<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>पुणे Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/pune/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/pune</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Thu, 16 Apr 2026 04:26:25 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2025/01/satara-150x150.png</url>
	<title>पुणे Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/pune</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>राज्य ‘रेड झोन’च्या उंबरठ्यावर; उष्णतेची लाट तीव्र तीन-चार दिवस दिलासा नाही; विदर्भात तापमान ४४ अंशांपलीकडे</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24503</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24503#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 04:26:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24503</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झपाट्याने वाढत असून काही जिल्हे ‘अति-उच्च उष्णता धोका’ (रेड झोन) श्रेणीत जाण्याच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24503">राज्य ‘रेड झोन’च्या उंबरठ्यावर; उष्णतेची लाट तीव्र तीन-चार दिवस दिलासा नाही; विदर्भात तापमान ४४ अंशांपलीकडे</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप झपाट्याने वाढत असून काही जिल्हे ‘अति-उच्च उष्णता धोका’ (रेड झोन) श्रेणीत जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, तर अनेक जिल्हे ‘उच्च जोखीम’ (ऑरेंज झोन) मध्ये दाखल झाले आहेत. ‘कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोन्मेंट अँड वॉटर’ (CEEW) या संस्थेने याबाबत इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचे चित्र आहे.</p>
<p>भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्हे तसेच अकोला, अमरावती आणि वर्धा येथे गुरुवारी (ता. १६) ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.</p>
<p>तापमानाचा चढता पारा</p>
<p>विदर्भात अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथेही तापमानात सातत्याने वाढ होत आहे.</p>
<p>मध्य महाराष्ट्रात लोहगाव, जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे.</p>
<p>मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड येथे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.</p>
<p>पुढील चार दिवसांचा अंदाज</p>
<p>• कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा : कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ</p>
<p>• विदर्भ : पुढील ४८ तासांत २ ते ३ अंशांनी वाढ</p>
<p>• हवामान स्थिती : बहुतांश भागात कोरडे वातावरण</p>
<p>• कोकण किनारपट्टी (पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) : उष्ण व दमट हवामान</p>
<p>उष्णतेची कारणमीमांसा</p>
<p>कर्नाटक आणि महाराष्ट्रालगतच्या समुद्रसपाटीवरील मधल्या वातावरणीय थरात निर्माण झालेल्या प्रति-चक्रीय स्थितीमुळे (ॲन्टी-सायक्लोन) उष्णतेची तीव्रता वाढत आहे. उत्तर कर्नाटकावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याने उष्ण हवेचा साठा वाढून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे.</p>
<p>विभागनिहाय उष्णतेची लाट</p>
<p>• विदर्भ : १५ ते १९ एप्रिल &#8211; तीव्र उष्णतेची लाट</p>
<p>• मध्य महाराष्ट्र : १५ ते १८ एप्रिल &#8211; उष्णतेचा प्रकोप</p>
<p>• मराठवाडा : १६ ते १८ एप्रिल &#8211; उष्णतेची लाट</p>
<p>पुणे जिल्ह्यात चाळीशीपार</p>
<p>पुणे शहर व परिसरातही तापमानाने चाळीशीचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बुधवारी (ता. १५) नोंदलेली तापमाने पुढीलप्रमाणे</p>
<p>• शिवाजीनगर : ३९.२°C</p>
<p>• कोरेगाव पार्क : ३९.३°C</p>
<p>• मगरपट्टा : ३९.६°C</p>
<p>• हडपसर : ३८.५°C</p>
<p>• वडगाव शेरी : ३८.८°C</p>
<p>• चिंचवड : ३८.७°C</p>
<p>जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती अधिक तीव्र असून</p>
<p>• पुरंदर : ४०.४°C</p>
<p>• लवळे : ४०.४°C</p>
<p>• बारामती : ४०.२°C</p>
<p>दरम्यान, पुणे व आसपासच्या भागात गुरुवार ते शनिवार (१६ ते १८ एप्रिल) दरम्यान कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.</p>
<p>नागरिकांसाठी सूचना</p>
<p>उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि वृद्ध, लहान मुले व आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24503">राज्य ‘रेड झोन’च्या उंबरठ्यावर; उष्णतेची लाट तीव्र तीन-चार दिवस दिलासा नाही; विदर्भात तापमान ४४ अंशांपलीकडे</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24503/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>वृत्तपत्र विक्रेत्यापासून पोलिस हवालदारपदी; कोंढवे-धावडेतील आकाश जाधवची जिद्दीची यशोगाथा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24433</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24433#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 10:54:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24433</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर यश मिळवता येते, याचा प्रत्यय कोंढवे-धावडे</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24433">वृत्तपत्र विक्रेत्यापासून पोलिस हवालदारपदी; कोंढवे-धावडेतील आकाश जाधवची जिद्दीची यशोगाथा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर यश मिळवता येते, याचा प्रत्यय कोंढवे-धावडे येथील आकाश जाधवच्या यशातून पुन्हा एकदा आला आहे. गेली तब्बल १२ वर्षे शिक्षणासोबत वृत्तपत्रे टाकण्याचे काम करणाऱ्या आकाशची पुणे शहर पोलिस दलात हवालदारपदी निवड झाली असून परिसरात त्याच्या यशाचा अभिमानाने उल्लेख केला जात आहे.</p>
<p>आकाशचे कुटुंब अत्यंत साध्या परिस्थितीत जीवन जगत आहे. आई-वडील मजुरी व गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही आकाशने शिक्षण सोडले नाही. उलट, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्धार करत त्याने लहानपणापासूनच वृत्तपत्र वितरणाचे काम स्वीकारले. पहाटेच्या वेळी वृत्तपत्रे टाकून तो नियमितपणे अभ्यासाला वेळ देत होता.</p>
<p>पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून आकाशने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मात्र, पहिल्या तीन प्रयत्नांत त्याला अपयशाचा सामना करावा लागला. तरीही खचून न जाता त्याने आपल्या तयारीत सातत्य ठेवले. प्रत्येक अपयशातून शिकत त्याने मेहनत अधिक वाढवली आणि अखेर चौथ्या प्रयत्नात त्याचे स्वप्न साकार झाले. या यशामुळे केवळ त्याच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.</p>
<p>आकाशच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग मोठा असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. मुलाच्या यशाने त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.</p>
<p>या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आकाशचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेवक अनिता इंगळे, नगरसेवक काकासाहेब चव्हाण, अतुल धावडे, अमोल परांडे, अविनाश सरोदे, अक्षय गायकवाड, हरिभाऊ राठोड, राजाभाऊ राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>आकाश जाधवची ही प्रेरणादायी यशोगाथा संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरत असून, ‘जिद्द असेल तर यश निश्चित’ हा संदेश पुन्हा अधोरेखित करत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24433">वृत्तपत्र विक्रेत्यापासून पोलिस हवालदारपदी; कोंढवे-धावडेतील आकाश जाधवची जिद्दीची यशोगाथा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24433/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; लक्ष्मीनगर पोलिसांनी स्कॉर्पिओसह लाखोंची विदेशी दारू पकडली</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24421</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24421#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 14 Apr 2026 18:22:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24421</guid>

					<description><![CDATA[<p>रणजित मस्के : प्रतिनिधी पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24421">डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; लक्ष्मीनगर पोलिसांनी स्कॉर्पिओसह लाखोंची विदेशी दारू पकडली</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>रणजित मस्के : प्रतिनिधी</strong></span></p>
<p>पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत स्कॉर्पिओ गाडीतून बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत सुमारे २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.</p>
<p>लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहादल बाबा चौक परिसरात तपास पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई भिमराव कांबळे व अमोल वायाळ यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काळ्या रंगाची एमएच-१४ एलपी ७४७४ क्रमांकाची स्कॉर्पिओ नगर रोडच्या दिशेने विदेशी दारूची अवैध वाहतूक करत आहे. ही माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहन अडवले.</p>
<p>वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव अंग्रेजसिंग पुरणसिंग गील (वय ३८, रा. बोपखेल, पुणे) असे सांगितले. गाडीची झडती घेतली असता डिकीमध्ये विविध ब्रँडची सुमारे २ लाख रुपयांची विदेशी दारू आढळून आली. तसेच स्कॉर्पिओ वाहन व मोबाईलसह एकूण २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.</p>
<p>ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत आणि सह पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वपोनि रविंद्र कदम, पो.नि. (गुन्हे) उमेश गित्ते, सपोनि मिथुन सावंत, सपोनि रविकांत नंदनवार, पो.शि. भिमराव कांबळे, अमोल वायाळ, दत्तात्रय शिंदे, सुरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख, राहुल परदेशी, अतुल जाधव, उगले यांनी सहभाग घेतला.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24421">डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; लक्ष्मीनगर पोलिसांनी स्कॉर्पिओसह लाखोंची विदेशी दारू पकडली</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24421/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>अन्न व औषध प्रशासनाची कारवाई खेड-मावळमध्ये भेसळयुक्त आमरसाचा साठा जप्त</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24350</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24350#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 13 Apr 2026 17:18:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24350</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमरसाची मागणी वाढत असतानाच पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा उघडकीस आल्याने नागरिकांच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24350">अन्न व औषध प्रशासनाची कारवाई खेड-मावळमध्ये भेसळयुक्त आमरसाचा साठा जप्त</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>पुणे प्रतिनिधी</strong></p>
<p>उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमरसाची मागणी वाढत असतानाच पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने खेड आणि मावळ तालुक्यांमध्ये छापे टाकून तब्बल ३२ हजार किलो संशयित मँगो पल्प जप्त केला. सुमारे २.२३ लाख रुपयांचा हा मुद्देमाल असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.</p>
<p>खेड तालुक्यातील राक्षेवाडी तसेच मावळ तालुक्यातील उरसे येथे ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे उरसे येथील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला असता, कोणत्याही वैध परवानगीशिवाय मँगो पल्प तयार केला जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, पल्प तयार करताना साखरेऐवजी भेसळयुक्त घटक, दुधासदृश पदार्थ आणि कृत्रिम केशरी रंगाचा वापर होत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.</p>
<p>या कारवाईदरम्यान मँगो पल्पसह विविध कच्चा माल, द्रव्ये आणि रंगद्रव्ये जप्त करण्यात आली. संबंधित उत्पादन प्रक्रियेत स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. सहआयुक्त दि. वा. भोगावडे आणि आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.</p>
<p>दरम्यान, कमी दरात उपलब्ध होणाऱ्या या पल्पचा ग्रामीण आणि निमशहरी भागात मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराची व्याप्ती अधिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.</p>
<p>आरोग्यावर गंभीर परिणामांची भीती<br />
भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी यांसारख्या तात्काळ तक्रारी उद्भवू शकतात. दीर्घकालीन वापरामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची, तसेच गंभीर आजारांचा धोका वाढण्याचीही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.</p>
<p>अन्न व औषध प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा दिला असून तपास सुरू आहे. नागरिकांनी स्वस्त दराच्या आणि अनोळखी स्त्रोतांमधून मिळणाऱ्या मँगो पल्पपासून दूर राहावे, तसेच प्रमाणित उत्पादनांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24350">अन्न व औषध प्रशासनाची कारवाई खेड-मावळमध्ये भेसळयुक्त आमरसाचा साठा जप्त</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24350/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पुण्यात उष्णतेचा कडाका वाढतोय; पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर, पुढील दोन दिवस निर्णायक</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24323</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24323#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 13 Apr 2026 02:21:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24323</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी उन्हाळ्याचा जोर पुन्हा वाढू लागला असून पुण्यात तापमानाचा पारा आता चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24323">पुण्यात उष्णतेचा कडाका वाढतोय; पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर, पुढील दोन दिवस निर्णायक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>उन्हाळ्याचा जोर पुन्हा वाढू लागला असून पुण्यात तापमानाचा पारा आता चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारव्यामुळे मिळालेला दिलासा आता संपुष्टात येत असून, पुढील दोन दिवसांत शहरातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.</p>
<p>शनिवारी पुण्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. उपनगरांमध्ये तर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवली. लोहगाव येथे ४०.६ अंश, तर कोरेगाव पार्क परिसरात ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका असह्य होत असून नागरिकांनी बाहेर पडताना टोप्या, स्कार्फ, सनग्लासेसचा आधार घेतल्याचे चित्र शहरभर दिसून आले.</p>
<p>पुढील आठवडाभर उष्णतेचा तडाखा</p>
<p>भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत कोरडे आणि उष्ण हवामान राहणार आहे. कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. रविवारी पुण्यात किमान तापमान २२ ते २५ अंश, तर कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.</p>
<p>कोकणात उकाडा आणि आर्द्रतेचा त्रास</p>
<p>दरम्यान, कोकण किनारपट्टी भागात उष्णतेसोबत आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी पावसाची चिन्हे नाहीत. किमान तापमान २४ ते २६ अंश, तर कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. उकाडा आणि चिकटपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.</p>
<p>विदर्भात उष्णतेची लाट तीव्र</p>
<p>विदर्भात परिस्थिती आणखी गंभीर होत असून दुपारच्या सुमारास तापमान झपाट्याने वाढत आहे. किमान तापमान २४ ते २६ अंश असताना कमाल तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.</p>
<p>पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेसोबत हलके वारे</p>
<p>पश्चिम महाराष्ट्रात दिवसभर उष्णता कायम राहणार असली तरी अधूनमधून वाहणारे हलके वारे नागरिकांना काहीसा दिलासा देऊ शकतात.</p>
<p>नागरिकांसाठी इशारा</p>
<p>वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके आणि सूती कपडे वापरणे, तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.</p>
<p>उन्हाळ्याचा खरा तडाखा आता सुरू होत असून, पुढील काही दिवस पुणेकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24323">पुण्यात उष्णतेचा कडाका वाढतोय; पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर, पुढील दोन दिवस निर्णायक</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24323/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पुण्यातील ‘रील स्टार’ महिला पोलीस निलंबित; खंडणीप्रकरणी तिघांवर कारवाई</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24253</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24253#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 11 Apr 2026 14:02:04 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24253</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे, प्रतिनिधी पुणे शहर पोलीस दलातील एका धक्कादायक प्रकरणात “रील स्टार” म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24253">पुण्यातील ‘रील स्टार’ महिला पोलीस निलंबित; खंडणीप्रकरणी तिघांवर कारवाई</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे, प्रतिनिधी</strong></span></p>
<p>पुणे शहर पोलीस दलातील एका धक्कादायक प्रकरणात “रील स्टार” म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिच्यासह दोन सहकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.</p>
<p>निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. कर्तव्यातील निष्काळजीपणा, अधिकारांचा गैरवापर आणि बेजबाबदार वर्तन या कारणांवरून ही कारवाई करण्यात आली असून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे.</p>
<p>तक्रारीपासून खंडणीपर्यंतचा प्रवास</p>
<p>या प्रकरणाची सुरुवात महाविद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीपासून झाली. संबंधित विद्यार्थिनीने काही कागदपत्रांच्या संदर्भात मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणाचा योग्य तपास करण्याऐवजी संबंधित पोलिसांनी त्याचा गैरफायदा घेतल्याचे चौकशीत पुढे आले आहे.</p>
<p>विद्यार्थिनीला सोबत घेऊन तिघांनी थेट प्राचार्यांना जाब विचारला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या माध्यमातून प्राचार्यांवर छळाचा आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. याचबरोबर, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत सुरुवातीला दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली.</p>
<p>भीतीच्या वातावरणात प्राचार्यांनी सात लाख रुपये दिल्याची माहिती पुढे आली असून ही रक्कम तिघांनी आपसांत वाटून घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे.</p>
<p>विद्यार्थिनीचे धैर्य निर्णायक</p>
<p>या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची भूमिका विद्यार्थिनीच्या धैर्याने बजावली. तिने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यानंतर पोलिसांकडे खरी माहिती दिली. या कबुलीजबाबानंतर प्रकरणाचा उलगडा झाला.</p>
<p>यानंतर बंड गार्डन पोलीस ठाणे येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असून विभागीय चौकशीही समांतरपणे केली जात आहे.</p>
<p>पोलीस दलावर प्रश्नचिन्ह</p>
<p>या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्यांकडूनच कायद्याचा गैरवापर झाल्याची बाब अधोरेखित झाली आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून “रील स्टार” म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पोलिसांवरच अशा प्रकारचे आरोप सिद्ध झाल्याने पोलीस दलाच्या आचारसंहितेवर आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.</p>
<p>दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24253">पुण्यातील ‘रील स्टार’ महिला पोलीस निलंबित; खंडणीप्रकरणी तिघांवर कारवाई</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24253/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बुधवार पेठेतील व्हिडिओ चित्रीकरण प्रकरण : पत्रकारासह चौघांवर गुन्हा; ‘स्टिंग’च्या नावाखाली मर्यादा ओलांडल्याचा आरोप</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24247</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24247#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 11 Apr 2026 13:48:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24247</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एका महिलेचे परवानगीशिवाय अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या गंभीर प्रकरणात अखेर संबंधित</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24247">बुधवार पेठेतील व्हिडिओ चित्रीकरण प्रकरण : पत्रकारासह चौघांवर गुन्हा; ‘स्टिंग’च्या नावाखाली मर्यादा ओलांडल्याचा आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>पुण्यातील बुधवार पेठ परिसरात एका महिलेचे परवानगीशिवाय अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या गंभीर प्रकरणात अखेर संबंधित पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने पत्रकारितेतील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या प्रकरणात वृत्तवाहिनीशी संबंधित पत्रकार रोहन राजेंद्र कदम (वय २८) याच्यासह आणखी तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकाराने ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली बुधवार पेठेतील एका महिलेशी संपर्क साधला होता. या दरम्यान, महिलेच्या स्पष्ट संमतीशिवाय तिचे अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.</p>
<p>तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत घटनेची गांभीर्याने दखल घेतली. महिलेचा जबाब नोंदवून पुरावे तपासल्यानंतर रोहन कदम आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य तिघांविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.</p>
<p>दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पुणे श्रमिक पत्रकार संघाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. अशा प्रकारच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही, तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. पत्रकारितेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीच्या खासगीपणावर गदा आणणे अथवा कायद्याचे उल्लंघन करणे अजिबात मान्य नाही, असे संघटनेने ठामपणे नमूद केले.</p>
<p>कायद्याच्या चौकटीत राहूनच ‘स्टिंग ऑपरेशन’सारख्या संवेदनशील पद्धतींचा वापर केला गेला पाहिजे, अन्यथा अशा कृतींमुळे माध्यमांवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेने माध्यमांच्या जबाबदारीबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p>सध्या विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत असून, संबंधितांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे, मोबाईलमधील व्हिडिओ तसेच घटनास्थळावरील तपशील यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24247">बुधवार पेठेतील व्हिडिओ चित्रीकरण प्रकरण : पत्रकारासह चौघांवर गुन्हा; ‘स्टिंग’च्या नावाखाली मर्यादा ओलांडल्याचा आरोप</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24247/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>राज्यात प्रथमच ‘पीपीपी’ तत्त्वावर जिल्हा परिषद शाळा; खानवडीतील ‘जोती-सावित्री’ शाळेचे शनिवारी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्तेउद्घाटन</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24165</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24165#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 09 Apr 2026 15:52:56 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24165</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात प्रथमच ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी)</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24165">राज्यात प्रथमच ‘पीपीपी’ तत्त्वावर जिल्हा परिषद शाळा; खानवडीतील ‘जोती-सावित्री’ शाळेचे शनिवारी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्तेउद्घाटन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात प्रथमच ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) तत्त्वावर जिल्हा परिषद शाळा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग पुणे जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी येथे उभारण्यात आलेल्या ‘जोती-सावित्री जिल्हा परिषद शाळे’चे उद्घाटन शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.</p>
<p>या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठी झेप घडवून आणणारा हा प्रकल्प राज्यातील पहिला प्रयोग ठरणार असल्याने शिक्षण क्षेत्रात त्याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.</p>
<p>सीबीएसई संलग्न जिल्हा परिषद शाळा</p>
<p>खानवडी येथे उभारलेली ‘जोती-सावित्री जिल्हा परिषद शाळा’ ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेली पुणे जिल्हा परिषदेची पहिली शाळा ठरणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही महानगरांतील दर्जेदार शिक्षणासारखी संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.</p>
<p>पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>गरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा</p>
<p>या शाळेत बालवाडीपासून बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गांसाठी २६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.</p>
<p>पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून निवासी शाळेचीही सुरुवात केली जाणार असून प्रारंभी ४० विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.</p>
<p>विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा यांसारख्या आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी न्याहरी, भोजन, गणवेश, कपडे तसेच वाहतूक व्यवस्थाही शाळेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.</p>
<p>१२ एकरांवर उभारलेली भव्य शैक्षणिक संकुल</p>
<p>खानवडी येथे राज्य शासनाने जिल्हा परिषदेला १२ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्यावर अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. वर्गखोल्या, प्रशासकीय इमारत, क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा यांचे बांधकाम पूर्ण झाले असून वसतिगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.</p>
<p>शाळा चालविण्यासाठी क्रिस्टल हाउस इंडिया या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने पुणे शहर व जिल्ह्यातील पात्र शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. शाळेचे प्रशासकीय नियंत्रण जिल्हा परिषदेकडेच राहणार असून तज्ज्ञांचा समावेश असलेली नियामक समिती देखील नियुक्त केली जाणार आहे.</p>
<p>सामाजिक उत्तरदायित्वातून निधी</p>
<p>या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उद्योग क्षेत्रातूनही मोठे योगदान मिळाले आहे. फियाट इंडिया कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत २१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सेस निधीतून १५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे.</p>
<p>फुले दांपत्याच्या विचारांना आधुनिक स्वरूप</p>
<p>जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता, सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास साध्य करण्याचा व्यापक प्रयत्न या प्रकल्पातून केला जात आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षणाच्या चळवळीला आधुनिक काळात नवे रूप देणारा हा उपक्रम ठरेल.</p>
<p>त्यामुळे भविष्यात राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या ‘पीपीपी’ तत्त्वावरील शाळा उभारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी</p>
<p>खानवडी परिसरातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा विद्यार्थ्यांना महानगरांतील महागड्या शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण होते. मात्र या नव्या शाळेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध होणार आहे.</p>
<p>मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की,<br />
“ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि निवासी व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.”</p>
<p>ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारा हा प्रयोग यशस्वी ठरल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24165">राज्यात प्रथमच ‘पीपीपी’ तत्त्वावर जिल्हा परिषद शाळा; खानवडीतील ‘जोती-सावित्री’ शाळेचे शनिवारी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्तेउद्घाटन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24165/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचाही पटपडताळणीत समावेश; शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24116</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24116#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 08 Apr 2026 16:46:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24116</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची पडताळणी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24116">राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचाही पटपडताळणीत समावेश; शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>पुणे प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची पडताळणी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचाही पटपडताळणी प्रक्रियेत समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी एकाच कालावधीत केली जाणार आहे.</p>
<p>यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील वास्तविक विद्यार्थीसंख्या स्पष्ट होण्यास मदत होणार असून, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेलाही अचूक आधार मिळणार आहे.</p>
<p>तीन टप्प्यांत पटपडताळणी</p>
<p>राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘पॅट’ परीक्षा ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेच्या कालावधीतच संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी केली जाणार आहे.</p>
<p>या प्रक्रियेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थीही याच तारखांमध्ये पडताळणीसाठी समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे आतापर्यंत पडताळणीबाहेर राहणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदही अधिकृतपणे तपासली जाणार आहे.</p>
<p>नववी आणि अकरावीच्या परीक्षाही याच कालावधीत</p>
<p>याच कालावधीत इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच इयत्ता अकरावीची मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांचीही वार्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांसोबतच पटपडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.</p>
<p>अधिकारी-कर्मचाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचना</p>
<p>पटपडताळणी प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक यंत्रणा उभी केली आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पडताळणीसाठी शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा परिषदांच्या इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही सेवा उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.</p>
<p>यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांना आवश्यक नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून ही मनुष्यबळ व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.</p>
<p>पटसंख्येतील अनियमिततेच्या तक्रारी</p>
<p>अलीकडच्या काळात काही शाळांमधील पटसंख्येबाबत अनियमिततेच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. काही ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपेक्षा अधिक संख्या दाखविण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.</p>
<p>प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले की,<br />
“पटसंख्येबाबत काही अनियमिततेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता इयत्ता पहिलीचाही समावेश पटपडताळणी प्रक्रियेत करण्यात आला आहे. यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक संख्या समोर येईल.”</p>
<p>अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू</p>
<p>दरम्यान, राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जास्त असताना काही ठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्याचे चित्र आहे. या असमतोलावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया हाती घेतली आहे.</p>
<p>या प्रक्रियेनुसार, ज्या शाळांमध्ये शून्य शिक्षक पदे किंवा अतिरिक्त कर्मचारी आहेत, तेथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुनर्नियोजन करण्यात येणार आहे.</p>
<p>परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच बदली</p>
<p>माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले की,<br />
“संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०२६ मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण कराव्यात. निकाल जाहीर झाल्यानंतर आणि शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर समायोजन करण्यात आलेल्या शाळांमध्ये त्यांनी हजर व्हायचे आहे.”</p>
<p>शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेकडे पाऊल</p>
<p>शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची वास्तविक पटसंख्या समोर येण्यास मदत होणार आहे. तसेच शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला वस्तुनिष्ठ आधार मिळणार असल्याने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</p>
<p>राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अचूक नोंद, संसाधनांचे योग्य नियोजन आणि शिक्षकांची संतुलित उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24116">राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचाही पटपडताळणीत समावेश; शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24116/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>VIDEO &#124; नशेत धुमाकूळ! अनेक गाड्यांना धडक; पोलीसाला कारमध्ये बसवून अपहरणाचा प्रयत्न, अखेर भररस्त्यात आरोपीचा माज उतरवला</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24085</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24085#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 07 Apr 2026 17:37:13 +0000</pubDate>
				<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24085</guid>

					<description><![CDATA[<p>पुणे प्रतिनिधी पुण्यातील वारजे परिसरात मद्यधुंद कार चालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24085">VIDEO | नशेत धुमाकूळ! अनेक गाड्यांना धडक; पोलीसाला कारमध्ये बसवून अपहरणाचा प्रयत्न, अखेर भररस्त्यात आरोपीचा माज उतरवला</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>पुणे प्रतिनिधी</strong></p>
<p>पुण्यातील वारजे परिसरात मद्यधुंद कार चालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या चालकाला रोखण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसालाच कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून आरोपीला अटक केली असून, संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत त्याचा भररस्त्यातच ‘माज’ उतरवण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="550" data-dnt="true">
<p lang="mr" dir="ltr">हद्द झाली! पुण्यात वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, दिवसाढवळ्या नेमकं झालं काय?  <a href="https://twitter.com/hashtag/pune?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#pune</a> <a href="https://twitter.com/hashtag/punepolice?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#punepolice</a> <a href="https://twitter.com/hashtag/Pune?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Pune</a> <a href="https://t.co/b8zfFsIXJI">pic.twitter.com/b8zfFsIXJI</a></p>
<p>&mdash; Namdeo kumbhar (@kumbharnc57) <a href="https://twitter.com/kumbharnc57/status/2041459701242876383?ref_src=twsrc%5Etfw">April 7, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक उत्तम नगरहून वारजेच्या दिशेने भरधाव वेगाने कार चालवत होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाटेत येणाऱ्या अनेक वाहनांना त्याने जोरदार धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.</p>
<p>या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गाडी थांबवण्यासाठी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने धाडस दाखवत कारचे दार उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने गाडी थांबवण्याऐवजी ती अधिक वेगाने पुढे दामटली आणि त्या पोलिसालाच कारमध्ये घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही क्षणांसाठी परिस्थिती आणखी गंभीर झाली.</p>
<p>दरम्यान, इतर पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला. काही अंतरावर आरोपीची कार अडवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी कारला घेराव घालत चालकाला बाहेर काढले. घटनास्थळी जमलेल्या संतप्त नागरिकांसमोर पोलिसांनी आरोपीचा चांगलाच समाचार घेतल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.</p>
<p>उत्तम नगर ते वारजे या मार्गावर घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आरोपीने एकामागून एक अशा अनेक वाहनांना धडक दिल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.</p>
<p>या प्रकरणी पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो नेमका किती प्रमाणात मद्यधुंद होता, तसेच या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24085">VIDEO | नशेत धुमाकूळ! अनेक गाड्यांना धडक; पोलीसाला कारमध्ये बसवून अपहरणाचा प्रयत्न, अखेर भररस्त्यात आरोपीचा माज उतरवला</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24085/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
