डॉक्टर तरुणीचे नाव डॉ. खुशी पवन मुंदडा (वय २४, मूळ नागपूर) असे आहे. तर डॉ. योगेश संतोष लढ्ढा (वय २७, मूळ वाशिम) हे जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्रीनंतर सुमारे पावणेदोनच्या सुमारास घडला.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खुशी मुंदडा यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून त्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. सध्या त्या सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. ड्यूटी संपल्यानंतर भूक लागल्याने त्यांनी सहकारी निवासी डॉक्टर डॉ. योगेश लढ्ढा यांना नाश्ता मिळणाऱ्या ठिकाणाबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघे डॉ. खुशी यांच्या दुचाकीवरून नाश्त्याच्या शोधात बाहेर पडले. दुचाकी डॉ. लढ्ढा चालवत होते.</p>
<p>विश्रामबाग चौक परिसरात नाश्ता न मिळाल्याने ते लक्ष्मी मंदिराच्या दिशेने निघाले. त्यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले.</p>
<p>अपघातानंतर जखमी डॉ. खुशी मुंदडा यांना संबंधित चारचाकीतून भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉ. योगेश लढ्ढा यांच्या चेहऱ्याला आणि उजव्या खांद्याला दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.</p>
<p>या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निवास कांबळे करत आहेत.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/30238">ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्त्यासाठी बाहेर पडल्या अन्&#8230;; सांगलीत कारच्या धडकेत २४ वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/30238/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीत खळबळ, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/29065</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/29065#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 14:40:47 +0000</pubDate>
				<category><![CDATA[सांगली]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=29065</guid>

					<description><![CDATA[<p>सांगली प्रतिनिधी सांगली शहरातील कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/29065">कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीत खळबळ, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>सांगली प्रतिनिधी</strong></span></p>
<p>सांगली शहरातील कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला वेग दिला आहे.</p>
<p>या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चैतन्य सुहास तोरणे (वय २०, रा. टिंबर एरिया, सांगली) असे आहे. चैतन्यचा मृतदेह कृष्णाघाट परिसरात आढळून आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.</p>
<p>प्राथमिक तपासात चैतन्यची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने अथवा अन्य घातक हल्ला करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैयक्तिक वाद, जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी किंवा अन्य कोणता हेतू होता का, या सर्व अंगांनी पोलीस तपास करत आहेत.</p>
<p>घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि त्यांचे पथक, तसेच सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.</p>
<p>दरम्यान, संशयितांचा शोध घेण्यासाठी सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती याच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.</p>
<p>या घटनेनंतर कृष्णाघाट परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.</p>
<p>या खूनप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरू असून, खुनामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख लवकरच समोर येईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/29065">कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीत खळबळ, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/29065/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
