<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>मुंबई Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/mumbai/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/mumbai</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Thu, 16 Apr 2026 14:41:51 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9.4</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2025/01/satara-150x150.png</url>
	<title>मुंबई Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/mumbai</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>अंजली दमानियांचा थेट आरोप: खरातशी संबंधित बड्या व्यक्तींची यादी उघड</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24528</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24528#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 14:41:51 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24528</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी भोंदूगिरी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24528">अंजली दमानियांचा थेट आरोप: खरातशी संबंधित बड्या व्यक्तींची यादी उघड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></p>
<p>भोंदूगिरी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पत्रकार परिषदेत दमानिया यांनी खरातशी संबंधित असल्याचा दावा करत अनेक राजकीय नेते, शासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.</p>
<p>दमानिया यांनी सादर केलेल्या यादीत राज्यातील काही वरिष्ठ राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांची नावे असल्याचे त्यांनी नमूद केले. या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्ती आणि पदाधिकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आल्याने ‘नाशिक कनेक्शन’ पुन्हा चर्चेत आले आहे.</p>
<p>यादीत कळवणचे आमदार नितीन पवार, सिन्नर येथील उदय सांगळे, विधान परिषदेचे उमेदवार शिवाजी सहाणे, मंत्री दादा भुसे यांचे पीए रामदास खेडकर, तसेच चंद्रकांत पाटील यांचे पीए मंगेश देशपांडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे ओएसडी राहुल कोतडे यांची नावेही जाहीर करण्यात आली. याशिवाय प्रभाकर काळे, बाळासाहेब बोराडे, नंदकिशोर काटोरे, सचिन चुंभळे, मंगेश नवाळे, राहुल देशमुख, अविनाश पोटे, कमलाकर पोटे आणि महेंद्र शेळके-पाटील यांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला.</p>
<p>दमानिया यांनी सांगितले की, त्यांच्या हाती लागलेल्या कॉल रेकॉर्ड्स आणि भेटींच्या तपशीलांमध्ये रूपाली चाकणकर, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर आणि संकेत सायकर यांची नावे समोर आली आहेत. संबंधित व्यक्तींचे खरातशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा दावा त्यांनी केला असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>दरम्यान, अशोक खरात याला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली असून, तो मागील महिनाभरापासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर महिला अत्याचाराचे आठ, फसवणुकीचे सहा आणि धमकीचा एक अशा एकूण १५ गुन्ह्यांची नोंद आहे. तपासादरम्यान ‘पुत्रप्राप्ती’चे आमिष दाखवून एका महिलेशी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.</p>
<p>पत्नी फरार; मालमत्तेचा तपास सुरू</p>
<p>अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही शिर्डी येथील जमीन बळकावल्याच्या प्रकरणात अद्याप फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि विशेष तपास पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. तपासादरम्यान काही राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मालमत्ता उभारल्याचेही प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.</p>
<p>या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले जाणार का, तसेच या प्रकरणाचा तपास आणखी कोणत्या दिशेने पुढे जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24528">अंजली दमानियांचा थेट आरोप: खरातशी संबंधित बड्या व्यक्तींची यादी उघड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24528/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मुंबईत १८ एप्रिलपासून कॅब चालकांचा संप; आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24524</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24524#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 14:03:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24524</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी शहरातील अॅप-आधारित कॅब सेवांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी चिंताजनक घडामोड समोर आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24524">मुंबईत १८ एप्रिलपासून कॅब चालकांचा संप; आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>शहरातील अॅप-आधारित कॅब सेवांवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी चिंताजनक घडामोड समोर आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कॅब चालक संघटनांनी १८ एप्रिलपासून संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला असून, आंदोलन अधिक तीव्र करत आझाद मैदानात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दैनंदिन प्रवास व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>अॅप-आधारित कॅब कंपन्यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाडे दरांमध्ये सातत्याने होणारे चढ-उतार, कमिशनची वाढती टक्केवारी आणि परिणामी चालकांच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेक चालकांनी कंपन्यांकडून लागू करण्यात येणाऱ्या अटी व नियम अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे.</p>
<p>कॅब चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या संदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपात मुंबईसह राज्यभरातील हजारो चालक सहभागी होण्याची शक्यता असून, यामुळे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकते.</p>
<p>या संपाचा सर्वाधिक फटका रोज कॅब सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे कर्मचारी, विमानतळावर जाणारे प्रवासी तसेच उशिरा रात्री प्रवास करणाऱ्यांना पर्यायी वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागू शकतो. विशेषतः सार्वजनिक वाहतुकीवर आधीच ताण असताना हा संप अतिरिक्त दबाव निर्माण करू शकतो.</p>
<p>दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून रेल्वे, बस किंवा इतर उपलब्ध साधनांचा वापर करावा, असे आवाहन लवकरच केले जाण्याची शक्यता आहे.</p>
<p>कॅब चालक आणि सरकार यांच्यातील संभाव्य चर्चेतून या आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर या संपाचा नेमका किती परिणाम होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24524">मुंबईत १८ एप्रिलपासून कॅब चालकांचा संप; आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24524/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्रात प्रशासकीय हालचालींना वेग; पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कुठे वाचा&#8230;</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24499</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24499#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 04:15:25 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24499</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेत सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्राला अद्यापही विराम मिळालेला नसून, राज्य सरकारने आणखी पाच</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24499">महाराष्ट्रात प्रशासकीय हालचालींना वेग; पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कुठे वाचा&#8230;</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेत सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्राला अद्यापही विराम मिळालेला नसून, राज्य सरकारने आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांतील वरिष्ठ पदांवर फेरबदल करण्यात आल्यानंतर आता नव्या नियुक्त्यांमुळे प्रशासनातील महत्त्वाच्या पदांची पुनर्रचना करण्यात आली आहे.</p>
<p>ताज्या आदेशानुसार, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२० बॅचचे अधिकारी असलेले जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम करत प्रशासनिक अनुभव मिळवला आहे.</p>
<p>दरम्यान, पर्यटन संचालनालय, मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बी. एन. पाटील यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ‘रुसा’ (RUSA) योजनेच्या प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. २०१४ बॅचचे हे अधिकारी नव्या जबाबदारीतून राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रकल्पांना चालना देणार आहेत.</p>
<p>याच पार्श्वभूमीवर, यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत असलेले मंगेश जोशी यांची पर्यटन संचालनालय, मुंबई येथे संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन व प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवामुळे पर्यटन विभागातील कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.</p>
<p>सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कुशल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२२ बॅचचे जैन सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी तसेच सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. ग्रामीण विकास आणि आदिवासी भागातील अनुभव त्यांच्या नव्या पदावर उपयोगी ठरणार आहे.</p>
<p>तसेच, २०२३ बॅचचे अधिकारी रेवैया डोंगरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी तसेच केळापूर उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे कार्यरत होते.</p>
<p>राज्यातील प्रशासकीय बदल्यांचा हा सिलसिला पुढेही सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी काळात आणखी काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24499">महाराष्ट्रात प्रशासकीय हालचालींना वेग; पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाची कुठे वाचा&#8230;</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24499/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बीएमसीच्या सीबीएसई शाळांची दमदार कामगिरी; दहावीचा निकाल ९२.८९%</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24494</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24494#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 16 Apr 2026 03:55:35 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24494</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही उल्लेखनीय यशाची</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24494">बीएमसीच्या सीबीएसई शाळांची दमदार कामगिरी; दहावीचा निकाल ९२.८९%</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राहिली आहे. महानगरपालिकेच्या ११ सीबीएसई शाळांचा एकत्रित निकाल ९२.८९ टक्के इतका लागला असून, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने होत असलेली प्रगती या निकालातून अधोरेखित झाली आहे.</p>
<p>महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या शाळांमधून यंदा एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले. विशेष म्हणजे, चार शाळांनी १०० टक्के निकालाची नोंद करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.</p>
<p>यंदाच्या निकालात मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामणे हिने ९७.८ टक्के गुण मिळवत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ पुनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के) आणि राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय पुनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) व श्रेया सिंग (९६.४ टक्के), तसेच मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.</p>
<p>दरम्यान, भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर), मिठा नगर (मुलुंड) आणि पुनम नगर (अंधेरी) या चार शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवून विशेष कामगिरी बजावली आहे.</p>
<p>निकालाच्या विश्लेषणातून गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षणीय प्रगती केल्याचे दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळविले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यांचे हे एकत्रित फलित असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले.</p>
<p>दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे तसेच उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24494">बीएमसीच्या सीबीएसई शाळांची दमदार कामगिरी; दहावीचा निकाल ९२.८९%</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24494/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बीकेसीत ४०० टन क्रेन उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24482</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24482#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 16:27:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24482</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात मेट्रो बांधकामादरम्यान पहाटेच्या सुमारास ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन उलटल्याची धक्कादायक घटना</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24482">बीकेसीत ४०० टन क्रेन उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात मेट्रो बांधकामादरम्यान पहाटेच्या सुमारास ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन उलटल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मेट्रो २ बी प्रकल्पाच्या कामावेळी हा अपघात घडला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही तास परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.</p>
<p>एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शन जवळ प्री-कास्ट गर्डर बसवण्याचे काम सुरू होते. यावेळी प्री-कास्ट बीम उचलत असताना क्रेनमध्ये अचानक यांत्रिक बिघाड झाला आणि नियंत्रण सुटल्याने ती उलटली. क्रेन उलटताच त्यावरील बीमही जमिनीवर कोसळला. सुरुवातीला बीम कोसळल्याने अपघात झाल्याची चर्चा होती; मात्र एमएमआरडीएकडून हा दावा फेटाळण्यात आला असून, प्राथमिक कारण यांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.</p>
<p>अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले. रस्त्यावर आडवी पडलेली क्रेन आणि इतर उपकरणे हटवण्यासाठी ६०० टन क्षमतेची दुसरी क्रेन मागवण्यात आली. तसेच, वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. बीकेसीतील प्रमुख मार्ग काही काळ बंद ठेवावा लागल्याने सकाळच्या वाहतुकीवर परिणाम झाला.</p>
<p>मुंबईत सध्या विविध मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असल्याने अशा प्रकारची जड यंत्रसामग्री रात्रीच्या वेळेत वापरली जाते. नागरिकांना दिवसा अडथळा होऊ नये, यासाठी ही कामे प्रामुख्याने मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत केली जातात. मात्र, या कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन कितपत काटेकोरपणे केले जाते, याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.</p>
<p>दरम्यान, या प्रकल्पाचे कंत्राट जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीकडे असून, तिच्या कामकाजावर यापूर्वीही टीका झाली आहे. बीकेसी परिसरातीलच एका उड्डाणपुलाच्या कामादरम्यान पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती, ज्यात काही जण जखमी झाले होते. त्या वेळी संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती.</p>
<p>तसेच, दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ प्रकल्पादरम्यानही या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सातहून अधिक अपघात घडल्याची नोंद आहे. या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे संबंधित कंपनीच्या सुरक्षाविषयक धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.</p>
<p>या पार्श्वभूमीवर, बीकेसीतील ताज्या घटनेनंतर कंत्राटदारांवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वेगासोबतच कामगार आणि नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्याने सुनिश्चित करण्याची जबाबदारी प्रशासनासमोर पुन्हा अधोरेखित झाली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24482">बीकेसीत ४०० टन क्रेन उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24482/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>गोरेगावातील कॉन्सर्ट दुर्घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; शिवसेनेचे वनराई पोलिस ठाण्यावर आंदोलन</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24468</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24468#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 15:53:09 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24468</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24468">गोरेगावातील कॉन्सर्ट दुर्घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; शिवसेनेचे वनराई पोलिस ठाण्यावर आंदोलन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज वनराई पोलिस ठाणे येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. संबंधित घटनेला जबाबदार असलेल्या आयोजक व पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.</p>
<p><img fetchpriority="high" decoding="async" class="alignnone size-full wp-image-24469" src="https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/04/1000577708.jpg" alt="" width="1440" height="1080" srcset="https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/04/1000577708.jpg 1440w, https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/04/1000577708-300x225.jpg 300w, https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/04/1000577708-1024x768.jpg 1024w, https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/04/1000577708-768x576.jpg 768w" sizes="(max-width: 1440px) 100vw, 1440px" /></p>
<p>घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून तरुणांमध्ये वाढत चाललेला अंमली पदार्थांचा वापर, तसेच अशा कार्यक्रमांतील सुरक्षेतील त्रुटी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करत, अशा कार्यक्रमांवर प्रभावी देखरेख ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप केला.</p>
<p>या आंदोलनात शिवसेना नेते व विभागप्रमुख आमदार सुनिल प्रभू, मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार बाळा नर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू, माजी उपमहापौर सुहास वाडकर यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.</p>
<p>यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘दोषींना तात्काळ अटक करा’, ‘कॉन्सर्टमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले असले तरी, दोषींवर तातडीने कडक कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.</p>
<p>दरम्यान, या घटनेमुळे शहरातील मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी असलेल्या नियमावलींच्या अंमलबजावणीवर आणि तरुणांच्या सुरक्षिततेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी अशा कार्यक्रमांवर अधिक कडक नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24468">गोरेगावातील कॉन्सर्ट दुर्घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; शिवसेनेचे वनराई पोलिस ठाण्यावर आंदोलन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24468/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>एका वर्षात ४१.९० लाख विनातिकीट प्रवासी जाळ्यात; २५१.९१ कोटींचा दंड वसूल</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24460</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24460#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 15:34:20 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24460</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विनातिकीट व अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत तब्बल</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24460">एका वर्षात ४१.९० लाख विनातिकीट प्रवासी जाळ्यात; २५१.९१ कोटींचा दंड वसूल</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विनातिकीट व अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत तब्बल ४१.९० लाख प्रवाशांची धरपकड केली आहे. या कारवाईतून २५१.९१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत कारवाईत आणि दंड वसुलीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.</p>
<p>२०२४-२५ मध्ये ३८.०५ लाख विनातिकीट प्रवासी पकडले गेले होते. यंदा ही संख्या सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे दंड वसुलीतही मोठी झेप घेतली असून, मागील वर्षीच्या २०३.७० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २४ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.</p>
<p>रेल्वे प्रशासनाच्या मते, प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विनातिकीट प्रवाशांविरुद्ध सातत्याने विशेष तपासणी मोहीमा राबवण्यात आल्या. पद्धतशीर तपासणी आणि आकस्मिक छापे यामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासावर आळा बसवणे शक्य झाले.</p>
<p>मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवासाचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. या गाड्यांमध्ये २९.२७ लाख प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून २१३.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपनगरीय लोकल सेवेत १२.६३ लाख प्रवाशांवर कारवाई करत ३८.८६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.</p>
<p>वातानुकूलित लोकलमध्येही वाढती प्रकरणे</p>
<p>मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकल सेवेतही विनातिकीट प्रवासाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. २०२५-२६ मध्ये अशा १.२३ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ही संख्या मागील वर्षाच्या ९८,६८१ प्रकरणांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी अधिक आहे. या कारवाईतून ३.८९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यातही २० टक्क्यांची वाढ झाली आहे.</p>
<p>मार्च महिन्यातही कारवाईचा जोर</p>
<p>मार्च २०२६ मध्ये ३.९१ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. मार्च २०२५ मधील ३.४४ लाखांच्या तुलनेत यात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत २४.८८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, जो मागील वर्षाच्या १८.०८ कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल ३८ टक्क्यांनी अधिक आहे.</p>
<p>विभागनिहाय कारवाई</p>
<p>मध्य रेल्वेच्या विविध विभागांतही विनातिकीट प्रवाशांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. मुंबई विभाग आघाडीवर राहिला असून, येथे १७.९७ लाख प्रकरणांमधून ८०.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागातून ९.६३ लाख प्रकरणांतून ८१.२८ कोटी रुपये वसूल झाले. पुणे विभागात ४.७३ लाख प्रकरणांतून ३०.१५ कोटी, नागपूर विभागात ४.५४ लाख प्रकरणांतून २८.३६ कोटी, तर सोलापूर विभागात २.५३ लाख प्रकरणांतून ११.६२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. मुख्यालय पातळीवर २.४८ लाख प्रकरणांतून १९.५१ कोटी रुपये जमा झाले.</p>
<p>रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी पुढील काळातही तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24460">एका वर्षात ४१.९० लाख विनातिकीट प्रवासी जाळ्यात; २५१.९१ कोटींचा दंड वसूल</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24460/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>संकेतस्थळावर रक्तसाठा जाहीर न केल्यास दंड;  मुंबईतील रक्तपेढ्यांकडून २.५१ लाखांची थकबाकी  रेडक्रॉस, भाभा, जे.जे. आदी रक्तपेढ्यांवर कारवाई; २.५१ लाखांचा दंड</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24456</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24456#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 15:18:06 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24456</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) नियमांचे पालन करण्यात मुंबईतील अनेक सरकारी रक्तपेढ्या अपयशी ठरत असल्याचे समोर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24456">संकेतस्थळावर रक्तसाठा जाहीर न केल्यास दंड;  मुंबईतील रक्तपेढ्यांकडून २.५१ लाखांची थकबाकी  रेडक्रॉस, भाभा, जे.जे. आदी रक्तपेढ्यांवर कारवाई; २.५१ लाखांचा दंड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) नियमांचे पालन करण्यात मुंबईतील अनेक सरकारी रक्तपेढ्या अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे. रक्तसाठ्याची दैनंदिन माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध न केल्याप्रकरणी मागील तीन वर्षांत विविध रक्तपेढ्यांवर एकूण २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी बहुतांश रक्कम अद्याप वसूल झालेली नाही.</p>
<p>एसबीटीसीच्या नियमानुसार प्रत्येक रक्तपेढीने दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रक्तपेढीवर प्रतिदिन एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. नागरिकांना तातडीच्या गरजेत रक्त सहज उपलब्ध व्हावे, यासाठी ही यंत्रणा राबविण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक रक्तपेढ्यांकडून या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.</p>
<p>मुंबईतील कूपर, जे.जे. महानगर, रेडक्रॉस, शीव, सेंट जॉर्जेस, कामा आणि भाभा रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांचा दंड आकारण्यात आलेल्या यादीत समावेश आहे. यापैकी केवळ २१ हजार रुपयांची रक्कम भरली गेली असून, तब्बल २ लाख ३० हजार रुपये दंड प्रलंबित आहेत.</p>
<p>कूपर, जे.जे. आघाडीवर</p>
<p>दंडाच्या संख्येनुसार कूपर रुग्णालयातील रक्तपेढीला सर्वाधिक २७ वेळा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांनी अद्याप एकदाही दंड भरलेला नाही. त्यापाठोपाठ जे.जे. महानगर रक्तपेढीला २६ वेळा दंड आकारण्यात आला असून, त्यांनी केवळ एकदाच दंड भरला आहे. रेडक्रॉस रक्तपेढीवर २५ वेळा दंड आकारण्यात आला असून, या संस्थेनेही अद्याप रक्कम भरलेली नाही. सेंट जॉर्जेस व भाभा रुग्णालयांना प्रत्येकी २१ वेळा, तर शीव रुग्णालयाला २० वेळा दंड ठोठावण्यात आला आहे.</p>
<p>काहींचे पालन समाधानकारक</p>
<p>याउलट, काही रक्तपेढ्यांनी नियमांचे तुलनेने चांगले पालन केले आहे. जी.टी. रुग्णालयाला पाच वेळा दंड आकारण्यात आला असून, त्यातील एक दंड भरला आहे. राजावाडी रुग्णालयाने चारपैकी दोन दंड भरले आहेत. व्ही.एन. देसाई, टाटा आणि जगजीवन रक्तपेढ्यांना मर्यादित वेळा दंड ठोठावण्यात आला आहे. नायर रुग्णालयाने मात्र सर्व आठ वेळचा दंड भरून नियमपालनाची नोंद केली आहे.</p>
<p>परवाना नूतनीकरणावेळी वसुली</p>
<p>“रक्तपेढ्यांकडून दंड तत्काळ भरला जात नसला, तरी परवाना नूतनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित रक्कम वसूल केली जाते. दंड न भरल्यास परवाना नूतनीकरण रोखले जाते,” अशी माहिती एसबीटीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.</p>
<p>दरम्यान, रक्तसाठ्याची अचूक व वेळेवर माहिती उपलब्ध न झाल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24456">संकेतस्थळावर रक्तसाठा जाहीर न केल्यास दंड;  मुंबईतील रक्तपेढ्यांकडून २.५१ लाखांची थकबाकी  रेडक्रॉस, भाभा, जे.जे. आदी रक्तपेढ्यांवर कारवाई; २.५१ लाखांचा दंड</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24456/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्र तळपला; उष्णतेच्या लाटेविरुद्ध राज्य शासनाची त्रिस्तरीय ‘SOP’ रणनीती</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24437</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24437#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Apr 2026 11:10:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24437</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी राज्यात एप्रिलच्या मध्यातच उन्हाचा कडाका तीव्र होत असून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अक्षरशः</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24437">महाराष्ट्र तळपला; उष्णतेच्या लाटेविरुद्ध राज्य शासनाची त्रिस्तरीय ‘SOP’ रणनीती</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>राज्यात एप्रिलच्या मध्यातच उन्हाचा कडाका तीव्र होत असून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अक्षरशः तापले आहेत. अकोला येथे मंगळवारी तापमानाने ४४ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला, तर अमरावतीमध्ये ४३.८ अंश आणि सोलापूरमध्ये ४३.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटांचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले असून, याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातील कामगार, बाहेर काम करणारे कर्मचारी आणि कमी उत्पन्न गटांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी तीन व्यापक मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर करत उष्णतेविरुद्ध सज्जतेचा स्पष्ट संदेश दिला आहे.</p>
<p>राज्याच्या उष्णता कृती आराखड्याशी सुसंगत आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) रंग-कोडेड सतर्कतांवर आधारित या SOP तयार करण्यात आल्या आहेत. पिवळी, केशरी आणि लाल सतर्कता लक्षात घेऊन विविध उपाययोजना आखण्यात आल्या असून, उष्णतेमुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे हा या धोरणांचा मुख्य उद्देश आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या उपाययोजनांमुळे विशेषतः असुरक्षित घटकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.</p>
<p>राज्यातील १५ उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यांची निवड करून त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक असल्याने या भागांसाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यांतील बाहेर काम करणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कर्मचारी आणि रिक्षाचालक यांना प्राधान्याने संरक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे.</p>
<p>पहिल्या SOPमध्ये बाहेर काम करणाऱ्या घटकांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तीव्र उन्हाचा कालावधी मानून या वेळेत कामाचे तास मर्यादित ठेवण्याचे सुचवण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी नियमित पाण्याचे ब्रेक, ओआरएसचे वितरण, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, तसेच सावलीची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे. आयएमडीच्या सतर्कतेनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा मजबूत करणे या बाबींचाही यात समावेश आहे. उष्णतेच्या लाटांदरम्यान कामगारांना विश्रांती मिळावी आणि उष्णताजन्य आजार टाळता यावेत, हा यामागील उद्देश आहे.</p>
<p>दुसरी SOP चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेषतः तयार करण्यात आली आहे. या भागात कामाचे स्वरूप अत्यंत कष्टदायक आणि उष्णतेचा प्रभाव अधिक असल्याने उष्णता ताण व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. खाणींमध्ये थंड विश्रांती केंद्रे उभारणे, पुरेसा पाणीपुरवठा आणि वायुवीजन सुनिश्चित करणे, कामाचे नियोजन योग्य प्रकारे करणे आणि जॉब रोटेशन लागू करणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तसेच कामगारांना उष्णता आजारांची लक्षणे ओळखण्याचे प्रशिक्षण देणे आणि महिला कामगारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे यावरही भर देण्यात आला आहे.</p>
<p>तिसरी SOP उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण आणि वसाहतींवर केंद्रित आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर घरांची रचना आणि शहरी नियोजन यामध्ये बदल करणे अत्यावश्यक ठरत असल्याने यामध्ये तात्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत. तात्काळ उपाययोजनांमध्ये उष्णता जोखीम नकाशे तयार करणे, असुरक्षित गटांची ओळख पटवणे, जनजागृती वाढवणे आणि कमी खर्चात घरांची थर्मल सुधारणा करणे यांचा समावेश आहे. रिफ्लेक्टिव्ह छप्पर, योग्य वेंटिलेशन आणि सावली निर्माण करणाऱ्या उपाययोजना यामुळे घरांतील तापमान कमी ठेवता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>मध्यम मुदतीच्या उपाययोजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांमध्ये ‘कूल रूफ’ आणि हरित क्षेत्रांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे. बिल्डिंग बाय-लॉज आणि मास्टर प्लॅनमध्ये हवामान-संवेदनशील डिझाइन समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये राज्य बिल्डिंग कोडमध्ये बदल करून क्लायमेट-सेन्सिटिव्ह झोनिंग लागू करणे, तसेच सर्वांसाठी तापमान-संतुलित शहरी सुविधा निर्माण करणे यांचा समावेश आहे.</p>
<p>या तिन्ही SOPमध्ये विभागीय समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग, म्हाडा, सिडको आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रांची तयारी, कामगारांच्या अभिप्रायावर आधारित पुनरावलोकन आणि असंघटित क्षेत्रातील प्रतिनिधित्व यांनाही महत्त्व देण्यात आले आहे.</p>
<p>आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (१०७७), रुग्णवाहिका सेवा (१०८) आणि पोलीस हेल्पलाइन (११२) यांसारख्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. उष्णतेच्या लाटांचा सामना करताना प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राहणे अत्यावश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.</p>
<p>महाराष्ट्र हा देशातील उष्णतेचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या राज्यांपैकी एक असून, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. काही भागांमध्ये तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.</p>
<p>मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर या SOP तयार करण्यात आल्या असून, असंघटित क्षेत्रातील कामगार, खाण कामगार आणि उष्णतेला तोंड देणाऱ्या घरांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मे आणि जून महिन्यांत उष्णतेचा प्रकोप वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जनजागृती मोहिमाही राबवली जाणार आहे. तसेच दरवर्षी या SOPचा आढावा घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24437">महाराष्ट्र तळपला; उष्णतेच्या लाटेविरुद्ध राज्य शासनाची त्रिस्तरीय ‘SOP’ रणनीती</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24437/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>जयंत्यांवरील दिखाऊपणावर प्रहार; विचारांच्या आचरणाची गरज &#8211; राज ठाकरेंची भूमिका</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/24416</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/24416#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 14 Apr 2026 17:41:59 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=24416</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि अभिवादनपर उपक्रमांचे आयोजन</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24416">जयंत्यांवरील दिखाऊपणावर प्रहार; विचारांच्या आचरणाची गरज &#8211; राज ठाकरेंची भूमिका</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि अभिवादनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेली सोशल मीडियावरील पोस्ट विशेष चर्चेत आली असून, जयंत्या साजऱ्या करण्याच्या सध्याच्या पद्धतीवर त्यांनी थेट भाष्य केले आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="550" data-dnt="true">
<p lang="mr" dir="ltr">आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. <br />भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. </p>
<p>पण… <a href="https://t.co/3o6d1QS4kU">pic.twitter.com/3o6d1QS4kU</a></p>
<p>&mdash; Raj Thackeray (@RajThackeray) <a href="https://twitter.com/RajThackeray/status/2043892846089122001?ref_src=twsrc%5Etfw">April 14, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आठवण करून दिली. “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. मात्र त्याचबरोबर त्यांची आर्थिक दृष्टीही तितकीच सखोल होती,” असे त्यांनी नमूद केले. ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स’ या ग्रंथाचा उल्लेख करत त्यांनी आंबेडकरांच्या आर्थिक विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. या विचारांचा प्रभाव देशातील केंद्रीय बँकिंग व्यवस्थेच्या उभारणीत दिसून येतो, असेही त्यांनी सूचित केले.</p>
<p>स्वातंत्र्यलढ्यातील नेतृत्वाचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित करताना राज ठाकरे म्हणाले की, त्या काळातील नेत्यांना केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक न्यायही तितकाच महत्त्वाचा वाटत होता. या संदर्भात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या नेत्यांचाही उल्लेख केला.</p>
<p>जयंत्या आणि पुण्यतिथींच्या साजरीकरणातील दिखाऊपणावर त्यांनी टीका करताना स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले. “महापुरुषांचे पुतळे उभारणे, त्यांना जातीय चौकटीत विभागणे किंवा कर्कश्य डीजेसह मिरवणुका काढणे यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. अशा पद्धतींमुळे महापुरुषांच्या कार्याचा अपमान होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.</p>
<p>राज्याच्या विकासाच्या सध्याच्या संकल्पनेवरही त्यांनी भाष्य केले. “विकास म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नव्हे; समाजातील वंचित घटकांपर्यंत त्याचा प्रत्यक्ष लाभ पोहोचणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. सामाजिक आणि आर्थिक भान असलेल्या नेतृत्वाची उणीव आज प्रकर्षाने जाणवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.</p>
<p>पोस्टच्या शेवटी त्यांनी डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या समग्र विचारांची आजच्या काळात अधिक गरज असल्याचे अधोरेखित केले.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/24416">जयंत्यांवरील दिखाऊपणावर प्रहार; विचारांच्या आचरणाची गरज &#8211; राज ठाकरेंची भूमिका</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/24416/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
