<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>मुंबई Archives - Satara Pratinidhi</title>
	<atom:link href="https://www.satarapratinidhinews.com/archives/category/mumbai/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/mumbai</link>
	<description>Hindi news, मराठी News , Hindi Samachar, मराठी बातम्या, Latest News in Hindi, Breaking News in Hindi, ताज्या बातम्या, Satara Pratinidhi</description>
	<lastBuildDate>Fri, 18 Sep 2026 16:24:33 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.1.1</generator>

<image>
	<url>https://www.satarapratinidhinews.com/wp-content/uploads/2026/08/cropped-SATARA-PRATINIDHI-scaled-1-32x32.png</url>
	<title>मुंबई Archives - Satara Pratinidhi</title>
	<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/category/mumbai</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान; मोठ्या प्रकल्पांवर नोडल अधिकाऱ्यांची नजर</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32474</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32474#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 16:24:33 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Air Pollution]]></category>
		<category><![CDATA[AQI]]></category>
		<category><![CDATA[Ashwini Bhide]]></category>
		<category><![CDATA[BMC]]></category>
		<category><![CDATA[BMC Updates]]></category>
		<category><![CDATA[Civic News]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Mumbai Air Pollution]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32474</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मुंबई : पावसाळ्यातील उपाययोजनांप्रमाणेच आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32474">मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान; मोठ्या प्रकल्पांवर नोडल अधिकाऱ्यांची नजर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई :</strong></span> पावसाळ्यातील उपाययोजनांप्रमाणेच आगामी काळात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर विशेष लक्ष ठेवून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.</p>
<p>बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग, खाते, प्रकल्प आणि उपक्रमांचा मासिक आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) महानगरपालिका मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्त भिडे यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.</p>
<p>सध्या मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात असला तरी आगामी काळात त्यात वाढ होऊ नये, यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे. तसेच १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी आवरण लावणे यासह आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले.</p>
<p>‘पादचारी प्रथम’ अभियानाला सातत्याची गरज</p>
<p>महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत सुमारे ३०७ किलोमीटर लांबीचे २०० पदपथ निवडण्यात आले आहेत. या पदपथांवरील अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्याचे काम सुरू आहे. विविध विभागांमध्ये झालेल्या कार्यवाहीचे दृश्य परिणाम दिसत असून, या अभियानात सातत्य ठेवून ते अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.</p>
<p>नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करा</p>
<p>नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी या महानगरपालिकेच्या कामकाजाचे वास्तव मूल्यमापन करणाऱ्या असतात. त्यामुळे तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यांचे वेळेत आणि योग्य पद्धतीने निराकरण करावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.</p>
<p>‘मार्ग’ (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स) प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तक्रारी ज्या स्तरावर सोडवणे अपेक्षित आहे, त्याच स्तरावर त्यांचे निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.</p>
<p>१३९ वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचा अभ्यास</p>
<p>मुंबईतील वाहतुकीस अडथळा ठरणारी सुमारे १३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांचा सखोल अभ्यास करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यकतेनुसार अडथळा ठरणारी बांधकामे नियमानुसार निष्कासित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.</p>
<p>रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या आदी विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर संबंधित परिमंडळांच्या उपआयुक्तांनी लक्ष ठेवावे. प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधित व्यक्तींची (पीएपी) यादी संबंधित विभागांनी वेळेत सादर करावी, जेणेकरून प्रकल्पांच्या कामात विलंब होणार नाही, असेही अश्विनी भिडे यांनी सांगितले.</p>
<p>बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सहआयुक्त, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, खातेप्रमुख आणि संचालक उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32474">मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान; मोठ्या प्रकल्पांवर नोडल अधिकाऱ्यांची नजर</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32474/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>शीव रेल्वे पूल ऑक्टोबरअखेर वाहतुकीसाठी खुला होणार? १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; अभिजीत बांगर यांची पाहणी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32470</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32470#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 15:06:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32470</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मुंबईकरांची तब्बल दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या शीव (सायन) रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32470">शीव रेल्वे पूल ऑक्टोबरअखेर वाहतुकीसाठी खुला होणार? १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; अभिजीत बांगर यांची पाहणी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मुंबईकरांची तब्बल दीर्घकाळ प्रतीक्षा असलेल्या शीव (सायन) रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुलाशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरपासून मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळाची पाहणी करून उर्वरित कामांना वेग देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.</p>
<p>शीव रेल्वे स्थानकाजवळील हा पूल तब्बल ११२ वर्षे जुना असून तो असुरक्षित ठरविण्यात आल्यानंतर त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली. त्याचबरोबर मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. या अतिरिक्त मार्गिकांसाठी रेल्वे रुळांवर पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जुन्या पुलाच्या जागी नव्या आराखड्यानुसार पूल उभारण्यात आला आहे.</p>
<p>नवीन पुलाची रचना जुन्या पुलापेक्षा वेगळी असून तो ५४.५ मीटर लांबीचा एकाच स्पॅनचा आणि २९ मीटर रुंदीचा आहे. विशेष म्हणजे पुलाखाली कोणताही मधला खांब नसल्याने रेल्वे रुळांच्या विस्तारासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे. या रचनेमुळे भविष्यात सीएसएमटी-कुर्ला मार्गावरील पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याच्या कामालाही मदत होणार आहे.</p>
<p>पुलाच्या रेल्वे हद्दीतील मुख्य कामाची जबाबदारी मध्य रेल्वेकडे असून, महानगरपालिका हद्दीतील पोहोच रस्त्यांचे नूतनीकरण, मजबुतीकरण आणि संबंधित नागरी कामे मुंबई महापालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा खर्च रेल्वे विभागाच्या निधीतून करण्यात येत आहे. निविदेनुसार या कामाची अंतिम मुदत फेब्रुवारी २०२७पर्यंत होती. मात्र, मुंबईकरांची गैरसोय लक्षात घेऊन त्यापूर्वीच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.</p>
<p>दरम्यान, पुलाच्या रेल्वे भागातील महत्त्वाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या सुमारे ५०० टन वजनाच्या दोन पोलादी तुळया टप्प्याटप्प्याने बसविण्यात आल्या. पहिल्या तुळईच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २१ ऑगस्टला, तर दुसऱ्या तुळईच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण २९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. दोन्ही तुळयांवरील अपघात प्रतिबंधक सुरक्षा कठडे आणि डेक स्लॅबवरील वेअरिंग कोटचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मध्य रेल्वेने रेल्वे हद्दीतील पुलाचे काम पूर्ण केल्याचे अलीकडील अहवालात नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>पुलाच्या पश्चिम बाजूला लालबहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग, धारावी या भागातील पोहोच रस्त्याचे पुनर्बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. पूर्वेकडील भागातील कामासाठी मध्य रेल्वेने २५ ऑगस्टपासून काही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे. त्यानंतर पूर्वेकडील पोहोच रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. उर्वरित सिमेंट काँक्रीटची कामे वेगाने सुरू असून रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून ती पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे.</p>
<p>या पुलाच्या पुनर्बांधणीमुळे शीव, धारावी, कुर्ला आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या महत्त्वाच्या भागांमधील पूर्व-पश्चिम वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पूल बंद असल्यामुळे या परिसरातील वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पूल सुरू झाल्यानंतर या मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.</p>
<p>अभिजीत बांगर यांच्या पाहणीनंतर आता १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी, वाहतूक नियोजन आणि संबंधित यंत्रणांच्या परवानग्या पूर्ण झाल्यावर पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांचे लक्ष आता ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीकडे लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32470">शीव रेल्वे पूल ऑक्टोबरअखेर वाहतुकीसाठी खुला होणार? १५ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; अभिजीत बांगर यांची पाहणी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32470/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर; मुंबईत पेट्रोल १११.२१, डिझेल ९७.८३ रुपये</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32462</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32462#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:50:05 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32462</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे वाहनचालकांचे लक्ष लागले असतानाच १८ सप्टेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32462">पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर; मुंबईत पेट्रोल १११.२१, डिझेल ९७.८३ रुपये</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>पेट्रोल आणि डिझेलच्या दराकडे वाहनचालकांचे लक्ष लागले असतानाच १८ सप्टेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर बहुतांश स्थिर राहिले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये, तर डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये, तर कोलकात्यात पेट्रोल ११३.५१ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १०७.९४ रुपये आणि डिझेल ९९.५५ रुपये, बंगळुरूमध्ये पेट्रोल १११.६८ रुपये आणि डिझेल ९९.५६ रुपये, तर हैदराबादमध्ये पेट्रोल ११५.६९ रुपये आणि डिझेल १०४.२३ रुपये प्रति लिटर आहे.</p>
<p>दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीवरील शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर एक रुपयाने कमी करून ५० पैसे करण्यात आले असून, डिझेलवरील शुल्कात पाच रुपयांची कपात करून ते २० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील शुल्कही चार रुपयांनी कमी करून १५ रुपये करण्यात आले आहे. हे बदल १६ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.</p>
<p>मात्र, निर्यात शुल्कातील कपातीचा देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरावर थेट परिणाम झालेला नाही. देशातील इंधनाचे दर ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, रिफायनिंग खर्च, वाहतूक खर्च, कर तसेच रुपया-डॉलर विनिमय दर यांसारख्या विविध घटकांचा विचार केला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क कमी झाले असले तरी देशांतर्गत ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या दरात तत्काळ दिलासा मिळालेला नाही.</p>
<p>शहरानुसार इंधनाच्या किमतींमध्ये फरक असतो. स्थानिक कर आणि इतर खर्चांमुळे प्रत्येक शहरातील दर वेगळे असू शकतात. तसेच इंधनाचे दर दररोज बदलण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी इंधन भरताना स्थानिक पेट्रोल पंपावरील त्या दिवसाचा लागू दर तपासून घेणे आवश्यक आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32462">पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर; मुंबईत पेट्रोल १११.२१, डिझेल ९७.८३ रुपये</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32462/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>गणपती विसर्जनानंतर प्रवाशांना दिलासा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरही विशेष नियोजन</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32458</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32458#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 14:44:51 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32458</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दक्षिण मुंबईकडे येतात. विसर्जन मिरवणुका</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32458">गणपती विसर्जनानंतर प्रवाशांना दिलासा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरही विशेष नियोजन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दक्षिण मुंबईकडे येतात. विसर्जन मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री नियमित लोकल फेऱ्यांनंतर चर्चगेट ते विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे विसर्जनानंतर उशिरा परतणाऱ्या हजारो प्रवाशांना या विशेष सेवांचा फायदा होणार आहे.</p>
<p>पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या नियोजनानुसार, या विशेष लोकल चर्चगेट आणि विरारदरम्यान धावतील आणि मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या विशेष लोकल पहाटे १.१५ ते ३.४५ या कालावधीत चालवल्या जातील. तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विशेष लोकल रात्री १२.१५ ते पहाटे ३ या कालावधीत उपलब्ध असतील. विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने परतीच्या प्रवासासाठी नियमित लोकलवर येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टीने या अतिरिक्त फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.</p>
<p>दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्नी रोड परिसरात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने पश्चिम रेल्वेने या स्थानकासाठी स्वतंत्र गर्दी नियंत्रणाचे नियोजन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ३७ जलद अप लोकलना सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे जलद लोकलच्या प्रवाशांचे विविध स्थानकांवर विभाजन होऊन चर्नी रोड परिसरातील गर्दीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.</p>
<p>याशिवाय, १५ डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक लांबीचा फलाट उपलब्ध नसल्यामुळे तीन १५ डब्यांच्या लोकलना ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स या स्थानकांवर थांबा दिला जाणार नाही. या बदलामुळे संबंधित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपला प्रवास आणि उतरण्याचे स्थानक आधीच निश्चित करणे आवश्यक आहे.<br />
चर्नी रोड स्थानकावरील गर्दी नियंत्रणासाठी आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० या कालावधीत अप मार्गावर धावणाऱ्या १०१ लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबणार नाहीत. विसर्जनाच्या काळात स्थानक परिसरात होणारी गर्दी, फलाटांवरील प्रवाशांची संख्या आणि सुरक्षित हालचाल लक्षात घेऊन हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.</p>
<p>गणेश विसर्जनाच्या दिवशी चर्नी रोड आणि परिसरातील स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी येण्याची शक्यता असल्याने तिकीट खिडक्यांवरही गर्दी वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन चर्नी रोड स्थानकावर अतिरिक्त तात्पुरत्या तिकीट खिडक्या सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. त्यामुळे नियमित तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सुलभ होणार आहे.</p>
<p>गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येतो. विसर्जन मिरवणुका, भाविकांची गर्दी आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे कार्यक्रम यामुळे दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी नियमित लोकल सेवांवर अचानक वाढलेला प्रवासी भार येऊ नये आणि गर्दीचे व्यवस्थापन सुरळीत व्हावे, यासाठी पश्चिम रेल्वेने अतिरिक्त लोकलसह स्थानकनिहाय उपाययोजना आखल्या आहेत.</p>
<p>विशेष लोकल सेवांमुळे चर्चगेटपासून विरारपर्यंतच्या प्रवाशांना विसर्जनानंतरही रेल्वेचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मात्र, चर्नी रोड स्थानकावरील काही लोकलच्या थांब्यात करण्यात आलेले बदल लक्षात घेणे प्रवाशांसाठी महत्त्वाचे आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, शक्य असल्यास आगाऊ तिकीट काढावे आणि गर्दीच्या काळात फलाटावर सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>अनंत चतुर्दशीच्या रात्री मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असल्याने रेल्वे, वाहतूक आणि पोलिस प्रशासनासमोर गर्दी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरील तात्पुरते थांबा बदल आणि अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था यामुळे विसर्जनानंतरच्या परतीच्या प्रवासातील गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32458">गणपती विसर्जनानंतर प्रवाशांना दिलासा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ जादा लोकल फेऱ्या, चर्नी रोडवरही विशेष नियोजन</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32458/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, दहावीची १५ फेब्रुवारीपासून</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32438</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32438#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 18 Sep 2026 04:47:13 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32438</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32438">दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, दहावीची १५ फेब्रुवारीपासून</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी परीक्षेच्या तारखांचे स्पष्ट चित्र मिळाले आहे.</p>
<p>दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची विद्यार्थी आणि पालकांकडून दरवर्षी उत्सुकतेने प्रतीक्षा केली जाते. यंदाही राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, तसेच शिक्षकांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करता यावे, या उद्देशाने परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत.</p>
<p>महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती दिली.</p>
<p>बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून</p>
<p>इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १६ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीची तयारीही पूर्ण करावी लागणार आहे.</p>
<p>दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून</p>
<p>इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.</p>
<p>राज्य मंडळाने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य वेळापत्रक असून विषयानुसार नेमकी परीक्षा कोणत्या दिवशी होणार, याची माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. दहावी आणि बारावीचे विषयनिहाय अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.</p>
<p>परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता उर्वरित अभ्यासक्रम, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका सोडविणे आणि पुनरावृत्ती यांचे नियोजन करता येणार आहे. विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संभाव्य वेळापत्रक लक्षात घेऊन विषयानुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32438">दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, दहावीची १५ फेब्रुवारीपासून</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32438/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>लोकल प्रवाशांना ‘मेडिकल कवच’; मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32406</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32406#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 17 Sep 2026 15:24:55 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32406</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मुंबईच्या लोकल प्रवासात अपघात झाल्यास जखमी प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32406">लोकल प्रवाशांना ‘मेडिकल कवच’; मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मुंबईच्या लोकल प्रवासात अपघात झाल्यास जखमी प्रवाशाला तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई उपनगरी मार्गावरील ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची तयारी मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त तसेच अचानक प्रकृती बिघडलेल्या प्रवाशांना स्थानकावरच प्राथमिक वैद्यकीय मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.</p>
<p>उपनगरी रेल्वे स्थानकांवर दररोज मोठी गर्दी असते. गर्दीच्या वेळी लोकलमधून पडणे, धावत्या गाडीत चढताना किंवा उतरताना दुखापत होणे, फलाटावर अपघात होणे किंवा प्रवाशाची अचानक प्रकृती खालावणे अशा घटना घडतात. अशा प्रसंगी रुग्णालयात नेण्यापूर्वी मिळणारे प्राथमिक उपचार महत्त्वाचे ठरतात. याच पार्श्वभूमीवर ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याची योजना करण्यात आली आहे.</p>
<p>चेंबूर आणि मानखुर्द येथील वैद्यकीय कक्षांसाठी औषध परवान्याशी संबंधित प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथील सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. तर खोपोली स्थानकावरील वैद्यकीय कक्षासाठी पावसाळ्यानंतर बांधकामाचे काम रेल्वेकडून केले जात आहे. आवश्यक प्रक्रिया आणि कामे पूर्ण झाल्यानंतर खोपोलीतही प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे.</p>
<p>दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघाती मृत्यू व जखमींची संख्या पाहता स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित होते. २०२५ मध्ये मध्य रेल्वेवर १,४५७, तर पश्चिम रेल्वेवर ८३० अपघाती मृत्यू झाले. दोन्ही रेल्वे मार्गांवरील एकूण मृत्यूंची संख्या २,२८७ होती. २०२४ मध्ये हा आकडा २,४६८, २०२३ मध्ये २,५९० आणि २०२२ मध्ये २,५०७ होता.</p>
<p>जखमींच्या आकडेवारीतही मोठी संख्या दिसून येते. २०२५ मध्ये मध्य रेल्वेवर १,५६५ आणि पश्चिम रेल्वेवर ९८९ प्रवासी जखमी झाले. दोन्ही मार्गांवरील एकूण जखमींची संख्या २,५५४ होती. २०२४ मध्ये २,६९७, २०२३ मध्ये २,४४१ आणि २०२२ मध्ये २,१५५ प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे.</p>
<p>रेल्वे स्थानकांवरील वैद्यकीय कक्षांमुळे अपघात किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना प्राथमिक उपचार तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. मात्र या सुविधेत प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक औषधे, प्राथमिक उपचाराची साधने आणि गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईच्या लोकलवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४३ स्थानकांवरील हे वैद्यकीय कक्ष महत्त्वाची सुविधा ठरणार आहेत.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32406">लोकल प्रवाशांना ‘मेडिकल कवच’; मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32406/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मतदार यादीचे शुद्धीकरण सुरू; १९ सप्टेंबरपासून विशेष शिबिरे, नाव-दुरुस्तीपासून नव्या नोंदणीपर्यंत संधी</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32402</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32402#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 17 Sep 2026 15:17:24 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32402</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत असून,</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32402">मतदार यादीचे शुद्धीकरण सुरू; १९ सप्टेंबरपासून विशेष शिबिरे, नाव-दुरुस्तीपासून नव्या नोंदणीपर्यंत संधी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p dir="ltr"><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p dir="ltr">मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान राज्यभर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्याबरोबरच पात्र नागरिकांची नव्याने नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच मतदार नोंदींमधील विसंगतींची पडताळणी करण्याची प्रक्रिया या माध्यमातून केली जाणार आहे.</p>
<p dir="ltr">या मोहिमेतील विशेष शिबिरे १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात येणार आहेत. संबंधित मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. मतदार यादीशी संबंधित विविध अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची माहिती देणे आणि दुरुस्ती प्रक्रियेबाबत नागरिकांना मदत करणे, अशी जबाबदारी बीएलओंकडे सोपविण्यात आली आहे.</p>
<p dir="ltr">नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच मतदार यादीतील नाव किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत असल्यास किंवा संबंधित मतदाराचा मृत्यू अथवा स्थलांतर झाले असल्यास त्याबाबतही आवश्यक अर्ज सादर करता येणार आहे. यासाठीचे अर्ज मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. दोन्ही भाषांमध्ये अर्जाची सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.</p>
<p dir="ltr">या विशेष पुनरीक्षण मोहिमेत नवमतदारांवरही विशेष भर देण्यात आला आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाही मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित ठिकाणी नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे प्रथमच मतदानाचा हक्क मिळविणाऱ्या तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p dir="ltr">मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचीही मदत घेतली जाणार आहे. सोसायट्यांमधील रहिवाशांना मतदार यादी तपासणे आणि आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी संबंधित अर्जांचे नमुने सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांनाही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांच्या नोंदी तपासण्यास मदत होणार आहे.</p>
<p dir="ltr">दरम्यान, नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे <a href="http://voters.eci.gov.in">voters.eci.gov.in</a> तसेच ECI Netच्या माध्यमातून ऑनलाइन सादर करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मतदार यादीतील नाव, पत्ता, वय आणि अन्य तपशील तपासून पाहावेत. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास निर्धारित मुदतीत दुरुस्ती किंवा आवश्यक नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.</p>
<p dir="ltr">मतदार यादीतील नोंदी अचूक राहणे हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे आणि अपात्र, मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे, या दोन्ही बाबींवर या मोहिमेत भर देण्यात आला आहे. विशेष शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना थेट बीएलओंची मदत मिळणार असल्याने मतदारांनी या संधीचा उपयोग करून आपली नोंद तपासावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32402">मतदार यादीचे शुद्धीकरण सुरू; १९ सप्टेंबरपासून विशेष शिबिरे, नाव-दुरुस्तीपासून नव्या नोंदणीपर्यंत संधी</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32402/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार; तंत्रज्ञानासोबत संवेदनशीलतेची जोड आवश्यक &#8211; संजीव जयस्वाल</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32373</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32373#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 17 Sep 2026 13:00:41 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32373</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी म्हाडा ही केवळ घरे बांधणारी संस्था नसून लाखो सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32373">महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार; तंत्रज्ञानासोबत संवेदनशीलतेची जोड आवश्यक &#8211; संजीव जयस्वाल</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>म्हाडा ही केवळ घरे बांधणारी संस्था नसून लाखो सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारी आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील गृहनिर्माणाचा पाया मजबूत करणारी अग्रगण्य संस्था आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना मानवी मूल्ये, संवेदनशीलता आणि बांधकामातील गुणवत्ता यांची जपणूक करणे आवश्यक आहे. भविष्यातील अभियंता हा केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणणारा नव्हे, तर त्या तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी करणारा संवेदनशील अभियंता असावा, असे प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.</p>
<p>भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे येथील सभागृहात आयोजित ‘अभियंता दिन-२०२६’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.</p>
<p>अभियंत्यांसमोरील नवी आव्हाने</p>
<p>गृहनिर्माण क्षेत्रात वेगाने बदल होत असून वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, उपलब्ध जमिनीची मर्यादा आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आगामी सात ते आठ वर्षे म्हाडासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक असतील. आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचार आणि संवेदनशीलता यांचा समन्वय साधत अभियंत्यांनी कार्यपद्धतीत आवश्यक बदल स्वीकारावेत, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.</p>
<p>कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पण माणुसकी कायम</p>
<p>कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहितीचे विश्लेषण आणि निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकते. मात्र, मानवी भावना, अनुभव, संवेदना आणि सहानुभूतीची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना नागरिकांच्या गरजा आणि मानवी मूल्ये केंद्रस्थानी ठेवली पाहिजेत, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.</p>
<p>गुणवत्ता, वेग आणि अचूकतेवर भर</p>
<p>म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी यांनी अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना शुभेच्छा देत विश्वेश्वरय्या यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. मुख्य अभियंता अनिल अंकलगी यांनी गुणवत्तापूर्ण काम, वेग आणि अचूकता ही अभियंत्यांच्या कार्यपद्धतीची मूलभूत तत्त्वे असल्याचे सांगितले. सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास संस्थेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p>प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना</p>
<p>मुख्य अभियंता-१ धीरजकुमार पंदिरकर यांनी म्हाडाच्या बांधकाम पद्धतीत काळानुरूप मोठे बदल झाल्याचे सांगितले. आधुनिक प्री-स्ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा गृहनिर्माण क्षेत्रात प्रभावी वापर केल्यास बांधकामाची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता वाढविता येईल. त्यातून लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि मूल्यवर्धित घरे उपलब्ध होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.</p>
<p>पदोन्नती झालेल्या अभियंत्यांचा गौरव</p>
<p>अभियंता दिनाच्या कार्यक्रमात पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता राकेश गावित यांनी केले. म्हाडाच्या आगामी गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबत गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32373">महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार; तंत्रज्ञानासोबत संवेदनशीलतेची जोड आवश्यक &#8211; संजीव जयस्वाल</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32373/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>‘लाडकी बहीण’ योजनेत ५ हजार कोटींचा घोळ? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; म्हणाल्या, ‘खरी आकडेवारी सांगा!’</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32336</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32336#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 17 Sep 2026 05:58:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32336</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना करण्यात आलेल्या कथित आर्थिक वितरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32336">‘लाडकी बहीण’ योजनेत ५ हजार कोटींचा घोळ? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; म्हणाल्या, ‘खरी आकडेवारी सांगा!’</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई :</strong> </span>मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना करण्यात आलेल्या कथित आर्थिक वितरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीचा दाखला देत या योजनेच्या अंमलबजावणीपासून लाभार्थ्यांची छाननी आणि निधी वितरणापर्यंतच्या प्रक्रियेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.</p>
<p>सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारकडून या प्रकरणात सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, योजनेत मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरल्यानंतर त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेल्या निधीचा प्रश्न गंभीर आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात गेलेल्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या रकमेबाबत शासनाची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.</p>
<p>योजनेतील लाभार्थ्यांची छाननी नेमकी कोणत्या पद्धतीने झाली, हा मुख्य प्रश्न असल्याचे सुळे यांनी नमूद केले. आधार आणि आयकराशी संबंधित माहिती उपलब्ध असतानाही अपात्र व्यक्ती योजनेच्या लाभापर्यंत कशा पोहोचल्या, तसेच काही पुरुषांच्या खात्यांमध्येही योजनेचा निधी जमा झाल्याचे कसे घडले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.</p>
<p>दरम्यान, योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येबाबतही वेगवेगळी आकडेवारी समोर येत असल्याचा दावा सुळे यांनी केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार ८२ लाख लाभार्थी वगळण्यात आल्याचे सांगितले जात असताना, संबंधित विभागाकडून ९२ लाख लाभार्थी वगळल्याचे सांगितले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नेमकी अधिकृत आकडेवारी कोणती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. उपलब्ध वृत्तांमध्येही योजनेतील अपात्र नोंदींच्या संख्येबाबत वेगवेगळे आकडे प्रसिद्ध झाले आहेत.</p>
<p>योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाभार्थ्यांची पुरेशी पडताळणी झाली होती का, याचीही चौकशी करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. छाननी प्रक्रियेतील त्रुटींमुळे पात्र आणि गरजू महिलांना तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोपही त्यांनी केला.</p>
<p>‘लाडकी बहीण’ योजनेतील आर्थिक व्यवहार आणि लाभार्थ्यांची संख्या याबाबत सरकारने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. योजनेशी संबंधित संपूर्ण आकडेवारी जनतेसमोर जाहीर करावी, या प्रकरणावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि अपात्र लाभाचे वितरण कसे झाले याची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.</p>
<p>दरम्यान, यापूर्वीही लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. जून २०२६ मध्ये सरकारकडून मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली होती. तसेच अपात्र महिलांकडून पूर्वी देण्यात आलेल्या रकमेची वसुली न करण्याबाबत सरकारची भूमिका असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते.</p>
<p>आता ५ हजार कोटी रुपयांच्या कथित अपात्र वितरणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे थेट स्पष्टीकरण आणि संपूर्ण आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32336">‘लाडकी बहीण’ योजनेत ५ हजार कोटींचा घोळ? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; म्हणाल्या, ‘खरी आकडेवारी सांगा!’</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32336/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>“मुलींनी सांगितलं… ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ घेतली! अभिजीत दिपकेंचा आता थेट आदिवासी आश्रमशाळांकडे मोर्चा”</title>
		<link>https://www.satarapratinidhinews.com/archives/32332</link>
					<comments>https://www.satarapratinidhinews.com/archives/32332#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[सातारा प्रतिनिधि]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 17 Sep 2026 05:24:00 +0000</pubDate>
				<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.satarapratinidhinews.com/?p=32332</guid>

					<description><![CDATA[<p>मुंबई प्रतिनिधी मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32332">“मुलींनी सांगितलं… ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ घेतली! अभिजीत दिपकेंचा आता थेट आदिवासी आश्रमशाळांकडे मोर्चा”</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><span style="color: #000000;"><strong>मुंबई प्रतिनिधी</strong></span></p>
<p>मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू झालेल्या या आंदोलनाला विविध भागांतून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आंदोलने सुरू केली असून, आता आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दिपके यांनी लक्ष वळविले आहे.</p>
<p>अभिजीत दिपके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी मोठ्या संख्येने चर्चेसाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कोणताही संकोच न बाळगता आश्रमशाळांमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्याचा दावा करण्यात आला. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याबरोबरच विद्यार्थिनींच्या गर्भधारणा चाचण्या करण्यात आल्याचे गंभीर आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आरोपांमुळे आदिवासी आश्रमशाळांमधील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.</p>
<p>मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनाच आरोपी केले जात असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी चर्चेदरम्यान केला. सरकारी आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याची तक्रारही करण्यात आली. विशेषतः भंडारा जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेचा उल्लेख विद्यार्थ्यांनी केला. या शाळेत एका खोलीत तब्बल १५ विद्यार्थ्यांना ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला.</p>
<p>गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून तेथील परिस्थितीही जाणून घेतली होती. आता आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आश्रमशाळांचा प्रश्न आगामी काळात ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.</p>
<p>दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सध्या राजकीय प्रवेश करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा देणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. पेपरफुटीच्या प्रश्नापासून सुरू झालेली त्यांची विद्यार्थी चळवळ आता सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि आदिवासी आश्रमशाळांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नावर दिपके पुढील काळात कोणती भूमिका घेतात, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>The post <a href="https://www.satarapratinidhinews.com/archives/32332">“मुलींनी सांगितलं… ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ घेतली! अभिजीत दिपकेंचा आता थेट आदिवासी आश्रमशाळांकडे मोर्चा”</a> appeared first on <a href="https://www.satarapratinidhinews.com">Satara Pratinidhi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://www.satarapratinidhinews.com/archives/32332/feed</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
